शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जोडणी न देताच हातावर टेकविले वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:49 IST

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़

ठळक मुद्देगौरी येथील प्रकार : महावितरण कंपनीचा अजब कारभार

गोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़किनवट तालुक्यातील गौरी येथील गौतम उमरे या शेतकºयाने कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करुन ३१ डिसेंबर २०१४ रोजी ५ हजार २०० रुपये कोटेशन भरले़ मात्र कोटेशन भरुनही शेतात अद्याप विद्युत खांब उभे केलेले नाहीत़ वीज जोडणी तर दूरच, असे असताना मात्र महावितरणने चक्क १० हजार ९०० रुपयाचे बिल उखळल्याने शेतकरी गोंधळला असून खांबही नाही अन् जोडणीही नाही मग वीजबिल आकारले कसे? महवितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहकांतून मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे़२०१४ मध्ये कोटेशन भरलेल्या ग्राहक शेतकºयाला ग्राहक क्रमांक ५६५६७०००११२९ असा असून सप्टेंबर २०१७ ला १० हजार ९०० रुपये बिल आकारुन देय २९ नोव्हेंबर २०१७ रोजी बिल भरण्याच्या अंतिम तारखेनुसार बिल भरल्यास १० हजार ९१० रुपये भरावे लागतील असे बिलात नमूद केले आहे़तीन वर्षांपासून कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतात वीजजोडणी न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामात पिकाला पाणी देऊ पाहणाºया व रबी व उन्हाळी हंगाम घेऊ इच्छिणाºया शेतकºयांच्या आशेवर पाणी फिरले असतानाच त्यात भर म्हणून वीजपुरवठा नसतानाही महातिवरणने चक्क कृषीपंपाचे वीजबिल आकारुन शेतकºयाला गोंधळात टाकले आहे़ महावितरणच्या या उलट्या कारभारामुळे कामकाजाची घडी विस्कळीत झाल्याचा आरोप शेतकरी गौतम उमरे यांनी केला आहे़अधिकारी म्हणतात...याबाबत किनवट वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आऱआऱ परचाके यांना विचारले असता हे प्रकरण जुने असून केबल डिक्लेअरचा इश्यू आहे़ वीज वितरणने तसा प्रस्तावही सादर केला आहे़ २ कोटी ६२ लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे़ यंदा डिसेंबर अखेरपर्यंत प्रलंबित वीजजोडणीचे काम मार्गी लागेल असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़