शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची कवाडे बंद झाल्यानेच मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:29 IST

लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़

ठळक मुद्देधर्मापुरीतील सीमा, निकिताची करुण कहाणी आत्या- भाचीच्या आत्महत्येचे गूढ दोन दिवसांनी उलगडले

सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़आत्या-भाचीच्या आत्महत्येमुळे सायाळवाडी हळहळली असून आता या प्रकरणातील एक-एक पैलू समोर येत आहेत़ आत्या निकिता राठोड व भाची सीमा राठोड यांचे एकाच दिवशी म्हणजे ७ मे २०१८ रोजी लग्न झाले होते़लग्नापूर्वी त्यांनी सुखी संसाराचे स्वप्न रंगविले होते़ परंतु, सीमाला मात्र आपले शिक्षण पूर्ण करावयाचे होते़ नागपंचमीच्या दिवशी ती माहेरी धर्मापुरी (ता़ कंधार) येथे आली़ मनातील इच्छा तिने आईवडिलांसमोर बोलून दाखविली़ मात्र आईवडिलांना हे मान्य नव्हते़ ११ वीला प्रवेश घ्यावा, मात्र तिने घरी बसून परीक्षा द्यावी, असा पर्याय आईवडिलांनी सीमाला सुचविला़ मात्र हा पर्याय तिला मान्य नव्हता़ मला शिकू देत नसाल, तर मी आत्महत्या करते, असे तिने सांगितले होते़ परंतु तिचे बोलणे कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही़ अन् तिथेच घात झाला़ सीमा सासरी आली़, ती आत्महत्या करण्यासाठीच़ महालिंगी येथे आल्यानंतरही तिने आपल्या मनातील इच्छा गावातील शिक्षकांना बोलून दाखविली़ माझ्या आई-बाबांना सांगा, अशी विनंतीही तिने शिक्षकांना केली़ मात्र सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले अन् त्यातूनच दोन जिवांचा बळी गेला़उत्कट प्रेमाचा करुण अंतआत्या-भाचीच्या उत्कट प्रेमाचा शेवट करूण अंताने झाला़ या घटनेने सर्वांनाच स्तब्ध केले़ शिक्षण घेण्याची मनात इच्छा असूनही घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आपण शिक्षण घेऊ शकलो नाही़ ही सल सीमाच्या मनात होती़ मनाची झालेली ही कोंडी फोडण्यासाठी तीने पालकांपासून ते शिक्षकापर्यंत सर्वांसमोरच इच्छा प्रकट केली़ परंतु, कुणाकडूनच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सीमाने हे टोकाचे पाऊल उचलले़ तिला निकिता हिनेही साथ दिली़तू गेल्यावर मी एकटी काय करु?आत्महत्येची बाब सीमा हिने तिची आत्या निकिता हिलाही बोलून दाखविली़ आपण दोघी लहानपणापासून एकत्र वाढलो, शिक्षण एकत्र घेतले़ लग्नही एकाच मंडपात झाले़ दोघींचे सासरही एकाच गावात़ त्यामुळे तू गेल्यावर मी एकटी राहून काय करू? असा सवाल निकिताने सीमाला करून मीही आत्महत्या करते, असे सांगितले़ यावरून त्यांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तीन ते चार जागांची रेकी केली होती़ शेवटी सायाळवाडी शिवार निवडून २ सप्टेेंबर रोजी सकाळी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली़ आत्महत्या करण्यापूर्वी सहसा चिठ्ठी लिहून ठेवली जाते़ मात्र या दोघींनी तसे काही केले नाही़ यातील निकिताने स्वत:च्या छातीवर बहिणीचा फोटो चिटकविला़ तर सीमाने कुटुंबियाचा फोटो चिटकवून एकाच झाडाला गळफास घेतला़नाते आत्या, भाचीचे, जिवलग स्नेहाचेमयत सीमा आणि निकिता राठोड या दोघी जिवलग मैत्रिणी़ निकिताला आईवडील नसल्याने ती भावाकडे म्हणजे सीमाच्या वडिलांकडेच राहत असे़ दोघीही एकत्र शिकल्या़ त्यांना शिक्षणाची आवड़ घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आई-वडिलांनी शिक्षण थांबवून दोघींना महालिंगी ताक़ळमनुरी येथे दिले़ दोघींचा विवाह ७ मे २०१८ रोजी एकाच मंडपात लागला़ महालिंगी गाव दुर्गम भागात आहे़ ना तिथे मोबाईलची रेंज, ना टीव्ही पाहण्याची सोय़ शेतात राबायचे, अन् रात्रीला जुन्या पद्धतीने गप्पाटप्पा करून झोपायचे़ असा दिनक्रम सीमा व निकिताचा लग्नानंतर सुरू झाला़ यातील सीमाने दहावीत ७६ टक्के गुण मिळवल्याने पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा, महाविद्यालयात जावे, नियमित अभ्यास करून मोठे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती़

टॅग्स :NandedनांदेडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी