शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील राजकारणाची हवा बदलत असून याची नोंद घेण्याची वेळ आली आहे : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:33 IST

चार राज्याच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा बदलत्या हवेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देदेशावर संकटाची परिस्थितीबैठकीला सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी अनुपस्थित 

नांदेड : राजकारणाची हवा मला कळते, असे सांगत देशात आता हवा बदलत असून चित्र बदलत आहे. या नव्या बदलाची नोंद घेण्याची वेळ आली आहे. याबाबत आपल्या मनात शंका नसून ही काही वावटळ नसून ही जनमाणसातील, लोकांच्या मनातील भावनांच्या पूर्ततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांचे निकाल हे बदलत्या हवेचे द्योतक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले़

नांदेड येथे जिल्हा बँकेत उभारण्यात आलेल्या पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण होते़ यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी खा. तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी, देशातील राजकारणाची हवा शरद पवारांना कळते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, अशी आठवण केली. त्याचा संदर्भ देताना खा़ पवार म्हणाले, आपल्याला राजकारणाची हवा कळते, आता देशाची हवा बदलत आहे़ या बदलत्या हवेची नोंद घेण्याची वेळ आली आहे. झालेल्या चार राज्याच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा बदलत्या हवेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशावर संकटाची परिस्थितीदेशात सध्या संकटाची परिस्थिती असल्याचे सांगितले़ पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले़ या हल्ल्यात देशाने जबरदस्त किंमत दिली असल्याचेही ते म्हणाले़ त्यातच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीही नुकतेच एक वक्तव्य करून जणू चिथावणी देण्याचेच काम केले आहे़ अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकजुट दाखवण्याची गरज आहे़ देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. 

बैठकीला सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी अनुपस्थित केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला आम्ही सर्व कामे सोडून उपस्थित राहिलो़ या बैठकीत एक ठरावही घेण्यात आला़ राजकारणात मतभेद असतील, पण देशाच्या रक्षणासाठी आम्ही सर्व एक आहोत़ सरकारच्या बरोबर आहोत, असा ठराव घेण्यात आला़ केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला सत्ताधारी पक्षाचेच प्रतिनिधी हजर नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे बैठकीला उपस्थित होते़ मात्र ते मंत्री म्हणून उपस्थित होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNandedनांदेडBJPभाजपा