शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:38 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्क‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.जिल्ह्यात वर्ष २०१२ मध्ये जिल्ह्यात शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ९० हजार १४३ कुटुंबाकडे शौचालय असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय बांधकामांना गती मिळाली. अभियानांतर्गत राज्यासह जिल्ह्याला शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०१८ डेडलाईन देण्यात आली होती. अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.दरम्यान, नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती. तसेच ज्या भागांत उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘गुड मॉर्निंग ’ पथकाची स्थापना करण्यात आली. अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये एकूण १ लाख ९२ हजार ३८७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ११ हजार ८१३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच भोकर तालुक्यातील १८ हजार ३२२, बिलोली- २३ हजार ५५७, देगलूर तालुका- २८ हजार ५८६, धर्माबाद- ११ हजार ५८२, हदगाव तालुका - ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट - ४१ हजार ०४३, लोहा तालुका- ३६ हजार ६२३, माहूर- १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यातील १५ हजार ९०५ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३ लाख १९ हजार १४३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.३१ मार्चपूर्वी हगणदारीमुक्त झालेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नांदेड, वाशिम, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर