शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

गोवर्धन घाट पुलावरून जाताय? सावधान! खड्ड्यांमुळे वाढू शकते तुमची पाठदुखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

शहरातील बाफना ते हिंगोली नाका रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर गोवर्धनघाट पुलावरून जाताना वाहन रस्त्यावरून चाललेय, की खड्ड्यांतून, ...

शहरातील बाफना ते हिंगोली नाका रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर गोवर्धनघाट पुलावरून जाताना वाहन रस्त्यावरून चाललेय, की खड्ड्यांतून, असा प्रश्न वाहनात बसलेल्यांना पडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करूनदेखील कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. दरम्यान, पावसाळापूर्व डागडुजीच्या नावाखाली शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात ओतण्याचे काम महापालिकेने केले आहे. याकडे पालकमंत्री, आमदार, खासदारांनी लक्ष घालून खड्डेमुक्त रस्त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नांदेड - पूर्णा रस्ता

शहरातील छत्रपती चाैक येथून पुर्णेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वामनराव पावडे पेट्रोल पंपापासून ते पुढे जयभवानी चाैकापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही या रस्त्याचे भाग्य उजळलेले नाही.

बाफना रस्ता खड्डेमय

हिंगोली नाका ते बाफना टी पाॅईंट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील रेल्वे ब्रीजवर गजाळी वर येऊन अपघात घडत आहेत. परंतु, याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते सोडले, तर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे मणक्यांची झीज होते. पाठदुखीसह इतर आजारांना निमंत्रण मिळते. त्याचबरोबर गाडीच्या देखभाल-दुरुस्तीचाही खर्च वाढतो.

- संतोष पावडे, नागरिक

--

काैठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच जुना काैठा येथून साई मंदिर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत.

- प्रा. संदीप काळे, नागरिक

वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होतात. यामुळे खड्डे असलेल्या रस्त्याने ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनांची गती कमी ठेवून ये-जा करावी. शक्यतो ऑटोतून प्रवास करणे टाळावे. त्याचबरोबर कुठे लचक बसली, तर वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

- डॉ. सुरेश कदम, हाडांच्या आजाराचे तज्ज्ञ

वार्षिक निधीतून तात्पुरती कामे

जिल्हा नियोजन समिती तसेच महापालिकेच्या स्थायी समितीकडून मिळणाऱ्या निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. परंतु, पावसाळ्यात पुन्हा डांबर उखडून खड्डे पडतात. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे वर्षातून एक वेळ पूर्णपणे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.