शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शिक्षणाची कवाडे बंद झाल्यानेच मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:29 IST

लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़

ठळक मुद्देधर्मापुरीतील सीमा, निकिताची करुण कहाणी आत्या- भाचीच्या आत्महत्येचे गूढ दोन दिवसांनी उलगडले

सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़आत्या-भाचीच्या आत्महत्येमुळे सायाळवाडी हळहळली असून आता या प्रकरणातील एक-एक पैलू समोर येत आहेत़ आत्या निकिता राठोड व भाची सीमा राठोड यांचे एकाच दिवशी म्हणजे ७ मे २०१८ रोजी लग्न झाले होते़लग्नापूर्वी त्यांनी सुखी संसाराचे स्वप्न रंगविले होते़ परंतु, सीमाला मात्र आपले शिक्षण पूर्ण करावयाचे होते़ नागपंचमीच्या दिवशी ती माहेरी धर्मापुरी (ता़ कंधार) येथे आली़ मनातील इच्छा तिने आईवडिलांसमोर बोलून दाखविली़ मात्र आईवडिलांना हे मान्य नव्हते़ ११ वीला प्रवेश घ्यावा, मात्र तिने घरी बसून परीक्षा द्यावी, असा पर्याय आईवडिलांनी सीमाला सुचविला़ मात्र हा पर्याय तिला मान्य नव्हता़ मला शिकू देत नसाल, तर मी आत्महत्या करते, असे तिने सांगितले होते़ परंतु तिचे बोलणे कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही़ अन् तिथेच घात झाला़ सीमा सासरी आली़, ती आत्महत्या करण्यासाठीच़ महालिंगी येथे आल्यानंतरही तिने आपल्या मनातील इच्छा गावातील शिक्षकांना बोलून दाखविली़ माझ्या आई-बाबांना सांगा, अशी विनंतीही तिने शिक्षकांना केली़ मात्र सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले अन् त्यातूनच दोन जिवांचा बळी गेला़उत्कट प्रेमाचा करुण अंतआत्या-भाचीच्या उत्कट प्रेमाचा शेवट करूण अंताने झाला़ या घटनेने सर्वांनाच स्तब्ध केले़ शिक्षण घेण्याची मनात इच्छा असूनही घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आपण शिक्षण घेऊ शकलो नाही़ ही सल सीमाच्या मनात होती़ मनाची झालेली ही कोंडी फोडण्यासाठी तीने पालकांपासून ते शिक्षकापर्यंत सर्वांसमोरच इच्छा प्रकट केली़ परंतु, कुणाकडूनच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सीमाने हे टोकाचे पाऊल उचलले़ तिला निकिता हिनेही साथ दिली़तू गेल्यावर मी एकटी काय करु?आत्महत्येची बाब सीमा हिने तिची आत्या निकिता हिलाही बोलून दाखविली़ आपण दोघी लहानपणापासून एकत्र वाढलो, शिक्षण एकत्र घेतले़ लग्नही एकाच मंडपात झाले़ दोघींचे सासरही एकाच गावात़ त्यामुळे तू गेल्यावर मी एकटी राहून काय करू? असा सवाल निकिताने सीमाला करून मीही आत्महत्या करते, असे सांगितले़ यावरून त्यांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तीन ते चार जागांची रेकी केली होती़ शेवटी सायाळवाडी शिवार निवडून २ सप्टेेंबर रोजी सकाळी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली़ आत्महत्या करण्यापूर्वी सहसा चिठ्ठी लिहून ठेवली जाते़ मात्र या दोघींनी तसे काही केले नाही़ यातील निकिताने स्वत:च्या छातीवर बहिणीचा फोटो चिटकविला़ तर सीमाने कुटुंबियाचा फोटो चिटकवून एकाच झाडाला गळफास घेतला़नाते आत्या, भाचीचे, जिवलग स्नेहाचेमयत सीमा आणि निकिता राठोड या दोघी जिवलग मैत्रिणी़ निकिताला आईवडील नसल्याने ती भावाकडे म्हणजे सीमाच्या वडिलांकडेच राहत असे़ दोघीही एकत्र शिकल्या़ त्यांना शिक्षणाची आवड़ घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आई-वडिलांनी शिक्षण थांबवून दोघींना महालिंगी ताक़ळमनुरी येथे दिले़ दोघींचा विवाह ७ मे २०१८ रोजी एकाच मंडपात लागला़ महालिंगी गाव दुर्गम भागात आहे़ ना तिथे मोबाईलची रेंज, ना टीव्ही पाहण्याची सोय़ शेतात राबायचे, अन् रात्रीला जुन्या पद्धतीने गप्पाटप्पा करून झोपायचे़ असा दिनक्रम सीमा व निकिताचा लग्नानंतर सुरू झाला़ यातील सीमाने दहावीत ७६ टक्के गुण मिळवल्याने पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा, महाविद्यालयात जावे, नियमित अभ्यास करून मोठे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती़

टॅग्स :NandedनांदेडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी