शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

HSC Result : नांदेड जिल्ह्याचा निकाल २ टक्क्यांनी उंचावला; एकूण निकाल ८७.९४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:07 IST

जिल्ह्यातील ३१ हजार ९९९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत़

ठळक मुद्देविज्ञान शाखेचे सर्वाधिक १४ हजार ४५६ विद्यार्थी उत्तीर्ण

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी १ वाजता जाहीर केला़ नांदेड जिल्ह्याचा ८७़९४ टक्के निकाल लागला असून जिल्ह्यातील ३१ हजार ९९९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत़ गतवर्षीपेक्षा यंदा २. १४ टक्क्याने निकाल उंचावला असून २०१९ मध्ये जिल्ह्याचा ८६़२० टक्के निकाल लागला होता़

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये इयत्ता १२ वी ची परीक्षा घेण्यात आली होती़ प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १७ फेब्रुवारी तर लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली होती़ दरम्यानच्या काळात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी जाहीर झाल्याने व ही संचारबंदी पुढे वाढवित गेल्याने यंदा १२ वी परीक्षेचा निकाल विलंबाने जाहीर झाला़जिल्ह्यात विज्ञान शाखेचे १४ हजार ४५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९५़०१ टक्के लागला आहे़ तर कला शाखेच्या १३ हजार १२६ विद्यार्थ्यांनी यंदा उत्तीर्ण होऊन यश मिळविल्याने या शाखेचा निकाल ८०़८४ टक्के लागला आहे़ वाणिज्य शाखेचे ३ हजार ६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेच निकाल ९१़९१ टक्के एवढा लागला आहे़ याबरोबरच एचएससी व्हीडीसी शाखेचे ७२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ७९़१० टक्के लागला आहे़ जिल्ह्यात वरील चारही शाखेचे मिळून ३१ हजार ९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़  

यंदा भ्रमणध्वनीवरूनच विद्यार्थ्यांचे कौतुकइयत्ता १२ वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला सुरुवात होते़ यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून पेढे वाटून पाल्याच्या यशाचा आनंद साजरा केला जातो़ मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे़ त्यातच इतर दुकानांसह मिठाईची दुकानेही बंद असल्याने यंदा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक भ्रमणध्वनीवरूनच करावे लागत आहे़

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालNandedनांदेडStudentविद्यार्थी