शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीतील वाद विकोपाला; निर्बंध हटताच पीडित महिलांनी गाठले पोलीस ठाणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:22 IST

लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़

ठळक मुद्दे जिल्ह्यातील विविध ठाण्यांत १६ गुन्ह्यांची नोंद

- शिवराज बिचेवार

नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे अडीच महिन्यांहून अधिक काळ अनेकजण घरातच अडकून पडले होते़ व्यवसाय, नोकरीचा ताण अन् हाताला काम नसल्याच्या मनस्थितीत क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीत गृहकलह वाढला़ त्याचा परिणाम म्हणून अनलॉक होताच पोलीस ठाण्यांमध्ये छळाच्या तक्रारी सुरु झाल्या़ जून महिन्यात अशा १६ विवाहितांनी ठाण्याची पायरी चढली़ तर बलात्काराचेही सात गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ 

अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच बंदिस्त झाले़ सामाजिक संपर्क तुटला, व्यवहार ठप्प झाले़ बहुसंख्य लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या सर्व बाबींमुळे लोकांच्या मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीवर वाईट परिणाम होत आहे़ चिंता, निद्रानाश, चिडचिड, नैराश्य आणि भविष्याबद्दल अनिश्चतता लोकांच्या मनात घर करु पाहत आहे़ त्यामुळे आक्रमक होवून हिंसक प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. त्याचा परिणाम कुटुंबातील वातावरणावर होत आहे़ विशेष करुन पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरुन झालेले वादही त्यामुळे ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत़ २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला़ त्यात एप्रिल आणि मे महिन्यात त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली़ परंतु, जून महिन्यात त्यामध्ये सूट दिली़ लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़ 

जूनमध्ये बलात्काराचे ७, विनयभंगाचे २४ आणि छळाच्या गुन्ह्यात वाढ होवून ते १६ झाले होते़ तर जुलैमध्ये आतापर्यंत ३ छळाचे गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ त्यामुळे गृहिणींच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे़ किरकोळ कारणावरुन झालेले भांडणही घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे़ पोलिसांकडून अशा जोडप्यांसाठी ‘भरोसा सेल’ सुरु करण्यात आला आहे़ या ठिकाणी पती-पत्नी अन् त्यांच्या कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करुन त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ 

एकमेकांना समजून घ्या, मार्ग निघेलयेणारा काळ जरी अनिश्चिततेने ग्रासलेला असला तरी, लोकांनी सकारात्मक मानसिकता बाळगलीच पाहिजे़ मानसिक ताण जाणवला तर आपले आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र यांच्याशी संवाद साधला पाहिजे़ पती अन् पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे़ रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी संगीत, कला यासह इतर छंद जोपासा़ ज्या कारणामुळे घरात वाद होतात़ अशा कारणांचा शोध घेवून पती-पत्नीने एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा़ संतुलित आहार, शारीरिक श्रम आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे़ कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये़ एकमेकांना समजून घ्यावे़ - डॉ़रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी