शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शिक्षणाला इमानदार राजकारणाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:03 IST

प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.

ठळक मुद्देमनीष सिसोदिया : मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज

नांदेड : सर्व समस्यांचे समाधान शिक्षणातच आहे. पण, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. देशातील शिक्षण विभागाचे काम मनुष्यबळ विकास खात्याकडून बघितले जाते. प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.नांदेड येथे मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि नांदेड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांच्या ५८ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना म्हणाले, दिल्लीत गेल्या दोन वर्षांपासून सरकारी शाळांचे निकाल वाढले आहेत़ जवळपास ९० टक्के मुले ही खाजगी शाळांतून सरकारी शाळांमध्ये आली आहेत़ दिल्लीचे रुपडे पालटले आहे़ १०० टक्के शाळांमध्ये फिल्टरचे पाणी मिळते़ उकृष्ट शिक्षण व्यवस्थेचे मॉडेल दिल्ली सरकारने तयार केले आहे़ केवळ आदेश काढून कामे होत नाहीत़ त्यासाठी इमानदारीने प्रयत्न करण्याची गरज आहे.शिक्षण व्यवस्थेतून केवळ संसाधन निर्मिती न होता सुसंस्कारित मानव निर्माण झाला पाहिजे. दिल्ली शासनाने राबवलेल्या अनेक उपक्रमांमुळे कौतूकास्पद शैक्षणिक यश मिळाले. देशात शिक्षण क्षेत्राला गांभीर्याने घेण्यातच आले नाही़ हे दुर्देव आहे़ विद्यार्थी गुणवान झाला तर बेईमानी, लबाडी, अशांतता व युद्ध होणारच नाही. देशच नव्हे तर जगसुद्धा या पद्धतीने सुधारू शकतो, ही किमया केवळ शिक्षणात आहे, असे सिसोदिया म्हणाले.तर अपर्णा रामर्तीकर यांनी ‘आजची बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंब व समाजाची घडी सुरळीत राहण्यासाठी सर्व नाती जपण्याचा आई, वडील, बहीण यांचे कुटुंबातील महत्त्वाचे स्थान जपले पाहिजे. स्पंदने संक्रमित करून एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिली पाहिजे. नाती जपा व सुसंस्कारीत भारतीय परंपरा निर्माण करा, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, संमेलनाध्यक्ष वसंत पाटील,मारोती खेडेकर, गोविंद मेथे, शंकर डख, मोतीभाऊ केंद्रे, चंद्रशेखर पाटील, जिल्हाध्यक्ष संजय शिप्परकर, डॉ. सुरेश सावंत, अशोक जाधव, मोहन फाजगे, चंदलवाड, अशोक मोरे, हावगीर गोपछडे, युनूस पटेल, एम.बी. जाधव, भास्कर आर्वीकर, बिभीषण पाळवदे, गोविंद केंद्रे आदी उपस्थित होते.पहिल्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक गंगाधरराव म्हमाणे म्हणाले की, प्रशाकीय सुधारणेसाठी मुख्याध्यापकांनी कर्तव्य तत्परतेने काम केले पाहिजे. संचमान्यता तात्काळ करून देण्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देण्यात ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाप्रकारची प्रलंबित प्रकरणे डिसेंबरअखेरपर्यंत निकाली काढले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.विद्यार्थ्यांमधील कॉमननेस शोधायला हवाशिक्षण व्यवस्थाच चुकीच्या पद्धतीच्या आहे़ अभ्यासक्रम, गुण हेच ध्येय झाले आहे़ युनिकनेसह मुलांमध्ये कॉमननेसही शोधले पाहिजे़ शिक्षणातच सर्व समस्यांचे समाधान आहे़ त्यामुळेच दिल्लीत नवीन शाळा उभारणीवर जोर देण्यात आला़ मुख्याध्यापकांना अधिकचा निधी खर्च करण्याची सूट देण्यात आली़ मंत्री, अधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी यासाठी कठोर मेहनत घेतली आहे़ ६० टक्केहून अधिक प्राचार्य परदेशातून प्रशिक्षण घेऊन आले आहेत, असे ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रdelhiदिल्ली