शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:38 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्क‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.जिल्ह्यात वर्ष २०१२ मध्ये जिल्ह्यात शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ९० हजार १४३ कुटुंबाकडे शौचालय असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय बांधकामांना गती मिळाली. अभियानांतर्गत राज्यासह जिल्ह्याला शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०१८ डेडलाईन देण्यात आली होती. अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.दरम्यान, नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती. तसेच ज्या भागांत उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘गुड मॉर्निंग ’ पथकाची स्थापना करण्यात आली. अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये एकूण १ लाख ९२ हजार ३८७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ११ हजार ८१३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच भोकर तालुक्यातील १८ हजार ३२२, बिलोली- २३ हजार ५५७, देगलूर तालुका- २८ हजार ५८६, धर्माबाद- ११ हजार ५८२, हदगाव तालुका - ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट - ४१ हजार ०४३, लोहा तालुका- ३६ हजार ६२३, माहूर- १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यातील १५ हजार ९०५ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३ लाख १९ हजार १४३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.३१ मार्चपूर्वी हगणदारीमुक्त झालेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नांदेड, वाशिम, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर