शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिक्षणाची कवाडे बंद झाल्यानेच मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:29 IST

लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़

ठळक मुद्देधर्मापुरीतील सीमा, निकिताची करुण कहाणी आत्या- भाचीच्या आत्महत्येचे गूढ दोन दिवसांनी उलगडले

सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़आत्या-भाचीच्या आत्महत्येमुळे सायाळवाडी हळहळली असून आता या प्रकरणातील एक-एक पैलू समोर येत आहेत़ आत्या निकिता राठोड व भाची सीमा राठोड यांचे एकाच दिवशी म्हणजे ७ मे २०१८ रोजी लग्न झाले होते़लग्नापूर्वी त्यांनी सुखी संसाराचे स्वप्न रंगविले होते़ परंतु, सीमाला मात्र आपले शिक्षण पूर्ण करावयाचे होते़ नागपंचमीच्या दिवशी ती माहेरी धर्मापुरी (ता़ कंधार) येथे आली़ मनातील इच्छा तिने आईवडिलांसमोर बोलून दाखविली़ मात्र आईवडिलांना हे मान्य नव्हते़ ११ वीला प्रवेश घ्यावा, मात्र तिने घरी बसून परीक्षा द्यावी, असा पर्याय आईवडिलांनी सीमाला सुचविला़ मात्र हा पर्याय तिला मान्य नव्हता़ मला शिकू देत नसाल, तर मी आत्महत्या करते, असे तिने सांगितले होते़ परंतु तिचे बोलणे कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही़ अन् तिथेच घात झाला़ सीमा सासरी आली़, ती आत्महत्या करण्यासाठीच़ महालिंगी येथे आल्यानंतरही तिने आपल्या मनातील इच्छा गावातील शिक्षकांना बोलून दाखविली़ माझ्या आई-बाबांना सांगा, अशी विनंतीही तिने शिक्षकांना केली़ मात्र सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले अन् त्यातूनच दोन जिवांचा बळी गेला़उत्कट प्रेमाचा करुण अंतआत्या-भाचीच्या उत्कट प्रेमाचा शेवट करूण अंताने झाला़ या घटनेने सर्वांनाच स्तब्ध केले़ शिक्षण घेण्याची मनात इच्छा असूनही घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आपण शिक्षण घेऊ शकलो नाही़ ही सल सीमाच्या मनात होती़ मनाची झालेली ही कोंडी फोडण्यासाठी तीने पालकांपासून ते शिक्षकापर्यंत सर्वांसमोरच इच्छा प्रकट केली़ परंतु, कुणाकडूनच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सीमाने हे टोकाचे पाऊल उचलले़ तिला निकिता हिनेही साथ दिली़तू गेल्यावर मी एकटी काय करु?आत्महत्येची बाब सीमा हिने तिची आत्या निकिता हिलाही बोलून दाखविली़ आपण दोघी लहानपणापासून एकत्र वाढलो, शिक्षण एकत्र घेतले़ लग्नही एकाच मंडपात झाले़ दोघींचे सासरही एकाच गावात़ त्यामुळे तू गेल्यावर मी एकटी राहून काय करू? असा सवाल निकिताने सीमाला करून मीही आत्महत्या करते, असे सांगितले़ यावरून त्यांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तीन ते चार जागांची रेकी केली होती़ शेवटी सायाळवाडी शिवार निवडून २ सप्टेेंबर रोजी सकाळी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली़ आत्महत्या करण्यापूर्वी सहसा चिठ्ठी लिहून ठेवली जाते़ मात्र या दोघींनी तसे काही केले नाही़ यातील निकिताने स्वत:च्या छातीवर बहिणीचा फोटो चिटकविला़ तर सीमाने कुटुंबियाचा फोटो चिटकवून एकाच झाडाला गळफास घेतला़नाते आत्या, भाचीचे, जिवलग स्नेहाचेमयत सीमा आणि निकिता राठोड या दोघी जिवलग मैत्रिणी़ निकिताला आईवडील नसल्याने ती भावाकडे म्हणजे सीमाच्या वडिलांकडेच राहत असे़ दोघीही एकत्र शिकल्या़ त्यांना शिक्षणाची आवड़ घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आई-वडिलांनी शिक्षण थांबवून दोघींना महालिंगी ताक़ळमनुरी येथे दिले़ दोघींचा विवाह ७ मे २०१८ रोजी एकाच मंडपात लागला़ महालिंगी गाव दुर्गम भागात आहे़ ना तिथे मोबाईलची रेंज, ना टीव्ही पाहण्याची सोय़ शेतात राबायचे, अन् रात्रीला जुन्या पद्धतीने गप्पाटप्पा करून झोपायचे़ असा दिनक्रम सीमा व निकिताचा लग्नानंतर सुरू झाला़ यातील सीमाने दहावीत ७६ टक्के गुण मिळवल्याने पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा, महाविद्यालयात जावे, नियमित अभ्यास करून मोठे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती़

टॅग्स :NandedनांदेडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी