शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मानवविकासच्या बसेसला हिमायतनगरचा विसर

By admin | Updated: June 23, 2014 00:03 IST

हिमायतनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मानवविकासच्या बसेस महत्त्वाच्या ठरतात़ मात्र शाळा सुरु होवून आठवडा लोटला तरी अद्याप ही बससेवा सुरु झालेली नाही़

हिमायतनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मानवविकासच्या बसेस महत्त्वाच्या ठरतात़ मात्र शाळा सुरु होवून आठवडा लोटला तरी अद्याप ही बससेवा सुरु झालेली नाही़दूर्गम भागाचा सर्वांगीन विकास व्हावा, येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मानव विकास मिशनअंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात़ जेथे माध्यमिक शाळा नाहीत अशा गावातील विद्यार्थ्यांना तालुक्यावरील शाळांपर्यंत ने आण करण्यासाठी मानव विकास अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली़ मुलींसाठी ही सेवा मोफत तर मुलांसाठी माफक शुल्क आकारले जाते़ हिमायतनगर तालुक्यात मागील वर्षी पाच बसेस मानव विकास योजनेसाठी एसटी महामंडळास दिल्या होत्या़ तालुक्यातील पळसपूर, डोलारी, सिरपल्ली, बोरगडी, धानोरा, टाकळी, सिरंजनी, एकंबा, कोठा, कामारी जवळगाव, हिमायतनगर, सवना, जिरोणा, महादापूर, टेंभी, आंदेगाव, पवना, दरेसरसम, पोटा, सोनारी, करंजी, सरसम, मंगरुळ, खैरगाव, शिपदरा, कार्ला, वडगाव या गावांतील विद्यार्थी या बसेसचा लाभ घेतात़ पाच मार्गावर मानव विकासच्या बसेस गत वर्षी धावल्या़ अन्य काही गावे अद्यापही या सेवेपासून वंचित आहेत़ यंदा तर पूर्वीच्या मार्गावरही मानव विकासची बस अद्यापि धावलीच नाही़याबाबत हदगाव आगार प्रमुख मुपडे यांच्याशी संपर्क केला असता कामारी-जवळगाव व शिरपल्ली-कोठा या मार्गावर बस सुरु करण्यात आली़ अन्य मार्गावरही बसेस सुरु करण्यात येतील असे त्यांनी सांगीतले़ही बससेवा पूर्ववत सुरु करुन शाळेच्या वेळापत्रकानुसार बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी पालकांतून होत आहे़ (वार्ताहर)दीड हजार विद्यार्थ्यांचा राबता हिमायतनगर येथे चार हायस्कूल, दोन ज्युनिअर व एक सिनिअर कॉलेज आहेत़ तालुक्यातील दीड हजारावर विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी दररोज येथे येतात़ माध्यमिक शाळांचे विद्यार्थी मानव विकासच्या बसेसचा लाभ घेतात़ ग्रामीण भागातील पालक बहूतांश शेतकरी, मजूर आहेत़ त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रवासखर्च करणे शक्य नाही़