शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

एक महिना झाला नळाला पाणीच नाही : ग्रामस्थांनी पाणी आणावे कुठून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

हदगाव ‌- मनाठा येथील मुख्यमंत्री पेयजल योजना एक महिन्यापासून बंद आहे. योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे; परंतु एक महिन्यापासून ...

हदगाव ‌- मनाठा येथील मुख्यमंत्री पेयजल योजना एक महिन्यापासून बंद आहे. योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे; परंतु एक महिन्यापासून नळाला पाणी आलेच नाही. ग्रामस्थांनी पाणी आणावे कुठून? पाच वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे. व्हाॅल्व्हचे काम आतापर्यंत का केले नाही, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

१ मे रोजी नळयोजना सुरू केली तेव्हापासून एक-दोनदा पाणी आले; पण पुन्हा जे बंद झाले ते जून लागला, पण नळाला पाणी आलेच नाही. एका शेतकऱ्याने काम अडविले होते, त्यामुळे व्हॉल्व्ह बसविले नाहीत; पण ट्रायल घेतल्यानंतर पाइपलाइन फुटू लागल्याने त्यांना साक्षात्कार झाला की, व्हॉल्व्ह बसवावेच लागतात आणि त्यांनी व्हॉल्व्ह बसविले. आता २१ दिवस काम पक्के होईपर्यंत पाणी सोडता येणार नाही, म्हणजे उन्हाळा संपतो. एक-दोन मोठे पाऊस झाले की खाजगी बोअरला पाणी येते. मग नळाला पाणी आले काय, नाही काय कोण विचारणार? सन २०१२ पासूनचा अनुभव आहे. एप्रिल-मे महिन्यात गावात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगानेच नियोजन करणे आवश्यक आहे; पण तसे झाले नाही.

पाण्याची तीव्र टंचाई असताना बीडीओ, तहसीलदार यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे; पण कोणीच योजनेकडे लक्ष देत नाही, संबंधितांना जाब विचारत नाहीत किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून टँकर किंवा खाजगी बोअर अधिग्रहण करीत नाहीत.