शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

१३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:31 IST

नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़

ठळक मुद्देराहेरच्या हेमाडपंती नृसिंह मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; मंदिराला वीटभट्ट्यांचा विळखा

भारत दाढेल।नांदेड : नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़नायगाव तालुक्यातील राहेर येथील १३ व्या शतकातील यादवकालीन दगडी शिल्पकला असलेले हेमाडपंती नृसिंह मंदिर गोदावरी नदीकाठापासून ४ कि़ मी़ अंतरावर आहे़ गावाच्या पुनर्वसनामुळे हे मंदिर एकाकी पडले आहे़राहेरचे हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने ते स्वत: या मंदिराचे काम करीत नाहीत व दुसऱ्यांनाही करू देत नाहीत़ मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या वीटभट्ट््यामुळे मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे़यादवकालीन हेमाडपंती मंदिराचे वैभव टिकून राहण्यासाठी मंदिर समितीचे विश्वस्त धनंजय जोशी व ग्रामस्थांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला़ त्यामुळे पर्यटन विभागाकडून ७७ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला़ या निधीतून मंदिर परिसरात बागबगीचा, मुख्य रस्त्याला कमान व अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत़ परंतु या रस्त्यावरून जड वाहनांची रहदारी सुरू असल्याने रस्त्याची चाळणी होत आहे़ या मार्गावरून जड वाहने थांबविणे गरजेचे आहे़संतांनी आणली राहेरला ईश्वराची पालखी

  • राहेरच्या गोदाकाठी संत बाळगीर महाराज, मायानदेव प्रभू, चक्रधर स्वामी, दासगणू महाराज आदींचे वास्तव्य होवून गेले़ तीर्थक्षेत्र राहेरचे मंदिर १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे़
  • ध्यानधारणेसाठी ही जागा पवित्र व रमणीय आहे़ या ठिकाणी संतांनी व महात्म्यांनी इशप्राप्तीसाठी प्रयत्न केले़ ही जागा पावित्र्य जपल्याने वंदनीय झाली़ नदीकाठच्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत गोदाकाठी नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, राहेर, संगम, कंदकुर्ती, बासर या ठिकाणी संत-महात्म्यांनी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे़
  • तीर्थक्षेत्र राहेर सर्व देवांचे माहेरघर म्हणून परिचित आहे़ राहेरला तीर्थक्षेत्र घडविण्यासाठी संत महात्म्यांनी ईश्वराची पालखी आणली असे म्हटले जाते़ महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचे दीर्घकाळ वास्तव्य व त्यांच्या कार्यकाळातील योगदान महत्त्वाचे मानले जाते़
टॅग्स :NandedनांदेडhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण