शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

बालसंस्कृतीला जातीधर्माच्या बंधनात बांधू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:44 IST

बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उद्घाटन

नांदेड : बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेच्या नांदेड शाखेचे उद्घाटन डॉ़सबनीस यांच्या हस्ते पार पडले़ यानिमित्ताने महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ मंचावर नांदेड शाखेचे अध्यक्ष माधव चुकेवाड, प्रा़सुनील नेरलकर, माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, संजय आईलवाड, प्रकाश कानखेडकर आदींची उपस्थिती होती़ बालमनाला प्रिय असलेल्या देवतास्वरूप चांदूमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे़ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे चंद्र, तारे, ग्रह, वारे आदी नवलपूर्ण बाबीतील नवलाई संपली आहे़ वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नामुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रात अपूर्व असे शोध लागले आहेत़ या पार्श्वभूमीवर विज्ञान शाप की वरदान असल्या प्रश्नांची उकल करण्यात काय अर्थ असा प्रश्न उपस्थित करीत वर्तमान काळातील माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची गरज आहे़ तरच समाजाला प्रगतीच्या वाटा धुंडाळता येतील, असे परखड मतही डॉ़सबनीस यांनी व्यक्त केले़बालपणाची जात ही निरागसता तर निष्पापपणा हा धर्म असतो़ याची जाणीव ठेवून साहित्यिकांनी लेखन करावे, असा सल्लाही सबनीस यांनी दिला़कार्यक्रमाला देवीदास फुलारी, रत्नाकर वाघमारे, सुरेश अंबुलगेकर, शंतनू डोईफोडे, डॉ़पृथ्वीराज तौर, डॉ़हंसराज वैद्य, डॉ़राम जाधव, प्रा़महेश मोरे, पंडित पाटील, वीरभद्र मिरेवाड, पवन आलूरकर, डॉक़ल्पना जाधव, अलका चुकेवाड, डॉ़स्वाती काटे, डॉ़अनिता पुदरोड, नेहा आलूरकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी सुगरणीचा खोपा या माधव चुकेवाड यांच्या बालगीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले़ अध्यक्षीय समारोप सुनील नेरलकर यांनी केला़ तर प्रास्ताविक प्रा़डॉ़वैजनाथ अनमुलवाड यांनी केले़वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड द्याडॉ. श्रीपाल सबनीस यांनी बालसाहित्याचे महत्व आणि आवश्यकता व्यक्त करतानाच वर्तमान काळात माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली. बालपण हे अत्यंत निरागस असते. याची जाणीवही लेखकांनी ठेवायला हवी, असा सल्लाही सबनीस यांनी साहित्यिकांना दिला.

टॅग्स :NandedनांदेडShripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्य