शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नांदेड जिल्ह्यात दर तीन दिवसांना एक शेतकरी संपतोय जीवन ! शासनाला लक्ष द्यायला नाही वेळ

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 19, 2023 15:18 IST

शेतकरी आत्महत्या थांबेनात; १०० दिवसांत ३५ जणांनी मृत्यूला कवटाळले

नांदेड : अतिवृष्टी, गारपीटीतून अजूनही शेतकरी सावरला नसून, जिल्ह्यात प्रत्येक तीन दिवसांना एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे. हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत असताना शासन- प्रशासनाला मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने चीड निर्माण होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीन खरीप हंगाम धुवून गेला. वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला, मुलांचे शिक्षण, लग्न, वडिलधाऱ्यांचा दवाखाना असे सगळेच आर्थिक गणिते बिघडल्याने खिन्न झालेल्या शेतकऱ्यांनी मरण पत्करले. पण शासन काही लक्ष द्यायला तयार नाही. मागच्या वर्षभरात ११२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्या थांबतील, असे वाटले होते. मात्र, यावेळेसही असेच चित्र आहे.

तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नव्या वर्षात देखील शेतकरी कष्ट आणि संकटाचा धनी बनला आहे. दररोज जिल्ह्यात या घटना घडत असताना शासन स्तरावर मात्र या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील बनत आहेत.

१०० दिवसांत ३५ जणांनी मृत्यूला कवटाळलेजानेवारी ते १० एप्रिल या १०० दिवसामध्ये जिल्ह्यात ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पीक विमा, शासनाची मदत यातून फार काही हाती लागले नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मार्चमध्ये सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारीमध्ये ८ आणि १० एप्रिलपर्यंत ४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

११२ कुटुंबियांना मिळाली मदतमागील वर्षात १४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले. या कुटुंबाला सावरण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसाला शासनाकडून १ लाख रुपयांची मदत दिली जाते. मागील वर्षातील १४७ पैकी केवळ ११२ शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे.

कोणत्या महिन्यात किती आत्महत्या?जानेवारी : ९फेब्रुवारी : ८मार्च : १४१० एप्रिलपर्यंत : ४

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेडagricultureशेती