शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नांदेड जिल्ह्यात दर तीन दिवसांना एक शेतकरी संपतोय जीवन ! शासनाला लक्ष द्यायला नाही वेळ

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 19, 2023 15:18 IST

शेतकरी आत्महत्या थांबेनात; १०० दिवसांत ३५ जणांनी मृत्यूला कवटाळले

नांदेड : अतिवृष्टी, गारपीटीतून अजूनही शेतकरी सावरला नसून, जिल्ह्यात प्रत्येक तीन दिवसांना एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे. हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत असताना शासन- प्रशासनाला मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने चीड निर्माण होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीन खरीप हंगाम धुवून गेला. वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला, मुलांचे शिक्षण, लग्न, वडिलधाऱ्यांचा दवाखाना असे सगळेच आर्थिक गणिते बिघडल्याने खिन्न झालेल्या शेतकऱ्यांनी मरण पत्करले. पण शासन काही लक्ष द्यायला तयार नाही. मागच्या वर्षभरात ११२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्या थांबतील, असे वाटले होते. मात्र, यावेळेसही असेच चित्र आहे.

तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नव्या वर्षात देखील शेतकरी कष्ट आणि संकटाचा धनी बनला आहे. दररोज जिल्ह्यात या घटना घडत असताना शासन स्तरावर मात्र या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील बनत आहेत.

१०० दिवसांत ३५ जणांनी मृत्यूला कवटाळलेजानेवारी ते १० एप्रिल या १०० दिवसामध्ये जिल्ह्यात ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पीक विमा, शासनाची मदत यातून फार काही हाती लागले नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मार्चमध्ये सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारीमध्ये ८ आणि १० एप्रिलपर्यंत ४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

११२ कुटुंबियांना मिळाली मदतमागील वर्षात १४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले. या कुटुंबाला सावरण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसाला शासनाकडून १ लाख रुपयांची मदत दिली जाते. मागील वर्षातील १४७ पैकी केवळ ११२ शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे.

कोणत्या महिन्यात किती आत्महत्या?जानेवारी : ९फेब्रुवारी : ८मार्च : १४१० एप्रिलपर्यंत : ४

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेडagricultureशेती