शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ग्रामीण साहित्याला उर्जा देणारे प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 14:45 IST

नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले.

ठळक मुद्देशैक्षणिक,  साहित्यिक,  सांस्कृतिक,  राजकीय, धार्मिक  आणि सामाजिक क्षेत्राला त्यांनी समृद्ध केले. कथा , कादंबरी ,  कविता व  वैचारिक लेख या प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  

उमरी (नांदेड) : सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक , निवृत्त प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे मंगळवारी ( दि. २७ ) सकाळी निधन झाले. 

गोदाकाठी वसलेल्या मनूर या गावाचे मनूरकर हे मुळचे रहिवासी होते.  केवळ ग.पी. मनुरकर यांच्या  नावामुळे या गावाची  संबंध महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे उत्तम उदाहरण म्हणजे मनूरकर गुरुजी. दहा वर्षे शिक्षक व २४  वर्षे मुख्याध्यापक अशी त्यांची उमरीतील शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द राहिली. राज्य शासनातर्फे त्यांचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव झाला.  उमरी परिसरात शैक्षणिक,  साहित्यिक,  सांस्कृतिक,  राजकीय, धार्मिक  आणि सामाजिक क्षेत्राला त्यांनी समृद्ध केले. 

कथा , कादंबरी ,  कविता व  वैचारिक लेख या प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  शहरात राहूनही गुरुजींची नाळ मनूर या गावाशी भक्कमपणे जोडलेली होती. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे.  असा मानस गुरुजींचा होता . म्हणून गावातील माणसं डोक्याने, विचाराने सुधारली पाहिजेत या हेतूने त्यांनी गावात आपल्या वडिलांच्या नावाने स्वखर्चातून  एक भलं मोठं वाचनालय उभारलं. गावात त्यांनी अनेक संमेलने घेतली. मात्र, आज त्याच गावात गुरुजींच्या निधनाने  शोककळा पसरली. शेकडो विद्यार्थी गुरुजींनी घडविले. हीच मुले आज महाराष्ट्रासह परदेशातही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज आज संपली. नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , एक मुलगी , सूना ,  जावई,  नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूliteratureसाहित्यNandedनांदेड