शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दिशा बैठकीत बहुचर्चित तरोडा अतिक्रमणासह नांदेड-लातूर रस्त्यावरील खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी खा. चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करीत असताना ...

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी खा. चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करीत असताना जिल्हा परिषदेच्या तरोडा भागातील जागेवरील अतिक्रमणाचा विषय समोर आला. यावर खा. चिखलीकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत, न्यायप्रविष्ट असताना यावर अतिक्रमण कसे वाढत आहे. अनेकवेळा जि. प.च्या सभागृहात हा विषय गाजला होता. तोच विषय पुन्हा एकदा दिशा समितीच्या बैठकीत गाजला. अतिक्रमण तत्काळ काढावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, असा इशारा खा. चिखलीकर यांनी दिला. त्याचबरोबर नांदेड-लातूर महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे हे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बुजवावेत. दि. ३० रोजी मी स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सोबत घेऊन पाहणी दौरा करीन, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे चालू आहेत. काही ठिकाणी ते काम थांबविण्यात आले आहे. हे काम का थांबविले, त्याची चौकशी करावी. काही कारण नसताना ही कामे थांबली असतील तर दोषींवर कारवाई करावी, असा इशारा त्यांनी दिला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही ठिकाणी कामे अर्धवट असल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना खा. चिखलीकरांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागात वीज वितरणच्या तक्रारी वाढल्या असून काही ठिकाणी डी.पी. उपलब्ध नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्या. यासह अन्य विषयांवर दिशा समितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सीईओ वर्षा ठाकूर, आयुक्त अनिल लहाने, दिशा समितीचे सदस्य अनिल पाटील बोरगावकर, आदी उपस्थित होते.