शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बारड व अर्धापूर मंडळातील शेतकऱ्यांची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST

शासनाने मोठा गाजावाजा करीत राबविलेली हवामान आधारित फळपीक योजना ही चुकीच्या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याची स्थिती सध्या ...

शासनाने मोठा गाजावाजा करीत राबविलेली हवामान आधारित फळपीक योजना ही चुकीच्या हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याची स्थिती सध्या पाहावयास मिळत आहे. २०१९-२०२० मध्ये बारड, अर्धापूर व दाभड मंडळातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टर ६६०० रुपये रोख भरून केळीचा विमा उतरवला. त्यानंतर २०२० च्या मे महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली. शेतकऱ्यांच्या केळी बागा या उष्णतेच्या लाटेत अक्षरशः होरपळून गेल्या. परिणामी केळीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली; पण ज्या वेळेस विमा संरक्षित रक्कम देण्याची वेळ आली तेव्हा विमा कंपनीने तापमान नोंदीतील किरकोळ फरक दाखवून बारड, अर्धापूर व दाभड मंडळाला वगळले आहे. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार केली. तेव्हा पालकमंत्र्यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीत परभणी विद्यापीठाचे हवामानतज्ज्ञ डाखोरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व इतर पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रावणगावकर होते. सदर समितीने हवामान यंत्रे निकषांप्रमाणे बसविली नाहीत, असा निष्कर्ष देऊन विमा कंपनीला विमा रक्कम अदा करण्यात यावी, असे निर्देश दिले. या प्रकरणी अशोकराव चव्हाण यांनीही पाठपुरावा केला. परंतु, विमा कंपनी दाद देत नाही. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही. त्यामुळे बारड व अर्धापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. किरण देशमुख-बारडकर यांच्या पुढाकाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयात धाव घेतली आहे. जवळपास २५० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.