शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडसह चार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वायफाय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:31 IST

रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे.

ठळक मुद्देनरसापूर, जालना, परभणी स्थानकांवर मिळणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने वर्ष २०१७ मध्ये नांदेड रेल्वे प्रबंधक मंडळातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना वायफायची सुविधा देणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने औरंगाबाद रेल्वे स्थानकावर वर्ष २०१७ मध्ये नि:शुल्क वायफाय सुविधेला सुरूवात करण्यात आली. परंतु, नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा सुरू होऊ शकली नाही.दरम्यान, नांदेड रेल्वे प्रबंधक मंडळाच्या तांत्रिक विभागाने सर्व अडचणी दूर करून नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर या वर्षीपासून वायफायची सुविधा सुरू केली आहे. परंतु, सद्यस्थितीत रेल्वे प्रशासनाच्या वतीने अधिकृतरीत्या वायफाय सेवेचे उद्घाटन केलेले नाही. मात्र येत्या काही दिवसांत रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर अधिकृतरीत्या या सेवेचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.३० मिनिटे घेता येईल सुविधेचा लाभप्रवासी ३० मिनिटांपर्यंत या सेवेचा मोफत लाभ घेऊ शकतात. त्यानंतर सदर सुविधा बंद होईल. जर एखाद्या प्रवाशाला यापेक्षा जास्त वेळ सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास संबंधित प्रवाशाला दुसरा मोबाईल क्रमांक देऊन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.अखंडित वायफाय सेवेसाठी ३१ मोडेमची व्यवस्थानांदेड येथील श्री हुजूर साहिब रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना नि:शुल्क व अखंडित वायफाय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ३१ मोडेम बसविण्यात आले असून या मोडेमची रेंज ही ५० मीटरपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे वायफायची स्पीड ही ‘एक जीबी’ राहिल्यामुळे प्रवासी अर्धा तास या सेवेचा लाभ घेऊ शकतात.प्रवाशांनी अशी घ्यावी वायफायची सुविधारेल्वे स्थानकावर प्रवासी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलचे वायफाय सुरू केल्यानंतर वायफाय कनेक्ट होईल. त्यानंतर संबंधित मोबाईलधारक प्रवाशांना सर्वप्रथम त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. आणि तो क्रमांक टाकताच प्रवाशांना ३० मिनिटापर्यंत नि:शुल्क वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :WiFiवायफायJalanaजालनाparabhaniपरभणी