शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:38 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्क‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.जिल्ह्यात वर्ष २०१२ मध्ये जिल्ह्यात शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ९० हजार १४३ कुटुंबाकडे शौचालय असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय बांधकामांना गती मिळाली. अभियानांतर्गत राज्यासह जिल्ह्याला शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०१८ डेडलाईन देण्यात आली होती. अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.दरम्यान, नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती. तसेच ज्या भागांत उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘गुड मॉर्निंग ’ पथकाची स्थापना करण्यात आली. अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये एकूण १ लाख ९२ हजार ३८७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ११ हजार ८१३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच भोकर तालुक्यातील १८ हजार ३२२, बिलोली- २३ हजार ५५७, देगलूर तालुका- २८ हजार ५८६, धर्माबाद- ११ हजार ५८२, हदगाव तालुका - ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट - ४१ हजार ०४३, लोहा तालुका- ३६ हजार ६२३, माहूर- १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यातील १५ हजार ९०५ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३ लाख १९ हजार १४३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.३१ मार्चपूर्वी हगणदारीमुक्त झालेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नांदेड, वाशिम, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर