शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:04 IST

तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप नजर आणेवारी सरासरी ६० : शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या सुधारित व अंतिम आणेवारीकडे

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.कंधार तालुक्यातील शेतीची मदार निसर्गपावसावर आहे. खरीप लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. रबी व सिंचन क्षेत्र तसे नाममात्र आहे. निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी वैतागला आहे. गत काही वर्षांत शेतीला सातत्याने फटका बसत आहे. त्यामुळे शेतक-यांचे अर्थकारण कमालीचे नाजूक बनत चालले आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाला होता. यावर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी शेतीतून उत्पादन काढण्याची अपेक्षा बाळगून होता.परंतु कापसाला पडलेला बोंडअळीचा विळखा, सोयाबीनला करपा रोगाचे चक्र, बुरशीजन्य रोग आदीने कमालीचा पिकांना फटका बसला. सोयाबीन काढणी चालू असून त्याचा उतारा मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे चित्र आहे. आता नजर आणेवारी जाहीर केली आहे. ती शेतकºयांचे समाधान करू शकणारी नाही.नजर आणेवारी तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार ताडेवार, लिपिक वर्षा डहाळे यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी एस.एम.पटणे, बी.एल.वाघमारे, हेमंत सुजलेगावकर, एन.जी. गजलवार, एम.ई.मेथे, एस.एम.धोंडगे यांनी सर्वेक्षण करून परिश्रम घेतले. ५० पेक्षा अधिक आणेवारी आली आहे. त्यामुळे आता सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत. यातूनच खरीप पिकाचे वास्तव चित्र समोर येईल, अशी शेतक-यांची धारणा आहे.शेती व्यवसायात आता बी बियाणे, खते, फवारणी औषधीच्या वाढत्या किमती, सालगड्याचे वाढलेले भाव, शेतमजुराची वाणवा, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आदी समस्यांनी शेतकरी घायगुतीला आला आहे. त्यातच निसर्ग पावसाच्या लहरीपणाची भर पडत आहे. त्यामुळे लागवडखर्चही निघणे कठीण झाले आहे. आता नजर आणेवारी काढून महसूल प्रशासनाने उत्पादनाचा लेखाजोखा जाहीर केला आहे. परंतु, शेतकरी सुधारित व अंतिम आणेवारीकडे डोळे लावून आहे.पावसाचा लपंडाव कायम !कंधार तालुक्यातील सहा मंडळांतील नजरी पैसेवारी सरासरी ६० आहे. कंधार मंडळात १० हजार ८३९ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची नजरी पैसेवारी ६० घोषित झाली आहे. कुरूळा मंडळात १२ हजार ३८४ हेक्टर पेरणी व ६० पैसेवारी, फुलवळ १२ हजार २७२ हेक्टर पेरणी व ५८ पैसेवारी, बारूळ १० हजार ९५९ हेक्टर पेरणी व ६१, पेठवडज १० हजार ८०३ हेक्टर पेरणी व ६१ आणि उस्माननगर मंडळात ९ हजार ३५४ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची पैसेवारी ६० घोषित करण्यात आली आहे़ कुरूळा व फुलवळ मंडळात शेतकºयांनी सर्वात जास्त पेरणी केली. परंतु, पावसाचा लपंडाव होत राहिला़

टॅग्स :NandedनांदेडMONEYपैसा