शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:05 IST

१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करणा-या योजनांचे वीजबिल थकल्याने दिवसेंदिवस बिलांचा आकडा वाढत गेला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित केल्यानंतरच लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकून चारअंकी आकड्याचे वीजबिल भरून वेळ मारून नेली जात आहे़ दरम्यान, ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १३ व्या अथवा १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्याचे बिल भरण्याची अनुमती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे. तरीही गावपुढारी, ग्रामसेवक ही रक्कम भरण्यास तयार नाहीत़ त्यामुळे मार्च एण्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १० गावांतील पाणीपुरवठा करणाºया योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. विशेष म्हणजे, केवळ सावरगाव (माळ) या एकाच गावाने थकित बिलांचा भरणा केला आहे. तर विद्युत बिलांच्या थकबाकीदार यादीमध्ये मनाठा, पळसवाडी, चोरंबा (खु़), वरवट, कवाना, तालंग, माळझरा, जगापूर, गायतोंड, चेंडकापूर या गावांचा समावेश आहे़ मनाठा गावाकडे ५ लाख तर उर्वरित आठ गावांकडे २५ लाख रूपयांची थकबाकी आहे.थकबाकीपोटी महावितरणने या गावांची वीज खंडित करून आठवडा उलटला तरीही कोणत्याही ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ग्रामस्थांकडून सेवाकर वसूल करून बिल भरण्याची तसदी घेतली नाही़ प्रत्येक गावांमध्ये दलित वस्ती, शाळा दुरुस्ती, संरक्षक भिंत, अंगणवाडी दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याचा हिशेब व बिले काढण्यातच ही मंडळी व्यस्त आहे़ दुसरीकडे सर्वसामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तर थकित वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय संबंधित गावांतील वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे़ त्यामुळे पाण्यासाठीची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे़वीजबिल भरल्याशिवाय जोडणी नाही- वाठोरेवीजबिल भरल्याशिवाय वीजजोडणी करण्यात येणार नाही़ कोणाच्याही दबावाला हे खाते बळी पडणार नाही़ कारण आमच्या नोकरीला धोका निर्माण होत असल्याने इतरांचा विचार का करावा? थकबाकी भरा असे आवाहन अभियंता व्ही़पी़ वाठोरे यांनी केले़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेडmahavitaranमहावितरणagricultureशेती