शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील विभागीय कार्यालयांच्या स्थलांतरणाचा घाट - अशोक चव्हाण

By admin | Updated: April 22, 2017 17:46 IST

नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, मराठवाड्यातील सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 22 - एका पाठोपाठ नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, मराठवाड्यातील सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प आहेत. त्याचवेळी मराठवाड्यातील प्रकल्पांना निधी द्यायचा नाही, विकासाचे प्रश्न प्रलंबित ठेवायाचे हा जणू सरकारचा अजेंडाच आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी  केली़.

जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकास प्रश्नासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, नांदेडमधील पत्रसूचना कार्यालय विरोधानंतरही स्थलांतरित झाले़ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कार्यालयही औरंगाबादला स्थलांतरित झाले आहे. आता बँकांच्या विलीनीकरणानंतर स्टेट बँक आॅफ इंडियाचे झोनल कार्यालय स्थलांतरण हालचालींना वेग आला आहे़ इतकेच नव्हे, औरंगाबादचे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे लेखापरीक्षण कार्यालयही नाशिकला हलवले जात आहे. यावर मराठवाड्यातील भाजपा-सेनेचे पदाधिकारी शांत आहेत. दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी आणलेली कार्यालये इतरत्र हलवली जात आहेत़ त्यामुळे या भागातील जनतेची गैरसोय होणार आहे.

संघर्ष यात्रेबद्दल ते म्हणाले, सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला संघर्षयात्रा काढावी लागत आहे़ शेतकरी आत्महत्यांचा राज्यात उच्चांक गाठलेला असताना, सभागृहात मात्र या विषयावर बोलले जात नाही़ आत्महत्येच्या विषयावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची भाषणे सुरु आहेत़ दुसरीकडे दीड लाखांच्या कर्जासाठी शेतकऱ्याची मुलगी आत्महत्या करते़ संवेदनशीलता हरवलेल्या सरकारला सत्तेचा उन्माद आला आहे़ त्यामुळे हे मुद्दे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही संघर्षयात्रा सुरु केली आहे़ आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास झाला आहे.

मोदी, मोदी नंतर आता योगी योगी सुरु आहे, यावर ते म्हणाले, सध्याचे सरकार हे इव्हेन्ट मॅनजमेंटमध्ये गुंतले आहे़ निवडणुकीतील विजय वेगळा अन् प्रशासन चालविणे वेगळे़ हे जास्त दिवस चालणार नाही़ देशपातळीवर समविचारी पक्षांची एकत्र येण्याची मानसिकता तयार होत आहे़ त्यामुळे येत्या काळात राज्यातही सत्तापरिवर्तन होईल.

रेल्वे वेळापत्रकाच्या संदर्भाने खा़चव्हाण म्हणाले, रेल्वेचे अधिकारी अन् खाजगी ट्रॅव्हल्सचालकांमध्ये साटेलोटे आहे. नांदेडहून पुणे गाडी सोडण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात आला़ त्यानंतर ही गाडी सोडण्यात आली़, परंतु त्याचे वेळापत्रक नागरिकांना कसे त्रासदायक ठरेल याचीच अधिक दक्षता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतली़ नागपूर गाडीची अवस्थाही तशीच आहे़ गाड्या सुरु करायच्या अन् त्याबाबत प्रसिद्धीच करायची नाही़ मग प्रतिसाद भेटला नसल्याचे कारण दाखवित त्या पुन्हा बंद करायच्या असा उद्योग सुरु आहे़ यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी यापूर्वीच केली असल्याचेही खा़चव्हाण म्हणाले.

दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासंदर्भात ते म्हणाले, प्रभू चांगले व्यक्ती आहेत, परंतु गाड्यातील टॉयलेट, वायफाय यापुढे ते जात नाहीत़ विमानसेवेचेही तसेच भिजत घोंगडे आहे़ सरकारने एअर इंडियाची दोन विमाने घेतली़, परंतु त्यातील एक विमान गुजरात आणि दुसरे आंध्र प्रदेशात देण्यात आले़ राज्यात ३० विमानतळे असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. नांदेडच्या धावपट्टीचे विस्तारिकरण करण्यासाठी आम्हाला भांडावे लागले. २००८ मध्ये नांदेडचे विमानतळ झाले़ या ठिकाणी नाईट लँडींगची व्यवस्था आहे, परंतु धावपट्टीचे अद्याप नूतनीकरण झाले नाही़ यावेळी माजी राज्यमंत्री आ़डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती.

परभणीत काँग्रेसला यश तर लातुरात भाजपाचा निसटता विजयनांदेडमध्ये लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपालिका त्यापाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला जनतेने साथ दिली़ हेच चित्र अन्यत्र का दिसत नाही ? या प्रश्नावर खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले, परभणीत यश मिळाले़ लातुरातही भाजपाला निसटता विजय मिळाला़ तीन जागांचा फरक आहे़ परंतु आता विश्लेषणच सत्तेच्या बाजूने सुरु आहे़ परंतु जिथे कमी पडलो तिथे आत्मपरीक्षण करुन पुढे जाऊ़ येणाऱ्या काळात राज्यात सत्तापरिवर्तन अटळ आहे, समविचारी पक्षांना सोबत घेऊ़ परभणीमध्येही समविचारी पक्षांच्या सोबत जाण्याची तयारी आहे़ याबाबत स्थानिक पातळीवर सकारात्मक विचार होईल असेही ते म्हणाले.