शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

हदगाव तालुका बीजगुणन केंद्र नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:48 IST

मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़

ठळक मुद्देकेंद्र सुरू की बंद हेच शेतकऱ्यांना कळेना!

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे केंद्र येथे उभारले, मात्र अद्याप ते सुरू आहे की नाही? याचीही माहिती शेतक-यांना नाही़या केंद्राचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुरीचे बीज जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़ ज्या वाणाला जास्त उतार आला ते वाण पुढच्या वर्षी शेतक-यांनी वापरावे यासाठी मार्गदर्शन केले जाते़ हा हेतू या केंद्राचा आहे़परंतु आजघडीला या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही? याचा प्रश्न शेतक-यांना पडतो़दरवर्षी या जमिनीत लागवड केलेल्या पिकाची माहिती व झालेल्या उत्पन्नाची माहिती देणे बंधनकारक आहे़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बीज गुणन केंद्राची शेती ही शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली केली जाते़ त्यामुळे येथील पिकांना येणारा उतारा जास्त असायला पाहिजे़ सतत पेरणीपासून काढणीपर्यंत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी शिबीर घेणे महत्त्वाचे आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून तसे शिबीर येथे झाले नाही़पेरणीकाळात जिल्ह्याच्या बीजगुणन केंद्रातून अल्पभूधारक, मागासवर्गीय शेतकºयांना अर्ध्या किमतीमध्ये तूर, ज्वारी, उडीद, मूग यांच्या बॅगा दिल्या जातात़ परंतु दरवर्षी ठरलेली मंडळीच याचा लाभ घेताना दिसतातक़ेंद्राच्या आजूबाजूला तीस-पस्तीस खेडी आहेत़ तेथील प्रत्येक शेतक-यांना या केंद्राची माहिती असायला पाहिजे. मात्र ती नाही़ बोटावर मोजण्याएवढीच शेतकºयांची येथे ऊठबस असते़ परंतु, सामान्य शेतकºयांना या केंद्राची माहिती देवून त्याचा फायदा पोहोचविण्याचे काम कर्मचा-यांनी करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत़२़३६ हेक्टर परिसरात इमारत उभीया केंद्राचा फायदा शेतकºयांना व्हावा यासाठी जवळपास २० हेक्टर जमिनीमध्ये या केंद्राची सुरुवात १९५८ मध्ये करण्यात आली़ यामध्ये पिकाखालील क्षेत्र १६ हेक्टर आहे़ इमारतीचे क्षेत्र २़३६ हेक्टरमध्ये आहे़ येथे आजघडीला दोन कर्मचारी आहेत़ सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकाचे बीज या जमिनीत लावून नवनवीन आलेल्या पिकांची येथे परीक्षा घेतली जाते़या केंद्राच्या दर्शनी भिंतीवर सन १९९६-९७ च्या पिकाच्या वाणाची माहिती लिहिलेली आहे़ त्यामुळे नंतर या जमिनीत इतर वाण लावले की नाही, याचा प्रश्न शेतकºयांना पडतो़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी