शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या भारनियमनाचा फटका; शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकांना द्यावे लागतेय पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:25 IST

रात्रीला भिजवणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्याही घटना

ठळक मुद्देयंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

नांदेड :  नांदेड- शेतकऱ्यांकडून सध्या हिवाळ बागायत पीकांना पाणी देण्याची लगबग सध्या सुरु आहे. परंतू शासनाकडून वेगवेगळ्या पाळीमध्ये वीज पुरवठा केला जात असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करुन पीकां पाणी द्यावे लागत आहे. 

यंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. त्याच बरोबर ऊस आणि केळीची लागवडही वाढली आहे. या पीकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वेळेनुसारच नियोजन करावे लागत आहे.  रात्रीच्या वेळी जंगल जनावरे तसेच शाॅक लागून अपघात होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.

रात्रीचे भारनियमन जीवघेणेदिवाळीनंतर गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी यासह विविध पीकांना पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केेले जाते. रात्रीच्या वेळी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने बहुतांश शेतकरी रात्रीच सिंचनाचे नियोजन करतात परंतू रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातच ना दुरुस्त मोटारी, काही बिघाड झाल्यास रात्रीच्या वेळी विहीरीत उतरणे अशा प्रकारामुळे अपघात घडून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. अशा घटना घडलेल्या आहेत.पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणीनांदेड जिल्ह्यात यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याने सर्वच धरणे, प्रकल्प तुडूंब भरले आहेत. नांदेड जिल्ह्याची मदार असलेल्या येलदरी, इसापूर, विष्णुपूरी, मानार यासह लघु व मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होणार आहे.इसापूर धरणातून पाणी पाळ्या देण्याचे नियाेजन  कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. त्यानूसार सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच महावितरणणे देखील पाणी पाळीच्या वेळेज वीज पुरवठा सुरुळीत ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

नांदेड जिल्ह्यात शिफ्टवाईज वीज पुरवठा करण्यात येतो. एकाच वेळी वीजेचा वापर अधिक झाल्याने दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे आठ-आठ तासांची वीज दिली जाते. भविष्यात सौरऊर्जेचा वापर करुन वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. - संतोष वहाणे,  अधीक्षक अभियंता, नांदेड

महावितरणकडून शेतकऱ्यांना रात्री ११ नंतर अथवा पहाटेच्यावेळी वीज दिली जाते. या वेळेतही वीजेचा दाब मुबलक प्रमाणात नसल्याने मोटारी पाणी ओढत नाहीत. रात्रीच्या वेळी जंगली जनावरांचा सामना करावा लागतो. दिवसा वीज देणे गरजेचे आहे.- परमेश्वर कदम, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीelectricityवीजNandedनांदेड