शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीतील वाद विकोपाला; निर्बंध हटताच पीडित महिलांनी गाठले पोलीस ठाणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:22 IST

लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़

ठळक मुद्दे जिल्ह्यातील विविध ठाण्यांत १६ गुन्ह्यांची नोंद

- शिवराज बिचेवार

नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे अडीच महिन्यांहून अधिक काळ अनेकजण घरातच अडकून पडले होते़ व्यवसाय, नोकरीचा ताण अन् हाताला काम नसल्याच्या मनस्थितीत क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीत गृहकलह वाढला़ त्याचा परिणाम म्हणून अनलॉक होताच पोलीस ठाण्यांमध्ये छळाच्या तक्रारी सुरु झाल्या़ जून महिन्यात अशा १६ विवाहितांनी ठाण्याची पायरी चढली़ तर बलात्काराचेही सात गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ 

अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच बंदिस्त झाले़ सामाजिक संपर्क तुटला, व्यवहार ठप्प झाले़ बहुसंख्य लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या सर्व बाबींमुळे लोकांच्या मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीवर वाईट परिणाम होत आहे़ चिंता, निद्रानाश, चिडचिड, नैराश्य आणि भविष्याबद्दल अनिश्चतता लोकांच्या मनात घर करु पाहत आहे़ त्यामुळे आक्रमक होवून हिंसक प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. त्याचा परिणाम कुटुंबातील वातावरणावर होत आहे़ विशेष करुन पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरुन झालेले वादही त्यामुळे ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत़ २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला़ त्यात एप्रिल आणि मे महिन्यात त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली़ परंतु, जून महिन्यात त्यामध्ये सूट दिली़ लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़ 

जूनमध्ये बलात्काराचे ७, विनयभंगाचे २४ आणि छळाच्या गुन्ह्यात वाढ होवून ते १६ झाले होते़ तर जुलैमध्ये आतापर्यंत ३ छळाचे गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ त्यामुळे गृहिणींच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे़ किरकोळ कारणावरुन झालेले भांडणही घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे़ पोलिसांकडून अशा जोडप्यांसाठी ‘भरोसा सेल’ सुरु करण्यात आला आहे़ या ठिकाणी पती-पत्नी अन् त्यांच्या कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करुन त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ 

एकमेकांना समजून घ्या, मार्ग निघेलयेणारा काळ जरी अनिश्चिततेने ग्रासलेला असला तरी, लोकांनी सकारात्मक मानसिकता बाळगलीच पाहिजे़ मानसिक ताण जाणवला तर आपले आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र यांच्याशी संवाद साधला पाहिजे़ पती अन् पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे़ रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी संगीत, कला यासह इतर छंद जोपासा़ ज्या कारणामुळे घरात वाद होतात़ अशा कारणांचा शोध घेवून पती-पत्नीने एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा़ संतुलित आहार, शारीरिक श्रम आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे़ कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये़ एकमेकांना समजून घ्यावे़ - डॉ़रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी