शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

नांदेड : कोरोनामुळे भविष्याची चिंता, जवळच्या लोकांचा होणारा मृत्यू, आर्थिक नुकसान, कौटुंबिक समस्या यासह इतर कारणांमुळे मानसिक ...

नांदेड : कोरोनामुळे भविष्याची चिंता, जवळच्या लोकांचा होणारा मृत्यू, आर्थिक नुकसान, कौटुंबिक समस्या यासह इतर कारणांमुळे मानसिक ताणात वाढ झाली आहे. अनेक दिवस घरातच अडकून पडल्याने अनेकांचा स्वभाव चिडचिडा झाला आहे. या ताणतणावात आता जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे; परंतु तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास या ताणतणावातून सहज बाहेर पडता येते.

अनेकवेळेला ताण-तणाव निर्माण करण्यासाठी कारणे, घटना, परिस्थिती महत्त्वाची नसते, तर त्यासोबत आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो, कसा प्रतिसाद देतो हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातल्या त्यात मानसिक प्रतिसाद, त्या परिस्थितीबद्दल शंका, समज-गैरसमज, आपले विचार, शंका आणि भीती म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा असतो. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष करून कोरोना झालेले आणि अद्याप ज्यांना बाधा झाली नाही, असे रुग्णही मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येत आहेत.

महामारीच्या काळात मानसिक तणाव वाढला आहे. यामध्ये शंकाच नाही; परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकदम घाबरुन, भांबावून न जाणे. परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे. कोणत्याही प्रकारची टोकाची नकारार्थी प्रतिक्रिया न देणे, परिस्थितीवर विजय मिळविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करण्याची गरज आहे. कधी कारणे किंवा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यावेळी शक्यतो त्याकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. नको असलेल्या घटना घडल्यानंतर त्याचा सर्व दोष स्वत:वर घेणे टाळावे. मित्र, आप्तेष्ट, गुरुजन यांच्याशी नेहमी संवाद साधून त्यांचा सल्ला घेणे, आहार, निद्रा आणि शारीरिक श्रम या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. ताण हा घटनेमुळे कमी आणि त्या घटनेला दिलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे जास्त जाणवतो. म्हणून आपल्या भावनिक प्रतिसादाकडेही बारकाईने लक्ष द्या. गरज पडल्यास त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

- डॉ. रामेश्वर बोले,

मानसोपचार तज्ज्ञ

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे, तर काहींच्या नोकरीही गेल्या आहेत. त्यामुळे हे सर्वजण सध्या तणावात आहेत. त्यात तरुणवर्गही अडचणीत आला आहे. त्यांच्या हाताला सध्या काम नाही. इतर ठिकाणी कामासाठी जाण्याचीही सोय नाही. गावाकडे खाणारी तोंडे अनेक अन् कमावते दोनच हात. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न त्यांना सातत्याने भेडसावत आहेत. याच कारणामुळे ते मानसिक तणावात जगत आहेत. त्यातूनच त्यांना मानसिक आजाराचे ग्रासले असल्याचे दिसून येते.

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?

अनेकवेळा मानसिक तणावात असलेले पुरुष कुटुंबातील सदस्यांसमोर व्यक्त होत नाहीत. आपल्याला होणारा त्रास ते सांगत नाहीत; परंतु मित्रांमध्ये मात्र ते मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे घरातील सदस्य मानसिक तणावात असल्याचे दिसून आल्यास मित्रांशी संपर्क साधून त्यांच्या मनात नेमके काय चालले? याचा कानोसा घ्यावा. गरज पडल्यास सर्व सदस्यांनी मिळून त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.