शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हळदीचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:27 IST

हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आहे़ या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़

ठळक मुद्देहरभऱ्याची आवक थंडावलीभाव वाढल्याने शेतकरी आनंदी

युनूस नदाफ।पार्डी : हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आहे़ या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या भावात वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतेत होता़ हळदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते़ परंतु, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ गेल्या आठवड्यात हळदीला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता़ त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हळद विकण्याचे थांबविले होते़ परंतु शनिवारी हळदीच्या बिटात भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ तसेच हरभऱ्याच्या भावात वाढ झालेली आहे़सुरुवातीस हरभऱ्याला ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ परंतु, बाजारात हरभऱ्याची आवक थंडावल्याने हरभऱ्याचे भाव कडाडले आहेते़ ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे़ शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे खळे करताच बाजारात हरभरा विक्रीस नेला होता़ आता शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक राहिला नसून बाजारात हरभऱ्याची आवक थंडावल्याने हरभऱ्यांचे भाव मात्र कडाडले आहेत. शनिवारी हरभऱ्याची ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत खरेदी केल्याचे शेतकरी सांगत आहेत़ मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन अधिकअर्धापूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून बाजारात शेतकऱ्यांना हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही़ हळदीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असून लागवडीपासून ते हळद डोल करून बाजारात नेण्यापर्यंत खर्च झाला आहे़परंतु, हळदीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता़उत्पादनवाढीसाठी मोठा खर्चगेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत़ शेतीचा खर्च भरपूर करण्यात येत आहे़ त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी पिकावर भरपूर खर्च करण्यात येते़ परंतु, मालाला भाव योग्यप्रकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़भाव नसल्याने शेतकरी अडचणीतगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्धापूर तालुक्यात हळदीचा भाव घसरलेल्या स्थितीत दिसत आहे़ हळदीला मनासारखा भाव मिळत नसल्याने बाजारपेठेत हळदीची आवक थंडावली असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे़ दरम्यान, यावर्षी अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली होती़ त्यामुळे उत्पादनात मोठी वाढही झाली आहे़ परंतु, भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत़ शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ परंतु, गतवर्षीसारखा यावर्षी बाजारात हळदीला भाव मिळत नाही, असे सांगण्यात येत आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी