शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जोडणी न देताच हातावर टेकविले वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:49 IST

कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़

ठळक मुद्देगौरी येथील प्रकार : महावितरण कंपनीचा अजब कारभार

गोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़किनवट तालुक्यातील गौरी येथील गौतम उमरे या शेतकºयाने कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करुन ३१ डिसेंबर २०१४ रोजी ५ हजार २०० रुपये कोटेशन भरले़ मात्र कोटेशन भरुनही शेतात अद्याप विद्युत खांब उभे केलेले नाहीत़ वीज जोडणी तर दूरच, असे असताना मात्र महावितरणने चक्क १० हजार ९०० रुपयाचे बिल उखळल्याने शेतकरी गोंधळला असून खांबही नाही अन् जोडणीही नाही मग वीजबिल आकारले कसे? महवितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहकांतून मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे़२०१४ मध्ये कोटेशन भरलेल्या ग्राहक शेतकºयाला ग्राहक क्रमांक ५६५६७०००११२९ असा असून सप्टेंबर २०१७ ला १० हजार ९०० रुपये बिल आकारुन देय २९ नोव्हेंबर २०१७ रोजी बिल भरण्याच्या अंतिम तारखेनुसार बिल भरल्यास १० हजार ९१० रुपये भरावे लागतील असे बिलात नमूद केले आहे़तीन वर्षांपासून कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतात वीजजोडणी न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामात पिकाला पाणी देऊ पाहणाºया व रबी व उन्हाळी हंगाम घेऊ इच्छिणाºया शेतकºयांच्या आशेवर पाणी फिरले असतानाच त्यात भर म्हणून वीजपुरवठा नसतानाही महातिवरणने चक्क कृषीपंपाचे वीजबिल आकारुन शेतकºयाला गोंधळात टाकले आहे़ महावितरणच्या या उलट्या कारभारामुळे कामकाजाची घडी विस्कळीत झाल्याचा आरोप शेतकरी गौतम उमरे यांनी केला आहे़अधिकारी म्हणतात...याबाबत किनवट वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आऱआऱ परचाके यांना विचारले असता हे प्रकरण जुने असून केबल डिक्लेअरचा इश्यू आहे़ वीज वितरणने तसा प्रस्तावही सादर केला आहे़ २ कोटी ६२ लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे़ यंदा डिसेंबर अखेरपर्यंत प्रलंबित वीजजोडणीचे काम मार्गी लागेल असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़