शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

१३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:31 IST

नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़

ठळक मुद्देराहेरच्या हेमाडपंती नृसिंह मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; मंदिराला वीटभट्ट्यांचा विळखा

भारत दाढेल।नांदेड : नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़नायगाव तालुक्यातील राहेर येथील १३ व्या शतकातील यादवकालीन दगडी शिल्पकला असलेले हेमाडपंती नृसिंह मंदिर गोदावरी नदीकाठापासून ४ कि़ मी़ अंतरावर आहे़ गावाच्या पुनर्वसनामुळे हे मंदिर एकाकी पडले आहे़राहेरचे हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने ते स्वत: या मंदिराचे काम करीत नाहीत व दुसऱ्यांनाही करू देत नाहीत़ मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या वीटभट्ट््यामुळे मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे़यादवकालीन हेमाडपंती मंदिराचे वैभव टिकून राहण्यासाठी मंदिर समितीचे विश्वस्त धनंजय जोशी व ग्रामस्थांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला़ त्यामुळे पर्यटन विभागाकडून ७७ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला़ या निधीतून मंदिर परिसरात बागबगीचा, मुख्य रस्त्याला कमान व अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत़ परंतु या रस्त्यावरून जड वाहनांची रहदारी सुरू असल्याने रस्त्याची चाळणी होत आहे़ या मार्गावरून जड वाहने थांबविणे गरजेचे आहे़संतांनी आणली राहेरला ईश्वराची पालखी

  • राहेरच्या गोदाकाठी संत बाळगीर महाराज, मायानदेव प्रभू, चक्रधर स्वामी, दासगणू महाराज आदींचे वास्तव्य होवून गेले़ तीर्थक्षेत्र राहेरचे मंदिर १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे़
  • ध्यानधारणेसाठी ही जागा पवित्र व रमणीय आहे़ या ठिकाणी संतांनी व महात्म्यांनी इशप्राप्तीसाठी प्रयत्न केले़ ही जागा पावित्र्य जपल्याने वंदनीय झाली़ नदीकाठच्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत गोदाकाठी नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, राहेर, संगम, कंदकुर्ती, बासर या ठिकाणी संत-महात्म्यांनी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे़
  • तीर्थक्षेत्र राहेर सर्व देवांचे माहेरघर म्हणून परिचित आहे़ राहेरला तीर्थक्षेत्र घडविण्यासाठी संत महात्म्यांनी ईश्वराची पालखी आणली असे म्हटले जाते़ महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचे दीर्घकाळ वास्तव्य व त्यांच्या कार्यकाळातील योगदान महत्त्वाचे मानले जाते़
टॅग्स :NandedनांदेडhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण