शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

१३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:31 IST

नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़

ठळक मुद्देराहेरच्या हेमाडपंती नृसिंह मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; मंदिराला वीटभट्ट्यांचा विळखा

भारत दाढेल।नांदेड : नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़नायगाव तालुक्यातील राहेर येथील १३ व्या शतकातील यादवकालीन दगडी शिल्पकला असलेले हेमाडपंती नृसिंह मंदिर गोदावरी नदीकाठापासून ४ कि़ मी़ अंतरावर आहे़ गावाच्या पुनर्वसनामुळे हे मंदिर एकाकी पडले आहे़राहेरचे हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने ते स्वत: या मंदिराचे काम करीत नाहीत व दुसऱ्यांनाही करू देत नाहीत़ मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या वीटभट्ट््यामुळे मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे़यादवकालीन हेमाडपंती मंदिराचे वैभव टिकून राहण्यासाठी मंदिर समितीचे विश्वस्त धनंजय जोशी व ग्रामस्थांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला़ त्यामुळे पर्यटन विभागाकडून ७७ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला़ या निधीतून मंदिर परिसरात बागबगीचा, मुख्य रस्त्याला कमान व अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत़ परंतु या रस्त्यावरून जड वाहनांची रहदारी सुरू असल्याने रस्त्याची चाळणी होत आहे़ या मार्गावरून जड वाहने थांबविणे गरजेचे आहे़संतांनी आणली राहेरला ईश्वराची पालखी

  • राहेरच्या गोदाकाठी संत बाळगीर महाराज, मायानदेव प्रभू, चक्रधर स्वामी, दासगणू महाराज आदींचे वास्तव्य होवून गेले़ तीर्थक्षेत्र राहेरचे मंदिर १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे़
  • ध्यानधारणेसाठी ही जागा पवित्र व रमणीय आहे़ या ठिकाणी संतांनी व महात्म्यांनी इशप्राप्तीसाठी प्रयत्न केले़ ही जागा पावित्र्य जपल्याने वंदनीय झाली़ नदीकाठच्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत गोदाकाठी नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, राहेर, संगम, कंदकुर्ती, बासर या ठिकाणी संत-महात्म्यांनी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे़
  • तीर्थक्षेत्र राहेर सर्व देवांचे माहेरघर म्हणून परिचित आहे़ राहेरला तीर्थक्षेत्र घडविण्यासाठी संत महात्म्यांनी ईश्वराची पालखी आणली असे म्हटले जाते़ महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचे दीर्घकाळ वास्तव्य व त्यांच्या कार्यकाळातील योगदान महत्त्वाचे मानले जाते़
टॅग्स :NandedनांदेडhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण