शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोककल्याणकारी समाजवाद गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन ...

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते.

डॉ. राऊत म्हणाले की, समाजवाद ही भांडवलशाहीच्या दोषांविरोधात निर्माण झालेली प्रतिक्रिया होती. समाजवादात लोककल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेचा आशावाद होता. भांडवलशाहीने जन्माला घातलेल्या विषमता, शोषण, ‘नाही रे’ वर्गाची पिळवणूक यांसारख्या अनेक समस्यांचा अंत करायचा असेल, तर उत्पादन साधने समाजाच्या मालकीची असणे आवश्यक आहे, अशी भूमिका बाबासाहेबांची होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

माणसातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरातील भिन्नतेमुळे निर्माण झालेले भेद अमान्य आहेत. अशा भेदरहीत समाजाकडून सर्व गरजा आणि गरजा पुरवणाऱ्या सेवा आणि संसाधनांवर नियंत्रण राहील हा मुख्य विचार ‘सर्वजण समान आहेत’ ही प्रेरणा देतो. इथे आर्थिक स्रोत कोणा एकाच्या मालकीचे नसून शासनाच्या मालकीचे असावेत. संपत्तीची खासगी मालकी हे शोषणाचे व दुःखाचे मूळ कारण आहे. महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे, सुनील कुमरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून, तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.