शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

गोवर्धन घाट पुलावरून जाताय? सावधान! खड्ड्यांमुळे वाढू शकते तुमची पाठदुखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

शहरातील बाफना ते हिंगोली नाका रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर गोवर्धनघाट पुलावरून जाताना वाहन रस्त्यावरून चाललेय, की खड्ड्यांतून, ...

शहरातील बाफना ते हिंगोली नाका रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर गोवर्धनघाट पुलावरून जाताना वाहन रस्त्यावरून चाललेय, की खड्ड्यांतून, असा प्रश्न वाहनात बसलेल्यांना पडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करूनदेखील कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. दरम्यान, पावसाळापूर्व डागडुजीच्या नावाखाली शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात ओतण्याचे काम महापालिकेने केले आहे. याकडे पालकमंत्री, आमदार, खासदारांनी लक्ष घालून खड्डेमुक्त रस्त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नांदेड - पूर्णा रस्ता

शहरातील छत्रपती चाैक येथून पुर्णेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वामनराव पावडे पेट्रोल पंपापासून ते पुढे जयभवानी चाैकापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही या रस्त्याचे भाग्य उजळलेले नाही.

बाफना रस्ता खड्डेमय

हिंगोली नाका ते बाफना टी पाॅईंट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील रेल्वे ब्रीजवर गजाळी वर येऊन अपघात घडत आहेत. परंतु, याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते सोडले, तर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे मणक्यांची झीज होते. पाठदुखीसह इतर आजारांना निमंत्रण मिळते. त्याचबरोबर गाडीच्या देखभाल-दुरुस्तीचाही खर्च वाढतो.

- संतोष पावडे, नागरिक

--

काैठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच जुना काैठा येथून साई मंदिर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत.

- प्रा. संदीप काळे, नागरिक

वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होतात. यामुळे खड्डे असलेल्या रस्त्याने ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनांची गती कमी ठेवून ये-जा करावी. शक्यतो ऑटोतून प्रवास करणे टाळावे. त्याचबरोबर कुठे लचक बसली, तर वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

- डॉ. सुरेश कदम, हाडांच्या आजाराचे तज्ज्ञ

वार्षिक निधीतून तात्पुरती कामे

जिल्हा नियोजन समिती तसेच महापालिकेच्या स्थायी समितीकडून मिळणाऱ्या निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. परंतु, पावसाळ्यात पुन्हा डांबर उखडून खड्डे पडतात. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे वर्षातून एक वेळ पूर्णपणे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.