शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

कंधारात ऐतिहासिक कलाकुसरीची मूर्तीशिल्प देखभाली अभावी दुर्लक्षित;  अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:09 IST

बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

- प्रा.गंगाधर तोगरे

कंधार (नांदेड ): बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

आठव्या शतकापासून घडलेल्या अनेक स्मृती राष्ट्रकुटकालीन कंधार आपल्या अंगाखांद्यावर खेळवते आहे़ शहराला मंदिर, मूर्तीचा समृद्ध वारसा आहे़ कृष्णेश्वर मंदिर, क्षेत्रपाल मंदिर, संगरेश्वर मंदिर, बंकेश्वर मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, जैन मंदिर, कालप्रिय नाथमंदिर आदी मंदिराने वैभव प्राप्तप्त करून दिले़ मात्र काळाच्या ओघात अनेक मंदिरे नष्ट झाली़ मोजकीच आता कशीतरी तग धरून आहेत़ त्यात जैन मंदिर, बौद्ध मूर्ती, द्वादशभूजा देवी, अष्टभुजा देवी मूर्ती सतर्कतेने चांगल्या स्थितीत पहायला मिळतात़ मात्र शेकडो मूर्तीशिल्पे अडगळीला असल्याचे दिसते़

मूर्तीशिल्पे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात़ खोदकाम, नांगरटी करताना ते प्रकर्षाने  समोर येतात़ त्याचे जतन करण्याचेच मोठे आव्हान आजही कायम आहे़ महादेव, नंदी, पार्वती, कौमारी, जैन, पद्मपाणी, वैष्णवी, महिषासूर मर्दिनी, चामुंडा, लज्जागौरी, महाकालीन, अवलोकीतेश्वर, क्षेत्रपाल भैरव, चंद्रशिळा, हत्ती, गणेश आदी मूर्तीशिल्पे विखुरलेले व अडगळीत आहेत. वादळवारा, ऊन, पाऊस, गारठा आदीचे आघात सहन करत मूर्तीशिल्पे पर्यटकांना आकर्षित करतात़, परंतु बाराशे वर्षांचा समृद्ध वारसा दुर्लक्षित होत असल्याने त्याचे कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे बारकावे पुसटते होत असल्याची भीती पर्यटकांतून व्यक्त होत आहे़

वेरूळ-अजिंठा येथे असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभवाच्या तोडीचा समृद्ध वारसा, कला साधना, अप्रतिम मूर्तीशिल्पे कंधारचे जतन करणे काळाची गरज आहे़ भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी शासन-पुरातत्त्व विभागाने दमदार पावले टाकली आहेत़ तशीच पावले मूर्ती जतन, संवर्धनासाठी टाकावीत, अन्यथा अप्रतिम-कलासाधना काळाच्या ओघात पुसटशा होवून सौंदर्य नष्ट होण्याची भीती आहे़ 

माजी खा़भाई डॉक़ेशवराव धोंडगे व माजी आ़भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी मन्याड खोर्‍याचा मंदिर-मूर्तीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची अनेकवेळा शासनाकडे मागणी केली़ बहाद्दरपुरा येथे पाटबंधारे विभागाकडून राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यामुळे अनेक मूर्तीचे योग्य जतन होण्यास मोठी मदत झाली़ मानार नदी काठावर शांतीघाट परिसर, बगीचा, मंदिर, राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय, द्वादशभूजा देवी लोकाश्रय मंडप आदींना पर्यटक त्यामुळे भेटी देतात़ विखुरलेले अनेक मूर्तीशिल्पे एकत्रित करून, भंगलेले मूर्तीशिल्पे एकत्रित करावीत, ज्यात किल्ल्यातील गणेशमूर्ती, नंदी, क्षेत्रपाल आदी उघड्यावर पडलेले आहेत़ त्या कलावैभवाला अद्ययावत वस्तूसंग्रहालय बहाद्दरपुरा येथेच जतन करण्यासाठी करावे़ सद्य:स्थितीत असलेल्या राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालयाची व्यापकता वाढवावी.