शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र

By शिवराज बिचेवार | Updated: April 20, 2024 16:13 IST

इंडिया आघाडीत कुरघोड्या, कोणाचाच चेहरा नाही; हा देश कोणाच्या हातात देणार? : नरेंद्र मोदी

नांदेड: इंडीया आघाडीमधील नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. म्हणून काही जणांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढत राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश केला आहे. इंडीया अलायन्स देशात जवळपास २५ टक्के जागांवर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. ते एकमेकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करीत आहेत. ४ जून नंतर तर ते एकमेकांच्या कपडे फाडतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराेधकांवर हल्लाबोल केला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील मामा चौकातील मोदी ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील पहिली सभा घेण्यात आली. सर्वांना माझा नमस्कार, २६ एप्रिलची तयारी झाली ना? असा सवाल करीत मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. पहिल्या टप्प्यातील मतदानोत्तर चाचणीत जनतेने एनडीएचा विजय पक्का केला आहे. लोकशाहीला ताकद देण्यासाठी सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. विरोधकांनीही जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचा पराभव निश्चित असला तरी, आज, उद्या, परवा कधी तरी संधी मिळेल म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. इंडीया अलायन्सकडे कोणताच चेहरा नाही. त्यामुळे हा देश कोणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत आहेत. अशा मंडळीवर जनतेने भराेसा कसा ठेवायचा? त्यांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही संसदेत आल्यानंतर गोंधळ घालतील. 

काँग्रेसच्या साहिबजाद्यांना तर वायनाडमध्येही संकट दिसत आहे. त्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात आहेत. काही दिवसापूर्वीच साहिबजाद्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावले. साथीदारांचेही हे हाल असतील तर कसे? त्यांना परंपरागत अमेठीतून बाहेर पडावे लागले, वायनाड सोडावे लागले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस परिवाराची पहिल्यांदाच अशी अवस्था झाली. काँग्रेस परिवार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ते स्वत: काँग्रेसला मतदान करु शकत नाहीत. कारण त्या ठिकाणी दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार आहे. त्यामुळे ४ जूननंतर इंडीया आघाडीचे नेते एकमेकांची नक्कीच कपडे फाडतील. 

काँग्रेसने वंचित, शोषित, गरीब, शेतकरी यांच्या विकासात भिंत उभी केली आहे. आम्ही दहा वर्षात कोट्यवधी लोकांना घरे दिली, मोफत राशन दिले तर काँग्रेसवाले त्याची टर उडवित होते. गरीबांची बँक खाती काढली, युपीआय आणले तर या अशिक्षित लोकांना ते काय कळणार म्हणणाऱ्या काँग्रेसला मतदान करुन आपले मत वाया घालू नका असे आवाहनही मोदी यांनी केले. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार ही मोदी गॅरंटी आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेसचे खड्डे बुजविण्यात आले. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. असेही मोदी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती होती.

शंकररावांकडून शिकण्याचा प्रयत्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची भाषणात आठवण काढली. ते म्हणाले, मी राजकारणात नव्हतो, तेव्हा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता. त्यावेळी पट्टपुर्ती येथे साईबाबा यांनी शंकरराव चव्हाण यांची माझी ओळख करुन दिली. मला त्यांच्याशी बोलण्याचे सौभाग्य मिळाले. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या व्यक्तीतील नम्रता बघून मी प्रभावित झालो. त्यांच्यापासून नेहमी शिकण्याचा मी प्रयत्न करतो असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :nanded-pcनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी