शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बालसंस्कृतीला जातीधर्माच्या बंधनात बांधू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:44 IST

बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उद्घाटन

नांदेड : बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेच्या नांदेड शाखेचे उद्घाटन डॉ़सबनीस यांच्या हस्ते पार पडले़ यानिमित्ताने महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ मंचावर नांदेड शाखेचे अध्यक्ष माधव चुकेवाड, प्रा़सुनील नेरलकर, माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, संजय आईलवाड, प्रकाश कानखेडकर आदींची उपस्थिती होती़ बालमनाला प्रिय असलेल्या देवतास्वरूप चांदूमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे़ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे चंद्र, तारे, ग्रह, वारे आदी नवलपूर्ण बाबीतील नवलाई संपली आहे़ वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नामुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रात अपूर्व असे शोध लागले आहेत़ या पार्श्वभूमीवर विज्ञान शाप की वरदान असल्या प्रश्नांची उकल करण्यात काय अर्थ असा प्रश्न उपस्थित करीत वर्तमान काळातील माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची गरज आहे़ तरच समाजाला प्रगतीच्या वाटा धुंडाळता येतील, असे परखड मतही डॉ़सबनीस यांनी व्यक्त केले़बालपणाची जात ही निरागसता तर निष्पापपणा हा धर्म असतो़ याची जाणीव ठेवून साहित्यिकांनी लेखन करावे, असा सल्लाही सबनीस यांनी दिला़कार्यक्रमाला देवीदास फुलारी, रत्नाकर वाघमारे, सुरेश अंबुलगेकर, शंतनू डोईफोडे, डॉ़पृथ्वीराज तौर, डॉ़हंसराज वैद्य, डॉ़राम जाधव, प्रा़महेश मोरे, पंडित पाटील, वीरभद्र मिरेवाड, पवन आलूरकर, डॉक़ल्पना जाधव, अलका चुकेवाड, डॉ़स्वाती काटे, डॉ़अनिता पुदरोड, नेहा आलूरकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी सुगरणीचा खोपा या माधव चुकेवाड यांच्या बालगीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले़ अध्यक्षीय समारोप सुनील नेरलकर यांनी केला़ तर प्रास्ताविक प्रा़डॉ़वैजनाथ अनमुलवाड यांनी केले़वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड द्याडॉ. श्रीपाल सबनीस यांनी बालसाहित्याचे महत्व आणि आवश्यकता व्यक्त करतानाच वर्तमान काळात माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली. बालपण हे अत्यंत निरागस असते. याची जाणीवही लेखकांनी ठेवायला हवी, असा सल्लाही सबनीस यांनी साहित्यिकांना दिला.

टॅग्स :NandedनांदेडShripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्य