शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

फाळणीमुळे नव्हे तर द्वेषभावनेमुळेच गांधी हत्या - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:22 IST

मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़

ठळक मुद्देतुषार गांधी : कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग

नांदेड : मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़

येथील कुसुम सभागृहात साहित्य संमेलन व्याख्यानमालेत गांधी हत्येचे कारस्थानी आणि सावरकर या विषयावर ते बोलत होते़ यावेळी प्रा़ शेषराव मोरे, माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे, उदय निंबाळकर, माजी मंत्री माधव किन्हाळकर, डॉ़वृषाली किन्हाळकर, प्रा़श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, माजी आग़ंगाधरराव पटणे, प्रा़दत्ता भगत, डॉ़प्रभाकर देव, प्रा़लक्ष्मीकांत तांबोळी, प्राचार्य देवदत्त आणि प्रा़शारदा तुंगार आदी उपस्थित होते़

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे प्रत्यक्षरीत्या सामील होते़ हे दोघे त्यांना हत्यार पुरविणारे ग्वाल्हेरचे डॉ़परचुरे तसेच कटातील साथीदार विष्णू करकरे आणि दिगंबर बडगे हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुरुस्थानी मानत़ त्यांच्या आज्ञेशिवाय ते कोणतेच कृत्य करीत नसत़ त्यामुळे गांधी हत्या खटल्यातून सावरकरांची ठोस पुराव्याअभावी सुटका झाली असली तरी, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या कटात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता़, असे तुषार गांधी यावेळी म्हणाले़ गांधीजींची हत्या ही भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी धर्मवादी शक्तींनी रचलेल्या व्यापक कटाचे प्राथमिक पाऊल होते, असा दावाही त्यांनी केला़ सूत्रसंचालन डॉ़बालाजी चिरडे तर डॉ़विजय भोसले यांनी आभार मानले़