शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुटकालीन कामदेव मंदिरास समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:44 IST

पाणी प्रवाहावरील दोन मजली कामदेव वास्तू मंदिराला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे़ महाराष्ट्र राज्यातील प्राचीन वास्तू मंदिरापैकी कदाचित एकमेव असणारे मंदिर दुर्लक्षित असून त्याचे जतन करण्याचे मोठे आव्हान आहे़ अन्यथा राष्ट्रकुटकालीन (कृष्ण तिसरा) ऐतिहासिक वारसा पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त होत आहे़

गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : पाणी प्रवाहावरील दोन मजली कामदेव वास्तू मंदिराला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे़ महाराष्ट्र राज्यातील प्राचीन वास्तू मंदिरापैकी कदाचित एकमेव असणारे मंदिर दुर्लक्षित असून त्याचे जतन करण्याचे मोठे आव्हान आहे़ अन्यथा राष्ट्रकुटकालीन (कृष्ण तिसरा) ऐतिहासिक वारसा पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त होत आहे़राष्ट्रकुटकालीन राजांनी शहर व परिसरात अनेक वास्तू उभारल्या़ भुईकोट किल्ला, प्रवेशद्वार, जगतुंग समुद्र, विविध मंदिराची उभारणी केली़ यातील अनेक वास्तू आज अस्तित्वात असल्या तरी त्यांचे पुरातत्वीय सौंदर्य पुसटसे झालेले दिसतात़ काही वास्तू काळाच्या ओघात इतिहासजमा झाल्या आहेत़ शासनाचे व पुरातत्व विभागाचा कानाडोळा संबंधित भागातील नागरिकांचे दुर्लक्ष आदीने अनेक वास्तू भग्नावशेश अवस्थेत दिसतात़राष्ट्रकुटकालीन इतिहास सर्वधर्माचा आदर करणारा होता़ हिंदूंची जवळपास २६ मंदिरे या काळात होती़ त्यातील १२ मंदिराचा उल्लेख शिलालेखात आढळतो़ तशीच जैन मंदिर, बौद्ध मूर्ती शिल्पे या काळात मोठ्या प्रमाणात होती़ या काळातील राजांनी सर्वधर्मसमभाव जतन करण्याचा इतिहासाचा भक्कम पाया घातला़शिलालेखात असलेले कामदेव मंदिर आहे़ हे दोन मजली होते़ वरचा मजला दुर्लक्षामुळे नामशेष झाला़ तळमजला आजही अनेक समस्यांचा सामना करत उभा आहे़ पाण्याच्या प्रवाहावरील मंदिराची वास्तू देखणी आहे़ जगतूंग समुद्राच्या दक्षिण-उत्तर लांबीच्या अंतिम टोकाला डाव्या बाजूस श्री शिवाजी कॉलेज, कंधारकडे जाताना या मंदिराचा भाग दिसतो़ मुख्यद्वार पश्चिम दिशेला तर दक्षिण-उत्तर दिशेला लहान द्वार होते़ प्रदक्षिणा पथ, गर्भगृह, समोर सभामंडप अशी रचना स्पष्टपणे दिसते़ मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर हौद होते़ याचा अर्थ या कुपनलिका असाव्यात़ पाणी स्वच्छ व नियंत्रण करणारी निगडी असावी़ कामदेव मंदिराजवळ कामाई मंदिर होते़ अश दंतकथा सांगितल्या जातात़ कारण कामाईचा संसार असलेल्या उखळ, जातं असल्याचे जाणवत होते़आजही येथे पूजा-अर्चा केली जाते़ हे ग्रामदैवत असण्याची शक्यता आहे़ पाऊस होत नसेल तर धार्मिक कार्यक्रम येथे होतात़ आज हे कामदेव मंदिर दगडांनी भक्कम बांधलेले दिसते़ परंतु गाळ, काटेरी झुडूपांनी ग्रासले आहे़पाणी प्रवाहावरील राष्ट्रकुटकालीन कामदेव मंदिराचा उल्लेख शिलालेखात आहे़ राजाश्रय असलयाने आपल्या उत्पन्नातून राजा पूजा-अर्चाचा, देखभालीचा खर्च करत होते़ याचे उत्खनन करावे, जेणेकरून इतिहास व संस्कृतीचे आकलन होईल़ शसन व पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे-प्रोफेसर डॉ़अनिल कठारे (इतिहास संशोधन संचालक, कंधार)

टॅग्स :NandedनांदेडTempleमंदिर