शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

चार टँकरने भागतेय नागरिकांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:53 IST

जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे.

ठळक मुद्देकंधार तालुका : तांड्यावर पाण्यासाठी कसरत

कंधार : जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे. तालुक्यात चार टँकरचा शिरकाव झाला आहे. कुरूळा, रेखातांडा, पोमातांडा, नरपटवाडी, जिवलातांडा येथील नागरिकांची तहान टँकरवर भागत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे. हरीलालतांडा, बदुतांडा, शिराढोणतांडा येथे पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याचे चित्र असून टँकरच्या प्रतीक्षेत गावे आहेत.मागील वर्षी सरासरी पर्जन्यमान झाले नसल्याने नदी- नाले, तलाव, प्रकल्पात जलसाठे वाढले नाहीत. गत काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाणीसमस्या वाढत आहे. पाणीटंचाई प्रश्रावर उपाययोजना करण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न केले गेले. दोन टप्प्याचा कृती आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला. तो उशिरा पाठविला अन् उशिरा मंजुरी मिळाली. त्यामुळे अंमलबजावणी उशीरच होईल, हे अपेक्षित होते.जानेवारी ते मार्च या कालावधीचा ५ कोटी १ लाख ३४ हजारांच्या खर्चास आणि ३९४ उपाययोजना करण्यास मंजुरी मिळाली. परंतु, अंमलबजावणी करण्यास मुहूर्त लांबत गेला. नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, विहिरी खोल करणे/गाळ काढणे या उपाययोजना नावालाच राहिल्या. त्यासाठीचे प्रस्ताव, अंदाजपत्रक यातच वेळ गेला.एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांड्यावर पाणीपुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणीटंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.दुसऱ्या टप्प्यात उस्माननगर, आलेगाव, हाळदा, हणमंतवाडी, शेकापूर, तेलूर, कागणेवाडी, टोकवाडी, बोरी खु., चौकीतांडा, दैठणा, देवईचीवाडी, मजरे धर्मापुरी, धर्मापुरीतांडा, गुलाबवाडी, गुलाबवाडीतांडा, बिंडा, दिंडा, गुंडा, गुंटूर, गुंटूरतांडा, कळकावाडी, कल्हाळी, लालवाडी तांडा, लिंबा तांडा, राठोडनगर, मसलगा पु., नंदनवन , सोमसवाडी, महादेवमाळ तांडा, सावरगाव नि., शिराढोण, हिरामण तांडा, ढाकुनाईक तांडा, तेलंगवाडी, सोनमाळ तांडा, कौठा पु. आदी गावे, वाडी, तांडे पाणीटंचाईचा प्रखर सामना करीत आहेत. यावेळी उपाययोजना करताना प्रशासनाला प्राधान्याने कामे करावी लागणार आहेत.२६ एप्रिलपर्यंत ५६ पैकी ४० विंधन विहीर, विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्तावात १ रद्द, काही तपासणीस्तरावर असल्याचे समजते. तात्पुरती पुरक नळयोजना व नळयोजना विशेष दुरूस्तीचे ३२ प्रस्ताव जिल्हास्तरावर मंजुरीसाठी प्रस्तावित असल्याचे समजते. मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करेल. अशावेळी उपाययोजना करून नागरिकांची तहान भागविण्यासाठी कशी अंमलबजावणी होणार आहे. हा उत्सुकतेचा विषय असला तरी तांड्यावरील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़एप्रिल ते जून कालावधीत उपाययोजना मंजूरकंधार तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट सोडविण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, उपमुख्य कार्यकारी अभियंता कारलेकर, अव्वल कारकून बळवंत वरपडे, पं.स.विस्तार अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत़ एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांडयावर पाणी पुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणी टंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई