शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

निधी वाटपात पालकमंत्री रामदास कदम यांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:11 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सर्व गटांना योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे़ मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन-चार सदस्यांना दीड ते दोन कोटींचा निधी वाटप केल्याचा आरोप करीत निधी वाटपात अशी मनमानी केल्यास आम्ही आमच्या गटामध्ये विकासकामे कशी करायची? असा सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सर्व गटांना योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे़ मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन-चार सदस्यांना दीड ते दोन कोटींचा निधी वाटप केल्याचा आरोप करीत निधी वाटपात अशी मनमानी केल्यास आम्ही आमच्या गटामध्ये विकासकामे कशी करायची? असा सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला़

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचे सर्वाधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे़ मात्र ठरावीक सदस्यांना कामे दिल्याचे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह बारा सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिका-यांची भेट घेतली़ जिल्हा नियोजन समितीवर २९ सदस्य निवडून आले आहेत़ या सर्व सदस्यांना आपआपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी हवा आहे़ मात्र काही मोजक्या जिल्हा परिषद सदस्यांना निधी दिला गेल्याचे या सदस्यांचे म्हणणे होते़ जिल्हाधिका-यांशी चर्चेवेळी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, गटनेते प्रकाश भोसीकर, माणिकराव लोहगावे, अध्यक्ष तसेच काही जि. प. सदस्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

यावेळी समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकारी डोंगरे यांनी निधी वाटपासंदर्भातील निर्णय ही पालकमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले. त्यांच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करु शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले. दरम्यान, याबाबत उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून सदर प्रकार काँग्रेस नेते खा़ अशोकराव चव्हाण यांच्या कानावरही घालणार असून त्यानंतर वरिष्ठांच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येणार आहे़

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमcollectorतहसीलदारguardian ministerपालक मंत्रीzpजिल्हा परिषद