शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
4
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
5
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
6
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
7
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
8
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
9
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
10
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
11
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
12
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
13
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
14
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
15
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
16
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
17
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
18
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
19
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
20
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

नांदेड : कोरोनामुळे भविष्याची चिंता, जवळच्या लोकांचा होणारा मृत्यू, आर्थिक नुकसान, कौटुंबिक समस्या यासह इतर कारणांमुळे मानसिक ...

नांदेड : कोरोनामुळे भविष्याची चिंता, जवळच्या लोकांचा होणारा मृत्यू, आर्थिक नुकसान, कौटुंबिक समस्या यासह इतर कारणांमुळे मानसिक ताणात वाढ झाली आहे. अनेक दिवस घरातच अडकून पडल्याने अनेकांचा स्वभाव चिडचिडा झाला आहे. या ताणतणावात आता जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे; परंतु तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास या ताणतणावातून सहज बाहेर पडता येते.

अनेकवेळेला ताण-तणाव निर्माण करण्यासाठी कारणे, घटना, परिस्थिती महत्त्वाची नसते, तर त्यासोबत आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो, कसा प्रतिसाद देतो हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातल्या त्यात मानसिक प्रतिसाद, त्या परिस्थितीबद्दल शंका, समज-गैरसमज, आपले विचार, शंका आणि भीती म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा असतो. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष करून कोरोना झालेले आणि अद्याप ज्यांना बाधा झाली नाही, असे रुग्णही मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येत आहेत.

महामारीच्या काळात मानसिक तणाव वाढला आहे. यामध्ये शंकाच नाही; परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकदम घाबरुन, भांबावून न जाणे. परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे. कोणत्याही प्रकारची टोकाची नकारार्थी प्रतिक्रिया न देणे, परिस्थितीवर विजय मिळविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करण्याची गरज आहे. कधी कारणे किंवा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यावेळी शक्यतो त्याकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. नको असलेल्या घटना घडल्यानंतर त्याचा सर्व दोष स्वत:वर घेणे टाळावे. मित्र, आप्तेष्ट, गुरुजन यांच्याशी नेहमी संवाद साधून त्यांचा सल्ला घेणे, आहार, निद्रा आणि शारीरिक श्रम या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. ताण हा घटनेमुळे कमी आणि त्या घटनेला दिलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे जास्त जाणवतो. म्हणून आपल्या भावनिक प्रतिसादाकडेही बारकाईने लक्ष द्या. गरज पडल्यास त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

- डॉ. रामेश्वर बोले,

मानसोपचार तज्ज्ञ

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे, तर काहींच्या नोकरीही गेल्या आहेत. त्यामुळे हे सर्वजण सध्या तणावात आहेत. त्यात तरुणवर्गही अडचणीत आला आहे. त्यांच्या हाताला सध्या काम नाही. इतर ठिकाणी कामासाठी जाण्याचीही सोय नाही. गावाकडे खाणारी तोंडे अनेक अन् कमावते दोनच हात. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न त्यांना सातत्याने भेडसावत आहेत. याच कारणामुळे ते मानसिक तणावात जगत आहेत. त्यातूनच त्यांना मानसिक आजाराचे ग्रासले असल्याचे दिसून येते.

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?

अनेकवेळा मानसिक तणावात असलेले पुरुष कुटुंबातील सदस्यांसमोर व्यक्त होत नाहीत. आपल्याला होणारा त्रास ते सांगत नाहीत; परंतु मित्रांमध्ये मात्र ते मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे घरातील सदस्य मानसिक तणावात असल्याचे दिसून आल्यास मित्रांशी संपर्क साधून त्यांच्या मनात नेमके काय चालले? याचा कानोसा घ्यावा. गरज पडल्यास सर्व सदस्यांनी मिळून त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.