शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ग्रामीण साहित्याला उर्जा देणारे प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 14:45 IST

नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले.

ठळक मुद्देशैक्षणिक,  साहित्यिक,  सांस्कृतिक,  राजकीय, धार्मिक  आणि सामाजिक क्षेत्राला त्यांनी समृद्ध केले. कथा , कादंबरी ,  कविता व  वैचारिक लेख या प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  

उमरी (नांदेड) : सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , निवृत्त प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे मंगळवारी ( दि. २७ ) सकाळी निधन झाले. 

गोदाकाठी वसलेल्या मनूर या गावाचे मनूरकर हे मुळचे रहिवासी होते.  केवळ ग.पी. मनुरकर यांच्या  नावामुळे या गावाची  संबंध महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे उत्तम उदाहरण म्हणजे मनूरकर गुरुजी. दहा वर्षे शिक्षक व २४  वर्षे मुख्याध्यापक अशी त्यांची उमरीतील शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द राहिली. राज्य शासनातर्फे त्यांचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव झाला.  उमरी परिसरात शैक्षणिक,  साहित्यिक,  सांस्कृतिक,  राजकीय, धार्मिक  आणि सामाजिक क्षेत्राला त्यांनी समृद्ध केले. 

कथा , कादंबरी ,  कविता व  वैचारिक लेख या प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  शहरात राहूनही गुरुजींची नाळ मनूर या गावाशी भक्कमपणे जोडलेली होती. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे.  असा मानस गुरुजींचा होता . म्हणून गावातील माणसं डोक्याने, विचाराने सुधारली पाहिजेत या हेतूने त्यांनी गावात आपल्या वडिलांच्या नावाने स्वखर्चातून  एक भलं मोठं वाचनालय उभारलं. गावात त्यांनी अनेक संमेलने घेतली. मात्र, आज त्याच गावात गुरुजींच्या निधनाने  शोककळा पसरली. शेकडो विद्यार्थी गुरुजींनी घडविले. हीच मुले आज महाराष्ट्रासह परदेशातही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज आज संपली. नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , एक मुलगी , सूना ,  जावई,  नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूliteratureसाहित्यNandedनांदेड