शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

उकळते दूध सांडल्याने चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:52 IST

शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़

ठळक मुद्देस्त्री रुग्णालयातील घटना : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़सांगवी येथील प्रतीक वायवळ या दोन वर्षीय मुलाला सोमवारी अशक्तपणामुळे उपचारासाठी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू केंद्रात दाखल केले होते़ या ठिकाणी प्रतीकवर उपचार सुरु होते़ शुक्रवारी दुपारी प्रतीकची आई जेवणानंतर बेडवर बसलेली होती़ तर प्रतीक हा खाली खेळत होता़ त्याचवेळी परिचारिकेने मुलांना देण्यासाठी गरम दूध आणले़ दुधाचे पातेले एका टेबलावर ठेवले होते़ त्याचवेळी प्रतीकचा टेबलला पाय लागल्याने गरम दुधाचे पातेले त्याच्या अंगावर पडले़ त्यामुळे तो ६० टक्के भाजल्या गेल्या होता़ नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले़ परंतु या ठिकाणी शनिवारी त्याचा उपचारा- दरम्यान मृत्यू झाला़याप्रकरणात परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळेच प्रतीकचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ तसेच या प्रकरणात परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली होती़ या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़बी़पीक़दम यांनी चौकशी करुन दोषी आढळल्यास परिचारिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रतीकच्या कुटुंबियांना दिले़दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात छत कोसळून मातेसह चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली होती़ या घटनेत सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला होता़ त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ही घटना घडली़ त्यामुळे श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़सोयीसुविधांबाबत नेहमीच होते ओरडडॉ़पुष्पा हंगरगेकर यांच्या काळात श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाचे काम उत्कृष्टपणे सुरु होते़ रुग्णालयाच्या कामकाजाची अनेकवेळा प्रशंसाही करण्यात आली होती़ परंतु त्या पदावरुन दूर होताच या रुग्णालयाला अवकळा आली़ या ठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिकांची मनमानी वाढली़ अनेकवेळा दिवसा अन् रात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही़ कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत त्यांना थेट विष्णूपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो़ अनेक कर्मचारी तर नावालाच रुग्णालयात हजेरी लावून जातात़ त्यामुळे या रुग्णालयाच्या कामकाजाबाबत आता जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालण्याची गरज आहे़