शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

दुषित पाण्यामुळे बोळेगावात कावीळची साथ; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:46 IST

येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेडकडे जाताना दिसत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : उपचारासाठी रूग्ण शिवनखेडात

लोकमत न्यूज नेटवर्कसगरोळी : येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेडकडे जाताना दिसत आहेत.बिलोली तालुक्यात सगरोळीपासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या बोळेगावात दूषित पाण्याच्या प्राशनाने २० ते २५ हून अधिक लोकांना कावीळ या रोगाची लागण झाल्याने ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. मागील तीन महिन्यांत कावीळ बाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गत पंधरा दिवसांत केशव गंगाधर एकंमवार (वय २७), सायबू संतुका गोणेकर (वय ५२) हे दोघे नांदेड येथील खाजगी व शासकीय रूग्णालयात कावीळवर उपचारादरम्यान मृत्यू पावले आहेत. तर २० ते २५ हून अधिक कावीळबाधित रूग्ण उपचारासाठी शिवनखेडची वाट धरताना दिसत आहेत. ही साथ कावीळचीच असून दूषित व रासायनिक मिश्रीत गोडतेल खाण्याने व दूषित पाणी पिल्याने होत असल्याचे रूग्णांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. या दूषित पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. गत दोन ते तीन वर्षे उलटून गेले तरीही अजून एकदाही शुद्ध की अशुद्ध पाणी, याची नमुना चाचणी झाल्याचे दिसत नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

  • मागील तीन महिन्यात कावीळ बाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गत पंधरा दिवसात केशव गंगाधर एकंमवार (वय २७ वर्षे), सायबू संतूका गोणेकर (वय ५२ वर्षे) या दोघांचा नांदेड येथील खाजगी व शासकीय रूग्णालयात कावीळवर उपचारा दरम्यान मृत्यू पावले आहेत. तर २० ते २५ हून अधिक कावीळबाधित रूग्ण उपचारासाठी शिवनखेडची वाट धरताना दिसत आहेत.

पाण्याची तपासणी दोन वर्षांपासून नाहीया दूषित पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असून गत दोन ते तीन वर्षे उलटून गेले असले तरीही अजून एकदाही शुद्ध की अशुद्ध पाणी, याची नमुना तपासणी झाल्याचे दिसत नाही़ त्यामुळे या प्रश्नावर प्रशासन गांभीर्याने घेण्यास तयार नाही़ या भागातील लोकप्रतिनिधीही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत़प्रशासनाने येथील शुद्ध पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे़२५ जणांना कावीळबिलोली तालुक्यातील सगरोळीपासून दोन कि़ मी़ अंतरावर असलेल्या बोळेगावात दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कावीळच्या साथीने ग्रामस्थ वैतागले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यwater pollutionजल प्रदूषणhospitalहॉस्पिटल