शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गोदावरीची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:16 IST

शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.

ठळक मुद्देमहापालिका : गोदावरी नदीत मिसळणारे शहरातील १७ नाले कायमस्वरूपी बंद, नवा प्रस्तावही शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.दक्षिण भारतातील काशी समजल्या जाणाºया नांदेडला गोदावरी नदीमुळे हे महत्त्व प्राप्त झाले आहे. भावनिकदृष्ट्या आजही गोदामातेचे स्थान भाविकांच्या मनात कायमच आहे; पण गोदावरी नदीची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. शहरातील १८ नाले थेट गोदापात्रात मिसळत होते. परिणामी गोदामातेचे पावित्र्य पूर्णत: लोप पावले होते.देशभरातून नांदेडला येणारे शीख भाविक आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाणारे नांदेड शहर व या ओळखीतून येणारे देशभरातील भाविक गोदावरीची अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त करीत होते. सामाजिक संस्थाही गोदावरीच्या या नदीकडे दुर्लक्षच करीत होते. केवळ ्रकागदोपत्री तक्रारी, निवेदने दिले जात होते. अशातच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. या दौºयात त्यांनी गोदावरी काठाची पाहणी केली. ९ जून २०१७ रोजी केलेल्या या दौºयात गोदावरीची अवस्था पाहून पर्यावरणमंत्री कदम यांनी तत्कालीन अधिकाºयांना चांगलेच खडसावले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हेही दाखल केले होते. त्या कारवाईनंतर महापालिका खडबडून जागी झाली. महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाच्या हालचालींना प्रारंभ केला.त्यातच पालकमंत्रीपदाचा पदभारही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडेच आला. त्यांनी गोदावरी नदीच्या शुद्धीकरणास प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले होते.महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम उघडताना प्रारंभी गोदावरी नदीत थेट मिसळणारे शहरातील १७ नाले बंद केले. गोदावरी काठावरुनच चार किलोमीटर अंतराची स्वतंत्र ड्रेनेजलाईन टाकली. चुनाल नाला उर्वशी घाट ते जुना पुलापर्यंत ६०० एम.एम. ते १ हजार एम.एम. व्यासाची पाईपलाईन टाकून गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले या पाईपलाईनला जोडले. परिणामी आज घडीला गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले पूर्णत: बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी गोदावरीत जाणे थांबले आहे.गोवर्धनघाट, बंदाघाट, नगिनाघाट, गायत्री मंदिर, शनि मंदिर, बालाजी नाला, गाडीपुरा नाला, बडी दर्गाह नाला, नावघाट नाल्यातून वाहणारे पाणी आता थेट देगलूर नाका पंपींग स्टेशनपर्यंत पोहोचविले जात आहे. हे पाणी पंपींग स्टेशनहून बोंढार जलशुद्धीकरण प्रकल्पात पाठविले जाते.एकूणच गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आता महापालिकेने आता कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. जवळपास २२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मान्यतेनंतर गोदावरी नदी निश्चितच प्रदूषणमुक्त होईल, असे पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले.गोदावरी शुद्धीकरणासाठी २२ कोटींचा प्रस्तावगोदावरी शुद्धीकरणाचे हे प्रयत्न सुरू ठेवतानाच महापालिकेने नव्याने २२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या नव्या प्रकल्पात शहरातील उर्वशी घाटावर ६ एमएलडी क्षमतेचे नवीन जल शुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच बडी दर्गाह ते देगलूरनाका दरम्यान मोठा उघडा नाला प्रस्तावित आहे.या नाल्याचे अंतर २ कि.मी. राहणार आहे. पावसाळ्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी हे पाणी पाईपलाईनमधून पूर्णपणे वाहणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा २ कि.मी.चा उघडा नाला प्रस्तावित केल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले.सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरजगोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.

 

सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरजगोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषणriverनदी