शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

रात्रीच्या भारनियमनाचा फटका; शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकांना द्यावे लागतेय पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:25 IST

रात्रीला भिजवणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्याही घटना

ठळक मुद्देयंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

नांदेड :  नांदेड- शेतकऱ्यांकडून सध्या हिवाळ बागायत पीकांना पाणी देण्याची लगबग सध्या सुरु आहे. परंतू शासनाकडून वेगवेगळ्या पाळीमध्ये वीज पुरवठा केला जात असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करुन पीकां पाणी द्यावे लागत आहे. 

यंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. त्याच बरोबर ऊस आणि केळीची लागवडही वाढली आहे. या पीकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वेळेनुसारच नियोजन करावे लागत आहे.  रात्रीच्या वेळी जंगल जनावरे तसेच शाॅक लागून अपघात होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.

रात्रीचे भारनियमन जीवघेणेदिवाळीनंतर गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी यासह विविध पीकांना पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केेले जाते. रात्रीच्या वेळी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने बहुतांश शेतकरी रात्रीच सिंचनाचे नियोजन करतात परंतू रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातच ना दुरुस्त मोटारी, काही बिघाड झाल्यास रात्रीच्या वेळी विहीरीत उतरणे अशा प्रकारामुळे अपघात घडून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. अशा घटना घडलेल्या आहेत.पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणीनांदेड जिल्ह्यात यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याने सर्वच धरणे, प्रकल्प तुडूंब भरले आहेत. नांदेड जिल्ह्याची मदार असलेल्या येलदरी, इसापूर, विष्णुपूरी, मानार यासह लघु व मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होणार आहे.इसापूर धरणातून पाणी पाळ्या देण्याचे नियाेजन  कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. त्यानूसार सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच महावितरणणे देखील पाणी पाळीच्या वेळेज वीज पुरवठा सुरुळीत ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

नांदेड जिल्ह्यात शिफ्टवाईज वीज पुरवठा करण्यात येतो. एकाच वेळी वीजेचा वापर अधिक झाल्याने दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे आठ-आठ तासांची वीज दिली जाते. भविष्यात सौरऊर्जेचा वापर करुन वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. - संतोष वहाणे,  अधीक्षक अभियंता, नांदेड

महावितरणकडून शेतकऱ्यांना रात्री ११ नंतर अथवा पहाटेच्यावेळी वीज दिली जाते. या वेळेतही वीजेचा दाब मुबलक प्रमाणात नसल्याने मोटारी पाणी ओढत नाहीत. रात्रीच्या वेळी जंगली जनावरांचा सामना करावा लागतो. दिवसा वीज देणे गरजेचे आहे.- परमेश्वर कदम, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीelectricityवीजNandedनांदेड