शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

कोरोना काळात १८ हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना शंभर दिवस हमखास काम दिले जाते. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक कामे सुरू असायची. तसेच ...

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना शंभर दिवस हमखास काम दिले जाते. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक कामे सुरू असायची. तसेच मजुरांची संख्याही ५० हजारांहून अधिक होती. मात्र मागील दोन वर्षांपासून योजनेअंतर्गत मजुरांची संख्या घटली असून, कामांची संख्याही कमी झाली आहे. या योजनेअंतर्गत २३८ रुपयांची मजुरी दिली जाते. त्या तुलनेत खासगी बांधकामावर मजुरांना कमीतकमी ५०० रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मजूर शहराकडे धाव घेत असून, त्या ठिकाणी मिळणाऱ्या मजुरीवर समाधान मानत आहेत.

काेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दोन, अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने होत असलेली उपासमार, अशा कठीण प्रसंगातून मजुरांना जावे लागत होते. दरम्यान, एप्रिल महिन्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर ९ हजार ३०२ मजूर उपस्थित होते. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटला होता. मात्र ग्रामपंचायत यंत्रणेकडून यंदा कामे होत नसल्यामुळे शेकडो मजुरांच्या हाताला कामच मिळाले नाही. एरव्ही उन्हाळ्यात मग्रारोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जाते. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर बाहेर जाऊ नयेत यासाठी रोहयोची कामे सुरू होतात.

चौकट -

अनेक गावांत मजुरांना काम मिळत नाही. तर काही ठिकाणी केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे यंदा सुरू असलेल्या कामावर मजुरांची संख्या कमी होती. सर्वाधिक कामे किनवट, माहूर, उमरी या तालुक्यांत केली जात आहेत.

सरपंच काय म्हणतात

१. या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामपंचायतीकडून कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. पुढील वर्षी ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणावर कामे केली जातील.

- चंदेल, सरपंच, पिं. महिपाल

२. कोरोनामुळे ग्रामपंचायतींना कामांचा प्रस्ताव सादर करता आला नाही. त्यामुळे रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करता आली नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे माणसे घराबाहेर पडत नव्हती.

हाताला काम नाही अन् रोहयो नाही

१. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरातून गावाकडे परत आलो. मात्र गावात काम मिळत नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न आहे.

- बबन कांबळे, आंबाळा.

२. दरवर्षी आम्हाला उन्हाळी कामामुळे मोठा आधार मिळायचा. शेतातली सुगीचे कामे संपली की रोहयोच्या कामावर आम्ही जात होतो. मात्र आता दोन वर्षे झाली काम बंद असल्याने आमच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- शांताबाई वाघमारे, कवलगाव.