शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:38 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्क‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.जिल्ह्यात वर्ष २०१२ मध्ये जिल्ह्यात शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ९० हजार १४३ कुटुंबाकडे शौचालय असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय बांधकामांना गती मिळाली. अभियानांतर्गत राज्यासह जिल्ह्याला शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०१८ डेडलाईन देण्यात आली होती. अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.दरम्यान, नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती. तसेच ज्या भागांत उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘गुड मॉर्निंग ’ पथकाची स्थापना करण्यात आली. अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये एकूण १ लाख ९२ हजार ३८७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ११ हजार ८१३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच भोकर तालुक्यातील १८ हजार ३२२, बिलोली- २३ हजार ५५७, देगलूर तालुका- २८ हजार ५८६, धर्माबाद- ११ हजार ५८२, हदगाव तालुका - ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट - ४१ हजार ०४३, लोहा तालुका- ३६ हजार ६२३, माहूर- १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यातील १५ हजार ९०५ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३ लाख १९ हजार १४३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.३१ मार्चपूर्वी हगणदारीमुक्त झालेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नांदेड, वाशिम, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर