शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
2
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
3
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
4
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
6
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
7
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
8
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
9
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
10
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
11
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
12
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
13
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
14
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
15
कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
16
Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!
17
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
18
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
19
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
20
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात ऐतिहासिक कलाकुसरीची मूर्तीशिल्प देखभाली अभावी दुर्लक्षित;  अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:09 IST

बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

- प्रा.गंगाधर तोगरे

कंधार (नांदेड ): बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

आठव्या शतकापासून घडलेल्या अनेक स्मृती राष्ट्रकुटकालीन कंधार आपल्या अंगाखांद्यावर खेळवते आहे़ शहराला मंदिर, मूर्तीचा समृद्ध वारसा आहे़ कृष्णेश्वर मंदिर, क्षेत्रपाल मंदिर, संगरेश्वर मंदिर, बंकेश्वर मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, जैन मंदिर, कालप्रिय नाथमंदिर आदी मंदिराने वैभव प्राप्तप्त करून दिले़ मात्र काळाच्या ओघात अनेक मंदिरे नष्ट झाली़ मोजकीच आता कशीतरी तग धरून आहेत़ त्यात जैन मंदिर, बौद्ध मूर्ती, द्वादशभूजा देवी, अष्टभुजा देवी मूर्ती सतर्कतेने चांगल्या स्थितीत पहायला मिळतात़ मात्र शेकडो मूर्तीशिल्पे अडगळीला असल्याचे दिसते़

मूर्तीशिल्पे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात़ खोदकाम, नांगरटी करताना ते प्रकर्षाने  समोर येतात़ त्याचे जतन करण्याचेच मोठे आव्हान आजही कायम आहे़ महादेव, नंदी, पार्वती, कौमारी, जैन, पद्मपाणी, वैष्णवी, महिषासूर मर्दिनी, चामुंडा, लज्जागौरी, महाकालीन, अवलोकीतेश्वर, क्षेत्रपाल भैरव, चंद्रशिळा, हत्ती, गणेश आदी मूर्तीशिल्पे विखुरलेले व अडगळीत आहेत. वादळवारा, ऊन, पाऊस, गारठा आदीचे आघात सहन करत मूर्तीशिल्पे पर्यटकांना आकर्षित करतात़, परंतु बाराशे वर्षांचा समृद्ध वारसा दुर्लक्षित होत असल्याने त्याचे कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे बारकावे पुसटते होत असल्याची भीती पर्यटकांतून व्यक्त होत आहे़

वेरूळ-अजिंठा येथे असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभवाच्या तोडीचा समृद्ध वारसा, कला साधना, अप्रतिम मूर्तीशिल्पे कंधारचे जतन करणे काळाची गरज आहे़ भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी शासन-पुरातत्त्व विभागाने दमदार पावले टाकली आहेत़ तशीच पावले मूर्ती जतन, संवर्धनासाठी टाकावीत, अन्यथा अप्रतिम-कलासाधना काळाच्या ओघात पुसटशा होवून सौंदर्य नष्ट होण्याची भीती आहे़ 

माजी खा़भाई डॉक़ेशवराव धोंडगे व माजी आ़भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी मन्याड खोर्‍याचा मंदिर-मूर्तीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची अनेकवेळा शासनाकडे मागणी केली़ बहाद्दरपुरा येथे पाटबंधारे विभागाकडून राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यामुळे अनेक मूर्तीचे योग्य जतन होण्यास मोठी मदत झाली़ मानार नदी काठावर शांतीघाट परिसर, बगीचा, मंदिर, राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय, द्वादशभूजा देवी लोकाश्रय मंडप आदींना पर्यटक त्यामुळे भेटी देतात़ विखुरलेले अनेक मूर्तीशिल्पे एकत्रित करून, भंगलेले मूर्तीशिल्पे एकत्रित करावीत, ज्यात किल्ल्यातील गणेशमूर्ती, नंदी, क्षेत्रपाल आदी उघड्यावर पडलेले आहेत़ त्या कलावैभवाला अद्ययावत वस्तूसंग्रहालय बहाद्दरपुरा येथेच जतन करण्यासाठी करावे़ सद्य:स्थितीत असलेल्या राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालयाची व्यापकता वाढवावी.