शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

वाळूअभावी जिल्ह्यात घरकुलांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

५ हजार रुपयांना प्रति ब्रास वाळू जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. सध्या लिलाव प्रक्रिया सुरू असली ...

५ हजार रुपयांना प्रति ब्रास वाळू

जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. सध्या लिलाव प्रक्रिया सुरू असली तरीही तीन लिलावात वाळू घाटांना बोली लावणारे ठेकेदारच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे छुप्या मार्गाने मिळणारी वाळू चढ्या दराने मिळत आहे. या वाळूचा दर प्रति ब्रास ५ हजार रुपयापर्यंत पोहोचला आहे. ही वाळूही मिळत नसल्याचे चित्र आहे.

पैसे खर्चूनही वाळू मिळेना

जिल्ह्यात वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. लिलावाअभावी वाळू मिळत नसल्याने घरकुल धारक त्रस्त झाले आहेत. वाळूसाठी पैसे खर्च करूनही वाळू मिळत नसल्याचे चित्र आहे. अवैध वाळू उपसा तसेच पोलीस, महसूल प्रशासन यांच्या मोहिमेमुळे वाळू विक्री करणारे धास्तावले आहेत. परिणामी लपून छपून वाळू आणली जात आहे. त्यामुळे वाळूअभावी अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत.

प्रतिक्रिया

घराचे काम करायचे कसे?

घरकुल मंजूर करण्यासाठी तहसील व पंचायत समिती कार्यालयात फेऱ्या माराव्या लागल्या. त्यानंतर घरकुल मंजूर झाले. आता आहे ते घर पाडून नवे घर बांधण्यास सुरुवात केली. मात्र वाळूच मिळत नसल्याने काम हळूहळू होत आहे. मोफत वाळूचा तर पता नाही परंतु पैसे देऊनही वाळू उपलब्ध होत नाही

- लक्ष्मणराव वाघमारे, नायगाव

अर्ज केला; परंतु उपयोग नाही

घरकुलासाठी ५ ब्रास रेती देण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला; परंतु अर्जाचे पुढे काय झाले? याची माहिती मिळाली नाही. पाच ब्रास तर सोडा; पण विकतही वाळू घेण्यासाठी आता ठेकेदारांच्या मागे लागावे लागत आहे. वाळूचे दर परवडणारे नसल्याने घराचे कामही थांबवावे लागत आहे. वाळूचे दर कमी झाल्यानंतर आता काम सुरू करण्याची वेळ येणार आहे. काम अर्धवट असल्याने घराचा हप्ताही थांबला आहे.- सुनील लोणे, हदगाव.

प्रतिक्रिया

घरकुलासाठी पाच ब्रास वाळू देण्याच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. मी स्वताही आवाहन केले आहे. नांदेड व मुदखेड तालुक्यात जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना देण्याबाबत महापालिका आयुक्त तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात लिलाव न झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यास काही अडचणी येत आहेत. -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

जिल्ह्यात पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी दोन वर्ष वाळू घाटांचे लिलाव झाले नव्हते. दोनशेहून अधिक वाळूघाट जिल्ह्यात आहेत. या वाळू घाटावर उपसासाठी पर्यावरण विभागाची मान्यता आवश्यक असते. ती मिळाली नव्हती. आता मिळाली असून जिल्ह्यात ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. तीन वेळा प्रतिसाद न मिळाल्याने घाटांचे दर कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे- प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड.