शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

पाेलीस अंमलदारांच्या सुट्या थांबवू नका, महासंचालकांचे स्पष्ट आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 16:49 IST

सुट्याबाबतच्या आदेशांची अंमलबजावणी हाेत नसल्याची खंत व्यक्त केली

नांदेड : पाेलीस अंमलदारांच्या साप्ताहिक, वैद्यकीय व इतर प्रासंगिक सुट्या काेणत्याही परिस्थितीत थांबवू नका, असे स्पष्ट आदेश राज्याचे पाेलीस महासंचालक संजय कुमार पांडेय यांनी दिले आहेत. महासंचालक पांडेय हे आपल्या साप्ताहिक कामकाजाचा लेखाजाेखा प्रत्येक आठवड्यात साेशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करतात. यावेळी राज्यभरातील पाेलीस अधिकारी, कर्मचारी आपल्या व्यथा ऑनलाईन त्यांच्याकडे मांडतात. सातत्याने थेट महासंचालकांकडे मांडल्या जाणाऱ्या समस्यांचा ओघ पाहता पांडेय यांनी राज्यातील सर्व पाेलीस घटक प्रमुखांना नियमित पाेलीस दरबार भरविण्याचे आदेश दिले आहेत. 

सुट्या मिळत नाहीत ही पाेलीस अंमलदारांची नेहमीची समस्या आहे. त्यावर ताेडगा काढण्यासाठी महासंचालकांनी राज्यातील सर्व पाेलीस उपअधीक्षक (गृह), राखीव पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांची बैठक घेतली हाेती. त्यात अंमलदारांच्या सुट्या मंजूर कराव्या, असे सांगितले हाेते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी खालपर्यंत हाेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुट्यांची ही समस्या सुटली नसल्याने महासंचालकांकडे यासंबंधीच्या तक्रारी पुन्हा वाढल्या आहेत. एका जिल्ह्यात तर सीक पासही दिली जात नसल्याची तक्रार आली. त्या पार्श्वभूमीवर महासंचालक पांडेय यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यात अंमलदारांच्या सुट्या काेणत्याही परिस्थितीत थांबविल्या जावू नयेत, शक्य असेल तेवढ्या सुट्या दिल्याच पाहिजे, असे आदेश जारी केले. या कर्मचाऱ्यांच्या सुट्या थांबवून फार काही साध्य हाेणार नाही, असेही महासंचालकांनी स्पष्ट केले.

कुटुंबातच कारवाई कशी करणार?पाेलीस अंमलदारांच्या सुट्या राेखल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा आपण दिला हाेता. मात्र, आपल्याच कुटुंबातील कुण्या सदस्यावर कारवाई करण्याची आपली मानसिकता नाही, त्यातून काही साध्य हाेणार नाही, तशी वेळही आपल्यावर आणू नये, असे महासंचालक पांडेय यांनी सांगितले.

अंमलदारांनीच हाताळल्या दंगलीमहासंचालक संजय कुमार पांडेय यांनी सांगितले की, अलीकडेच अमरावती, नांदेड, मालेगाव येथे दंगली उसळल्या हाेत्या. या दंगली पुढे आणखी पसरवू न देता त्या नियंत्रित करण्याची जबाबदारी पाेलीस अंमलदारांनीच यशस्वीपणे पार पाडली. मी स्वत: कॅबीनच्या बाहेर निघालाे नाही, काही घटक प्रमुखही कक्षातच राहिले, त्यानंतरही दंगल नियंत्रित झाली, ती अंमलदारांच्या परिश्रमामुळेच, असेही महासंचालकांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसState Governmentराज्य सरकार