शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

'तो' भर रस्त्यात गाडीच्या नुकसान भरपाईसाठी अडून राहिला व पुढच्याच क्षणी त्याला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 16:25 IST

समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देसमोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने यामुळे समीरची पिकअप त्यावर धडकली यामध्ये पिकअपचे बरेच नुकसान झाले. नुकसान पाहण्यासाठी पिकअप खाली पाहत असताना मागून आलेल्या अन्य एका भरधाव ट्रकने (MH-40AK-2977 ) पिकअपला जोराची धडक दिली.

नांदेड : समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला.  हा विचित्र अपघात आज सकाळी ६ वाजता पैनंगंगा नदीवर झाला. 

माणसाचा मृत्यू अटळ असतो पण तो कुठे व कसा होईल याचा कोणास अंदाज नसतो, याचीच प्रचीती आज सकाळी पैनगंगा नदीवर हदगाव उमरखेड रस्त्यावर झालेल्या अपघातात आली. या बाबत अधिक माहिती अशी कि, पुसद येथिल समीर खान हा त्याच्या पिकअपमध्ये (MH -29 AT-0201) लातूर येथून पुसदला एकाचे दुध भाड्याने घेऊन जात होता. यावेळी गाडीत त्याचा मिञ कुणाल कांबळे व दुध विक्रेते विठ्ठल दोडके हे होते. गाडी सकाळी 4:30 वाजता हदगाव तालुक्यातील पैनंगंगा नदी च्या पुलावरुन जात असताना समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे समीरची पिकअप त्यावर धडकली यामध्ये पिकअपचे बरेच नुकसान झाले. यावेळी झालेले नुकसान पाहण्यासाठी तिघेही खाली उतरले.  

गाडीचे झालेले नुकसान पाहून समीर ट्रक चालकाला नुकसान भरपाई देण्याबाबत बोलत होता. तसेच त्याने ट्रकच्या चाव्यासुद्धा काढून घेतल्या व नुकसान भरपाईसाठी अडून राहिला. काही वेळाने तिघेही पिकअपचे झालेले नुकसान पाहण्यासाठी पिकअप खाली पाहत असताना मागून आलेल्या अन्य एका भरधाव ट्रकने (MH-40AK-2977 ) पिकअपला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती कि, समीर व कुणाल यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला व ते जागीच गतप्राण झाले, तर विठ्ठल गंभीर जखमी झाले. 

नातेवाईकांना बसला धक्का अपघात झाला तेव्हा समीर ने गावाकडे नातेवाईकांना फोन करून  अपघाताची माहिती दिली होती. यावेळी त्याने केवळ गाडीचे नुकसान झाले आहे असे सांगितले होते. परंतु, घटनास्थळी येताच दोघांचे मृतदेह दिसल्याने त्यांना धक्काच बसला. दरम्यान, या विचित्र अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास विस्कळीत होती. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे, दत्ताञेय वाघमारे, सुदर्शन बेग व ऊमरखेडच्या पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन  वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :Accidentअपघात