शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

मला रेणुकाई दे दर्शनाशी, गडा चढूनीया आले माहेराशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:36 IST

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तीर्थक्षेत्र नवरात्र महोत्सवासाठी सज्ज होत आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल अमलीवन म्हणून प्रसिद्ध होते.

नांदेड, दि. 16 - महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तीर्थक्षेत्र नवरात्र महोत्सवासाठी सज्ज होत आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल अमलीवन म्हणून प्रसिद्ध होते. प्राचीन किल्ल्याचे ठिकाण असलेल्या याच माहूरगडावर २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होत आहे.माहूरगडावर रेणुकादेवीबरोबरच दत्तात्रय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे आहेत. नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर असलेला हा माहूरगड चोहोबाजूंनी डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. देवीचे मंदिर तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची मंदिरेसुद्धा माहूरगड या नावानेच ओळखल्या जाणाºया टेकडीच्या माथ्यावर असून पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेलेली आहेत. रेणुकामातेला श्री परशुरामाची माता म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे हे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधल्याचे सांगितले जाते. याच माहूरगडावर श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. दत्तात्रयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलावर एका शिखरावर आहे. गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगण्यात येते. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुनर्बांधणी १५४६ मध्ये झाली होती. त्याची खूण मुख्य दरवाजावर बसविण्यात आली आहे. या मंदिराचा विस्तार साडेतीनशे वर्षांपूर्वी शालीवाहन राजाने इ. स. १६२४ च्या सुमारास केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर वास्तूशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले असून गाभारा व सभामंडप अशा दोन भागांत विभागले आहे. गाभाºयात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या गाभाºयाचा प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यांनी मडविला आहे. देवीचा मुखवटा पाच फूट उंचीचा असून त्याची रुंदी चार फूट आहे.चांदीने मडविलेल्या दक्षिणाभिमुख प्रवेशद्वारातून भाविक प्रत्यक्ष रेणुकामातेच्या मंदिरात प्रवेश करतात. या मंदिराशिवाय परिसरात कोल्हापूरची महालक्ष्मी देवी व तुळजापूरच्या तुकाईदेवीचेही मंदिर आहे. महाराष्टÑातील अनेक परिवारांचे कुलदैवत असलेल्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी महाराष्टÑासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने नवरात्रोत्सव काळात माहूरगडावर दर्शनासाठी येतात.यावेळी ‘मला रेणुकाई दे दर्शनाशी, गडा चढूनीया आले माहेराशी, तुझे मंगलकारी रुप भक्ताशी नमस्कार माझा आई रेणुकेशी’ काहींशी अशीच भावना भाविकांची असते.