शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बालसंस्कृतीला जातीधर्माच्या बंधनात बांधू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:44 IST

बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उद्घाटन

नांदेड : बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेच्या नांदेड शाखेचे उद्घाटन डॉ़सबनीस यांच्या हस्ते पार पडले़ यानिमित्ताने महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ मंचावर नांदेड शाखेचे अध्यक्ष माधव चुकेवाड, प्रा़सुनील नेरलकर, माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, संजय आईलवाड, प्रकाश कानखेडकर आदींची उपस्थिती होती़ बालमनाला प्रिय असलेल्या देवतास्वरूप चांदूमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे़ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे चंद्र, तारे, ग्रह, वारे आदी नवलपूर्ण बाबीतील नवलाई संपली आहे़ वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नामुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रात अपूर्व असे शोध लागले आहेत़ या पार्श्वभूमीवर विज्ञान शाप की वरदान असल्या प्रश्नांची उकल करण्यात काय अर्थ असा प्रश्न उपस्थित करीत वर्तमान काळातील माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची गरज आहे़ तरच समाजाला प्रगतीच्या वाटा धुंडाळता येतील, असे परखड मतही डॉ़सबनीस यांनी व्यक्त केले़बालपणाची जात ही निरागसता तर निष्पापपणा हा धर्म असतो़ याची जाणीव ठेवून साहित्यिकांनी लेखन करावे, असा सल्लाही सबनीस यांनी दिला़कार्यक्रमाला देवीदास फुलारी, रत्नाकर वाघमारे, सुरेश अंबुलगेकर, शंतनू डोईफोडे, डॉ़पृथ्वीराज तौर, डॉ़हंसराज वैद्य, डॉ़राम जाधव, प्रा़महेश मोरे, पंडित पाटील, वीरभद्र मिरेवाड, पवन आलूरकर, डॉक़ल्पना जाधव, अलका चुकेवाड, डॉ़स्वाती काटे, डॉ़अनिता पुदरोड, नेहा आलूरकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी सुगरणीचा खोपा या माधव चुकेवाड यांच्या बालगीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले़ अध्यक्षीय समारोप सुनील नेरलकर यांनी केला़ तर प्रास्ताविक प्रा़डॉ़वैजनाथ अनमुलवाड यांनी केले़वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड द्याडॉ. श्रीपाल सबनीस यांनी बालसाहित्याचे महत्व आणि आवश्यकता व्यक्त करतानाच वर्तमान काळात माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली. बालपण हे अत्यंत निरागस असते. याची जाणीवही लेखकांनी ठेवायला हवी, असा सल्लाही सबनीस यांनी साहित्यिकांना दिला.

टॅग्स :NandedनांदेडShripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्य