शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फाळणीमुळे नव्हे तर द्वेषभावनेमुळेच गांधी हत्या - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:22 IST

मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़

ठळक मुद्देतुषार गांधी : कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग

नांदेड : मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़

येथील कुसुम सभागृहात साहित्य संमेलन व्याख्यानमालेत गांधी हत्येचे कारस्थानी आणि सावरकर या विषयावर ते बोलत होते़ यावेळी प्रा़ शेषराव मोरे, माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे, उदय निंबाळकर, माजी मंत्री माधव किन्हाळकर, डॉ़वृषाली किन्हाळकर, प्रा़श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, माजी आग़ंगाधरराव पटणे, प्रा़दत्ता भगत, डॉ़प्रभाकर देव, प्रा़लक्ष्मीकांत तांबोळी, प्राचार्य देवदत्त आणि प्रा़शारदा तुंगार आदी उपस्थित होते़

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे प्रत्यक्षरीत्या सामील होते़ हे दोघे त्यांना हत्यार पुरविणारे ग्वाल्हेरचे डॉ़परचुरे तसेच कटातील साथीदार विष्णू करकरे आणि दिगंबर बडगे हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुरुस्थानी मानत़ त्यांच्या आज्ञेशिवाय ते कोणतेच कृत्य करीत नसत़ त्यामुळे गांधी हत्या खटल्यातून सावरकरांची ठोस पुराव्याअभावी सुटका झाली असली तरी, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या कटात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता़, असे तुषार गांधी यावेळी म्हणाले़ गांधीजींची हत्या ही भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी धर्मवादी शक्तींनी रचलेल्या व्यापक कटाचे प्राथमिक पाऊल होते, असा दावाही त्यांनी केला़ सूत्रसंचालन डॉ़बालाजी चिरडे तर डॉ़विजय भोसले यांनी आभार मानले़