शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

चार टँकरने भागतेय नागरिकांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:53 IST

जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे.

ठळक मुद्देकंधार तालुका : तांड्यावर पाण्यासाठी कसरत

कंधार : जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे. तालुक्यात चार टँकरचा शिरकाव झाला आहे. कुरूळा, रेखातांडा, पोमातांडा, नरपटवाडी, जिवलातांडा येथील नागरिकांची तहान टँकरवर भागत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे. हरीलालतांडा, बदुतांडा, शिराढोणतांडा येथे पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याचे चित्र असून टँकरच्या प्रतीक्षेत गावे आहेत.मागील वर्षी सरासरी पर्जन्यमान झाले नसल्याने नदी- नाले, तलाव, प्रकल्पात जलसाठे वाढले नाहीत. गत काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाणीसमस्या वाढत आहे. पाणीटंचाई प्रश्रावर उपाययोजना करण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न केले गेले. दोन टप्प्याचा कृती आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला. तो उशिरा पाठविला अन् उशिरा मंजुरी मिळाली. त्यामुळे अंमलबजावणी उशीरच होईल, हे अपेक्षित होते.जानेवारी ते मार्च या कालावधीचा ५ कोटी १ लाख ३४ हजारांच्या खर्चास आणि ३९४ उपाययोजना करण्यास मंजुरी मिळाली. परंतु, अंमलबजावणी करण्यास मुहूर्त लांबत गेला. नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, विहिरी खोल करणे/गाळ काढणे या उपाययोजना नावालाच राहिल्या. त्यासाठीचे प्रस्ताव, अंदाजपत्रक यातच वेळ गेला.एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांड्यावर पाणीपुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणीटंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.दुसऱ्या टप्प्यात उस्माननगर, आलेगाव, हाळदा, हणमंतवाडी, शेकापूर, तेलूर, कागणेवाडी, टोकवाडी, बोरी खु., चौकीतांडा, दैठणा, देवईचीवाडी, मजरे धर्मापुरी, धर्मापुरीतांडा, गुलाबवाडी, गुलाबवाडीतांडा, बिंडा, दिंडा, गुंडा, गुंटूर, गुंटूरतांडा, कळकावाडी, कल्हाळी, लालवाडी तांडा, लिंबा तांडा, राठोडनगर, मसलगा पु., नंदनवन , सोमसवाडी, महादेवमाळ तांडा, सावरगाव नि., शिराढोण, हिरामण तांडा, ढाकुनाईक तांडा, तेलंगवाडी, सोनमाळ तांडा, कौठा पु. आदी गावे, वाडी, तांडे पाणीटंचाईचा प्रखर सामना करीत आहेत. यावेळी उपाययोजना करताना प्रशासनाला प्राधान्याने कामे करावी लागणार आहेत.२६ एप्रिलपर्यंत ५६ पैकी ४० विंधन विहीर, विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्तावात १ रद्द, काही तपासणीस्तरावर असल्याचे समजते. तात्पुरती पुरक नळयोजना व नळयोजना विशेष दुरूस्तीचे ३२ प्रस्ताव जिल्हास्तरावर मंजुरीसाठी प्रस्तावित असल्याचे समजते. मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करेल. अशावेळी उपाययोजना करून नागरिकांची तहान भागविण्यासाठी कशी अंमलबजावणी होणार आहे. हा उत्सुकतेचा विषय असला तरी तांड्यावरील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़एप्रिल ते जून कालावधीत उपाययोजना मंजूरकंधार तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट सोडविण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, उपमुख्य कार्यकारी अभियंता कारलेकर, अव्वल कारकून बळवंत वरपडे, पं.स.विस्तार अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत़ एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांडयावर पाणी पुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणी टंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई