शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
4
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
5
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
6
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
7
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
8
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
9
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
10
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
11
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
12
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
13
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
14
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
15
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
16
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
17
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
18
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
19
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
20
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

शिक्षणाला इमानदार राजकारणाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:03 IST

प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.

ठळक मुद्देमनीष सिसोदिया : मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज

नांदेड : सर्व समस्यांचे समाधान शिक्षणातच आहे. पण, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. देशातील शिक्षण विभागाचे काम मनुष्यबळ विकास खात्याकडून बघितले जाते. प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.नांदेड येथे मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि नांदेड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांच्या ५८ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना म्हणाले, दिल्लीत गेल्या दोन वर्षांपासून सरकारी शाळांचे निकाल वाढले आहेत़ जवळपास ९० टक्के मुले ही खाजगी शाळांतून सरकारी शाळांमध्ये आली आहेत़ दिल्लीचे रुपडे पालटले आहे़ १०० टक्के शाळांमध्ये फिल्टरचे पाणी मिळते़ उकृष्ट शिक्षण व्यवस्थेचे मॉडेल दिल्ली सरकारने तयार केले आहे़ केवळ आदेश काढून कामे होत नाहीत़ त्यासाठी इमानदारीने प्रयत्न करण्याची गरज आहे.शिक्षण व्यवस्थेतून केवळ संसाधन निर्मिती न होता सुसंस्कारित मानव निर्माण झाला पाहिजे. दिल्ली शासनाने राबवलेल्या अनेक उपक्रमांमुळे कौतूकास्पद शैक्षणिक यश मिळाले. देशात शिक्षण क्षेत्राला गांभीर्याने घेण्यातच आले नाही़ हे दुर्देव आहे़ विद्यार्थी गुणवान झाला तर बेईमानी, लबाडी, अशांतता व युद्ध होणारच नाही. देशच नव्हे तर जगसुद्धा या पद्धतीने सुधारू शकतो, ही किमया केवळ शिक्षणात आहे, असे सिसोदिया म्हणाले.तर अपर्णा रामर्तीकर यांनी ‘आजची बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंब व समाजाची घडी सुरळीत राहण्यासाठी सर्व नाती जपण्याचा आई, वडील, बहीण यांचे कुटुंबातील महत्त्वाचे स्थान जपले पाहिजे. स्पंदने संक्रमित करून एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिली पाहिजे. नाती जपा व सुसंस्कारीत भारतीय परंपरा निर्माण करा, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, संमेलनाध्यक्ष वसंत पाटील,मारोती खेडेकर, गोविंद मेथे, शंकर डख, मोतीभाऊ केंद्रे, चंद्रशेखर पाटील, जिल्हाध्यक्ष संजय शिप्परकर, डॉ. सुरेश सावंत, अशोक जाधव, मोहन फाजगे, चंदलवाड, अशोक मोरे, हावगीर गोपछडे, युनूस पटेल, एम.बी. जाधव, भास्कर आर्वीकर, बिभीषण पाळवदे, गोविंद केंद्रे आदी उपस्थित होते.पहिल्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक गंगाधरराव म्हमाणे म्हणाले की, प्रशाकीय सुधारणेसाठी मुख्याध्यापकांनी कर्तव्य तत्परतेने काम केले पाहिजे. संचमान्यता तात्काळ करून देण्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देण्यात ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाप्रकारची प्रलंबित प्रकरणे डिसेंबरअखेरपर्यंत निकाली काढले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.विद्यार्थ्यांमधील कॉमननेस शोधायला हवाशिक्षण व्यवस्थाच चुकीच्या पद्धतीच्या आहे़ अभ्यासक्रम, गुण हेच ध्येय झाले आहे़ युनिकनेसह मुलांमध्ये कॉमननेसही शोधले पाहिजे़ शिक्षणातच सर्व समस्यांचे समाधान आहे़ त्यामुळेच दिल्लीत नवीन शाळा उभारणीवर जोर देण्यात आला़ मुख्याध्यापकांना अधिकचा निधी खर्च करण्याची सूट देण्यात आली़ मंत्री, अधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी यासाठी कठोर मेहनत घेतली आहे़ ६० टक्केहून अधिक प्राचार्य परदेशातून प्रशिक्षण घेऊन आले आहेत, असे ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रdelhiदिल्ली