शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:16 IST

शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.

ठळक मुद्देमहापालिका : गोदावरी नदीत मिसळणारे शहरातील १७ नाले कायमस्वरूपी बंद, नवा प्रस्तावही शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.दक्षिण भारतातील काशी समजल्या जाणाºया नांदेडला गोदावरी नदीमुळे हे महत्त्व प्राप्त झाले आहे. भावनिकदृष्ट्या आजही गोदामातेचे स्थान भाविकांच्या मनात कायमच आहे; पण गोदावरी नदीची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. शहरातील १८ नाले थेट गोदापात्रात मिसळत होते. परिणामी गोदामातेचे पावित्र्य पूर्णत: लोप पावले होते.देशभरातून नांदेडला येणारे शीख भाविक आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाणारे नांदेड शहर व या ओळखीतून येणारे देशभरातील भाविक गोदावरीची अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त करीत होते. सामाजिक संस्थाही गोदावरीच्या या नदीकडे दुर्लक्षच करीत होते. केवळ ्रकागदोपत्री तक्रारी, निवेदने दिले जात होते. अशातच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. या दौºयात त्यांनी गोदावरी काठाची पाहणी केली. ९ जून २०१७ रोजी केलेल्या या दौºयात गोदावरीची अवस्था पाहून पर्यावरणमंत्री कदम यांनी तत्कालीन अधिकाºयांना चांगलेच खडसावले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हेही दाखल केले होते. त्या कारवाईनंतर महापालिका खडबडून जागी झाली. महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाच्या हालचालींना प्रारंभ केला.त्यातच पालकमंत्रीपदाचा पदभारही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडेच आला. त्यांनी गोदावरी नदीच्या शुद्धीकरणास प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले होते.महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम उघडताना प्रारंभी गोदावरी नदीत थेट मिसळणारे शहरातील १७ नाले बंद केले. गोदावरी काठावरुनच चार किलोमीटर अंतराची स्वतंत्र ड्रेनेजलाईन टाकली. चुनाल नाला उर्वशी घाट ते जुना पुलापर्यंत ६०० एम.एम. ते १ हजार एम.एम. व्यासाची पाईपलाईन टाकून गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले या पाईपलाईनला जोडले. परिणामी आज घडीला गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले पूर्णत: बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी गोदावरीत जाणे थांबले आहे.गोवर्धनघाट, बंदाघाट, नगिनाघाट, गायत्री मंदिर, शनि मंदिर, बालाजी नाला, गाडीपुरा नाला, बडी दर्गाह नाला, नावघाट नाल्यातून वाहणारे पाणी आता थेट देगलूर नाका पंपींग स्टेशनपर्यंत पोहोचविले जात आहे. हे पाणी पंपींग स्टेशनहून बोंढार जलशुद्धीकरण प्रकल्पात पाठविले जाते.एकूणच गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आता महापालिकेने आता कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. जवळपास २२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मान्यतेनंतर गोदावरी नदी निश्चितच प्रदूषणमुक्त होईल, असे पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले.गोदावरी शुद्धीकरणासाठी २२ कोटींचा प्रस्तावगोदावरी शुद्धीकरणाचे हे प्रयत्न सुरू ठेवतानाच महापालिकेने नव्याने २२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या नव्या प्रकल्पात शहरातील उर्वशी घाटावर ६ एमएलडी क्षमतेचे नवीन जल शुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच बडी दर्गाह ते देगलूरनाका दरम्यान मोठा उघडा नाला प्रस्तावित आहे.या नाल्याचे अंतर २ कि.मी. राहणार आहे. पावसाळ्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी हे पाणी पाईपलाईनमधून पूर्णपणे वाहणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा २ कि.मी.चा उघडा नाला प्रस्तावित केल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले.सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरजगोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.

 

सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरजगोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषणriverनदी