शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:17 IST

जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे़ मागील आठवडाभरापासून नांदेडचा पारा ४४ अंशावर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ सोमवारी नांदेडचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़

ठळक मुद्देशहरात रस्त्यांवर शुकशुकाटवाढते तापमान, वातावरणामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ

नांदेड : जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे़ मागील आठवडाभरापासून नांदेडचा पारा ४४ अंशावर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ सोमवारी नांदेडचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़यंदाच्या उन्हाळ्यातील मे महिना हा सर्वाधिक उष्ण राहिला़ मे महिन्यात नांदेडचे तापमान ४५ अंशापर्यंत गेले होते़ मागील पंधरा दिवसांपासून नांदेडचे तापमान ४४ अंशावरच राहिले आहे़ त्यामुळे नागरिक होरपळून निघाले आहेत़ उन्हामुळे नागरिकांना तापाचे आजार होत असून शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्ण उपचारासाठी गर्दी करत आहेत़ दरम्यान, हवामान विभागाने आणखी चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे नागरिकांनी डोक्याला रूमाल बांधून व गॉगल लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़जिल्ह्यात दुष्काळ गंभीर बनला आहे़ शहरासह सर्वच तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ शासनाच्या वतीने उपाययोजना केवळ कागदावरच राबविल्या जात असल्याचे चित्र आहे़ नांदेड शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ मात्र तो अपुरा पडत आहे़ नळाला दर चार दिवसांनी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे़ अनेकांच्या बोअरचे पाणी आटले आहे़ त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ग्रामीण भागातही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी पाण्यासाठी उन्हात रांगा लागत आहेत़ त्यामुळे ऊन लागत असल्याच्या घटना वाढल्या आहेत़३१ मे पर्यंत राहणार ४५ अंश सेल्सिअस तापमानजिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान २५ मे रोजी ४५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले, अशी माहिती हवामान निरिक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली़ पुढील तीन दिवस तापमान ४४ अंशावर राहणार आहे़ २६ मे रोजी किमान २९ अंश तर कमाल तापमान ४४ अंश नोंदल्या गेले़ २७ व २८ मे रोजी किमान २९ अंश तर कमाल तापमान ४४ अंश राहणार आहे़२९ मे रोजी किमान ३० तर कमाल ४५ अंश सेल्सिअस, ३० व ३१ मे रोजी कमाल ४५ अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये़ तसेच उन्हात जाताना डोक्याला रूमाल व चष्मा घालणे आवश्यक आहे़

टॅग्स :NandedनांदेडTemperatureतापमान