शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:05 IST

१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करणा-या योजनांचे वीजबिल थकल्याने दिवसेंदिवस बिलांचा आकडा वाढत गेला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित केल्यानंतरच लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकून चारअंकी आकड्याचे वीजबिल भरून वेळ मारून नेली जात आहे़ दरम्यान, ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर १३ व्या अथवा १४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्याचे बिल भरण्याची अनुमती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे. तरीही गावपुढारी, ग्रामसेवक ही रक्कम भरण्यास तयार नाहीत़ त्यामुळे मार्च एण्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १० गावांतील पाणीपुरवठा करणाºया योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. विशेष म्हणजे, केवळ सावरगाव (माळ) या एकाच गावाने थकित बिलांचा भरणा केला आहे. तर विद्युत बिलांच्या थकबाकीदार यादीमध्ये मनाठा, पळसवाडी, चोरंबा (खु़), वरवट, कवाना, तालंग, माळझरा, जगापूर, गायतोंड, चेंडकापूर या गावांचा समावेश आहे़ मनाठा गावाकडे ५ लाख तर उर्वरित आठ गावांकडे २५ लाख रूपयांची थकबाकी आहे.थकबाकीपोटी महावितरणने या गावांची वीज खंडित करून आठवडा उलटला तरीही कोणत्याही ग्रामपंचायतींनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ग्रामस्थांकडून सेवाकर वसूल करून बिल भरण्याची तसदी घेतली नाही़ प्रत्येक गावांमध्ये दलित वस्ती, शाळा दुरुस्ती, संरक्षक भिंत, अंगणवाडी दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याचा हिशेब व बिले काढण्यातच ही मंडळी व्यस्त आहे़ दुसरीकडे सर्वसामान्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तर थकित वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय संबंधित गावांतील वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे़ त्यामुळे पाण्यासाठीची भटकंती कधी थांबेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे़वीजबिल भरल्याशिवाय जोडणी नाही- वाठोरेवीजबिल भरल्याशिवाय वीजजोडणी करण्यात येणार नाही़ कोणाच्याही दबावाला हे खाते बळी पडणार नाही़ कारण आमच्या नोकरीला धोका निर्माण होत असल्याने इतरांचा विचार का करावा? थकबाकी भरा असे आवाहन अभियंता व्ही़पी़ वाठोरे यांनी केले़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेडmahavitaranमहावितरणagricultureशेती