शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ग्रामपंचायतेचा ठराव; ग्रामस्थांनीही केले अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 16:36 IST

वाईन विक्रीच्या निर्णया विरोधात ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

अर्धापूर ( नांदेड ) : तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी वाईन विक्री संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत शुक्रवारी अन्यत्याग आंदोलन ( दि.११ ) केले. धान्यापासून बनणाऱ्या बिअरमुळे धान्याच्या किंमती वाढल्या नाहीत, तर वाईनमुळे फळाच्या किंमती कशा वाढतील असा सवाल आंदोलकांनी केला.

राज्य सरकारच्या किराणा दुकानावर वाईन विक्रीच्या निर्णयाने सडकून टीका होत आहे. या निर्णयाने तरुण पिढी बरबाद होईल, यामुळे राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होत आहे. या निर्णयाविरोधात तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरूदेव सेवा मंडळचे जिल्हा प्रसारक गजानन योगाजी आबादार यांनी हनुमान मंदिरासमोर अन्यत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनास प्रहार चे तालुकाध्यक्ष छगन पा. सांगोळे, भारतराव आंबोरे, किसन दुकानदार जाधव, बळीराम आबादार, दत्‍तरामजी इंगोले,सरपंच संभाजी पांचाळ,उपसरपंच उद्धवराव आबादार, ग्रा.स.भगत जाधव,नारायण आबादार,राजू पाटील आबादार यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी पाठिंबा दिला. 

वाईन विक्री विरोधात  ग्रामपंचायतीचा ठरावराज्य सरकारने वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. यावेळी सरपंच संभाजी पांचाळ,उपसरपंच सुनीताबाई आबादार,वंदनाबाई सांगोळे,पंचफुलाबाई पिंपळे,अम्रपाल वाघमारे, शुभम जाधव, दिगंबर जाधव,सुमनबाई आबादार,प्रियंका वाघमारे,ग्रामसेविका के.पी.जाधव आदींची उपस्थिती होती.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागेआदोलकांची मागणी राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ना.त. सुनील माचेवाड, तलाठी बालाजी माटे यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

ज्वारी, गव्हाचे भाव वाढले नाही फळांचे वाढणार का?शेतात पिकवलेल्या गव्हापासून ब्रेड, बिस्किट तर बियर ज्वारीपासून बनवली जाते. पण अद्यापही गहू आणि ज्वारीचे भाव वाढले नाहीत. मग वाईन विक्रीच्या निर्णयामुळे फळांचे भाव वाढणार का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडalcohol prohibition actदारुबंदी कायदाState Governmentराज्य सरकार