शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हदगाव तालुका बीजगुणन केंद्र नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:48 IST

मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़

ठळक मुद्देकेंद्र सुरू की बंद हेच शेतकऱ्यांना कळेना!

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़या केंद्राचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुरीचे बीज जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़ ज्या वाणाला जास्त उतार आला ते वाण पुढच्या वर्षी शेतक-यांनी वापरावे यासाठी मार्गदर्शन केले जाते़ हा हेतू या केंद्राचा आहे़परंतु आजघडीला या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही? याचा प्रश्न शेतक-यांना पडतो़दरवर्षी या जमिनीत लागवड केलेल्या पिकाची माहिती व झालेल्या उत्पन्नाची माहिती देणे बंधनकारक आहे़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बीज गुणन केंद्राची शेती ही शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली केली जाते़ त्यामुळे येथील पिकांना येणारा उतारा जास्त असायला पाहिजे़ सतत पेरणीपासून काढणीपर्यंत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी शिबीर घेणे महत्त्वाचे आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून तसे शिबीर येथे झाले नाही़पेरणीकाळात जिल्ह्याच्या बीजगुणन केंद्रातून अल्पभूधारक, मागासवर्गीय शेतकºयांना अर्ध्या किमतीमध्ये तूर, ज्वारी, उडीद, मूग यांच्या बॅगा दिल्या जातात़ परंतु दरवर्षी ठरलेली मंडळीच याचा लाभ घेताना दिसतातक़ेंद्राच्या आजूबाजूला तीस-पस्तीस खेडी आहेत़ तेथील प्रत्येक शेतक-यांना या केंद्राची माहिती असायला पाहिजे. मात्र ती नाही़ बोटावर मोजण्याएवढीच शेतकºयांची येथे ऊठबस असते़ परंतु, सामान्य शेतकºयांना या केंद्राची माहिती देवून त्याचा फायदा पोहोचविण्याचे काम कर्मचा-यांनी करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत़२़३६ हेक्टर परिसरात इमारत उभीया केंद्राचा फायदा शेतकºयांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकाचे बीज या जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही, याचा प्रश्न शेतकºयांना पडतो़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी