शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बारड व अर्धापूर मंडळातील शेतकऱ्यांची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST

शासनाने मोठा गाजावाजा करीत राबविलेली हवामान आधारित फळपीक योजना ही चुकीच्या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याची स्थिती सध्या ...

शासनाने मोठा गाजावाजा करीत राबविलेली हवामान आधारित फळपीक योजना ही चुकीच्या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याची स्थिती सध्या पाहावयास मिळत आहे. २०१९-२०२० मध्ये बारड, अर्धापूर व दाभड मंडळातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टर ६६०० रुपये रोख भरून केळीचा विमा उतरवला. त्यानंतर २०२० च्या मे महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली. शेतकऱ्यांच्या केळी बागा या उष्णतेच्या लाटेत अक्षरशः होरपळून गेल्या. परिणामी केळीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली; पण ज्या वेळेस विमा संरक्षित रक्कम देण्याची वेळ आली तेव्हा विमा कंपनीने तापमान नोंदीतील किरकोळ फरक दाखवून बारड, अर्धापूर व दाभड मंडळाला वगळले आहे. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार केली. तेव्हा पालकमंत्र्यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीत परभणी विद्यापीठाचे हवामानतज्ज्ञ डाखोरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व इतर पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रावणगावकर होते. सदर समितीने हवामान यंत्रे निकषांप्रमाणे बसविली नाहीत, असा निष्कर्ष देऊन विमा कंपनीला विमा रक्कम अदा करण्यात यावी, असे निर्देश दिले. या प्रकरणी अशोकराव चव्हाण यांनीही पाठपुरावा केला. परंतु, विमा कंपनी दाद देत नाही. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही. त्यामुळे बारड व अर्धापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. किरण देशमुख-बारडकर यांच्या पुढाकाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयात धाव घेतली आहे. जवळपास २५० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.