शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:04 IST

तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप नजर आणेवारी सरासरी ६० : शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या सुधारित व अंतिम आणेवारीकडे

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.कंधार तालुक्यातील शेतीची मदार निसर्गपावसावर आहे. खरीप लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. रबी व सिंचन क्षेत्र तसे नाममात्र आहे. निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी वैतागला आहे. गत काही वर्षांत शेतीला सातत्याने फटका बसत आहे. त्यामुळे शेतक-यांचे अर्थकारण कमालीचे नाजूक बनत चालले आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाला होता. यावर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी शेतीतून उत्पादन काढण्याची अपेक्षा बाळगून होता.परंतु कापसाला पडलेला बोंडअळीचा विळखा, सोयाबीनला करपा रोगाचे चक्र, बुरशीजन्य रोग आदीने कमालीचा पिकांना फटका बसला. सोयाबीन काढणी चालू असून त्याचा उतारा मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे चित्र आहे. आता नजर आणेवारी जाहीर केली आहे. ती शेतकºयांचे समाधान करू शकणारी नाही.नजर आणेवारी तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार ताडेवार, लिपिक वर्षा डहाळे यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी एस.एम.पटणे, बी.एल.वाघमारे, हेमंत सुजलेगावकर, एन.जी. गजलवार, एम.ई.मेथे, एस.एम.धोंडगे यांनी सर्वेक्षण करून परिश्रम घेतले. ५० पेक्षा अधिक आणेवारी आली आहे. त्यामुळे आता सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत. यातूनच खरीप पिकाचे वास्तव चित्र समोर येईल, अशी शेतक-यांची धारणा आहे.शेती व्यवसायात आता बी बियाणे, खते, फवारणी औषधीच्या वाढत्या किमती, सालगड्याचे वाढलेले भाव, शेतमजुराची वाणवा, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आदी समस्यांनी शेतकरी घायगुतीला आला आहे. त्यातच निसर्ग पावसाच्या लहरीपणाची भर पडत आहे. त्यामुळे लागवडखर्चही निघणे कठीण झाले आहे. आता नजर आणेवारी काढून महसूल प्रशासनाने उत्पादनाचा लेखाजोखा जाहीर केला आहे. परंतु, शेतकरी सुधारित व अंतिम आणेवारीकडे डोळे लावून आहे.पावसाचा लपंडाव कायम !कंधार तालुक्यातील सहा मंडळांतील नजरी पैसेवारी सरासरी ६० आहे. कंधार मंडळात १० हजार ८३९ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची नजरी पैसेवारी ६० घोषित झाली आहे. कुरूळा मंडळात १२ हजार ३८४ हेक्टर पेरणी व ६० पैसेवारी, फुलवळ १२ हजार २७२ हेक्टर पेरणी व ५८ पैसेवारी, बारूळ १० हजार ९५९ हेक्टर पेरणी व ६१, पेठवडज १० हजार ८०३ हेक्टर पेरणी व ६१ आणि उस्माननगर मंडळात ९ हजार ३५४ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची पैसेवारी ६० घोषित करण्यात आली आहे़ कुरूळा व फुलवळ मंडळात शेतकºयांनी सर्वात जास्त पेरणी केली. परंतु, पावसाचा लपंडाव होत राहिला़

टॅग्स :NandedनांदेडMONEYपैसा