शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

कोरोना काळात १८ हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना शंभर दिवस हमखास काम दिले जाते. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक कामे सुरू असायची. तसेच ...

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना शंभर दिवस हमखास काम दिले जाते. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक कामे सुरू असायची. तसेच मजुरांची संख्याही ५० हजारांहून अधिक होती. मात्र मागील दोन वर्षांपासून योजनेअंतर्गत मजुरांची संख्या घटली असून, कामांची संख्याही कमी झाली आहे. या योजनेअंतर्गत २३८ रुपयांची मजुरी दिली जाते. त्या तुलनेत खासगी बांधकामावर मजुरांना कमीतकमी ५०० रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मजूर शहराकडे धाव घेत असून, त्या ठिकाणी मिळणाऱ्या मजुरीवर समाधान मानत आहेत.

काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दोन, अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने होत असलेली उपासमार, अशा कठीण प्रसंगातून मजुरांना जावे लागत होते. दरम्यान, एप्रिल महिन्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर ९ हजार ३०२ मजूर उपस्थित होते. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटला होता. मात्र ग्रामपंचायत यंत्रणेकडून यंदा कामे होत नसल्यामुळे शेकडो मजुरांच्या हाताला कामच मिळाले नाही. एरव्ही उन्हाळ्यात मग्रारोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जाते. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर बाहेर जाऊ नयेत यासाठी रोहयोची कामे सुरू होतात.

चौकट -

अनेक गावांत मजुरांना काम मिळत नाही. तर काही ठिकाणी केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे यंदा सुरू असलेल्या कामावर मजुरांची संख्या कमी होती. सर्वाधिक कामे किनवट, माहूर, उमरी या तालुक्यांत केली जात आहेत.

सरपंच काय म्हणतात

१. या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामपंचायतीकडून कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. पुढील वर्षी ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणावर कामे केली जातील.

- चंदेल, सरपंच, पिं. महिपाल

२. कोरोनामुळे ग्रामपंचायतींना कामांचा प्रस्ताव सादर करता आला नाही. त्यामुळे रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करता आली नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे माणसे घराबाहेर पडत नव्हती.

हाताला काम नाही अन् रोहयो नाही

१. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरातून गावाकडे परत आलो. मात्र गावात काम मिळत नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न आहे.

- बबन कांबळे, आंबाळा.

२. दरवर्षी आम्हाला उन्हाळी कामामुळे मोठा आधार मिळायचा. शेतातली सुगीचे कामे संपली की रोहयोच्या कामावर आम्ही जात होतो. मात्र आता दोन वर्षे झाली काम बंद असल्याने आमच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- शांताबाई वाघमारे, कवलगाव.