शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

१३१९ आराेपींची जिल्हा पाेलिसांना हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

नांदेड : जिल्ह्यात विविध गुन्हे केल्यापासून हाती न लागलेल्या, न्यायालयात जामीन मिळवून फरार झालेल्या तब्बल १३१९ आराेपी व क्रियाशील ...

नांदेड : जिल्ह्यात विविध गुन्हे केल्यापासून हाती न लागलेल्या, न्यायालयात जामीन मिळवून फरार झालेल्या तब्बल १३१९ आराेपी व क्रियाशील गुंडांच्या अटकेचे आव्हान जिल्हा पाेलीस दलापुढे आहे. या आराेपींच्या अटकेसाठी पाेलीस प्रशासनाकडून सातत्याने वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. परंतु त्यानंतरही अनेक आराेपी पाेलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. पर्यायाने त्यांची नाेंद वर्षानुवर्षे पाेलीस दप्तरी ‘पाहिजे-फरारी’च्या यादीत पाहायला मिळते. नांदेड जिल्ह्याला लागून तेलंगणा व पुढे आंध्रप्रदेश राज्याची सीमा आहे. त्याचाच फायदा अनेक गुन्हेगार उचलतात. पूर्वनियाेजितपणे गुन्हा करून ते परप्रांतात फरार हाेतात. अनेक गंभीर व गाजलेल्या गुन्ह्यातील आराेपी हा मार्ग शाेधतात. त्यामुळे पाेलिसांना अनेकदा त्यांच्या अटकेशिवाय न्यायालयात सदर गुन्ह्यातील दाेषाराेपपत्र सादर करावे लागते. अशा प्रकरणात आराेपीच्या अटकेनंतर पुरवणी दाेषाराेपपत्र सादर करण्याची तजवीज ठेवली जाते.

आजच्या घडीला जिल्ह्यातील पाेलिसांना तब्बल १३१९ आराेपी हवे आहेत. त्यातील १२४ आराेपी न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तारखेवर हजर झाले नाहीत. त्यांची नाेंद फरार आराेपींच्या यादीत करण्यात आली आहे. आराेपी हजर व्हावेत म्हणून त्यांचा जामीन घेणाऱ्यांना दंड ठाेठावला गेला. अनामत रक्कम जप्त केली गेली. मात्र, त्यानंतरही अनेक आराेपी सापडत नाहीत. अशा गुन्ह्यातील बहुतांश आराेपी हे परप्रांतीय असून भादंविच्या ३०४ (अ) कलमान्वये दाखल अपघाताच्या गुन्ह्यातील आहेत. ट्रक व इतर जडवाहनांचे चालक असलेल्या या आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांनी अनेकदा आपली पथके इतर राज्यांमध्ये पाठविली. वाहन मालकांच्या माध्यमातून त्यांना शाेधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही.

गाव-वस्त्यांमध्ये खबरे पेरले..

सर्वाधिक ११९५ आराेपी हे विविध गुन्हे घडल्यापासून फरार आहेत. त्यांनी आपले माेबाइल नंबर बदलल्याने त्यांचे लाेकेशन शाेधणेही पाेलिसांना अवघड झाले आहे. अशा आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांनी त्यांच्या रहिवाशी गावे व वस्त्यांमध्ये आपले खबरे पेरले आहेत. ताे घरी कधी येताे का, घरच्यांशी काेणत्या क्रमांकावरून संपर्क करताे, त्याचे नक्की लाेकेशन काेठे आहे, कुण्या नातेवाइकांकडे आश्रयाला आहे याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पाेलीस करत आहेत. अनेक ठिकाणी पाेलीस पाटलांचीही मदत घेतली जात आहे. गंभीर गुन्ह्यातील ‘वाॅन्टेड’ आराेपींची पत्रकेही रेल्वेस्टेशन, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. अशा आराेपींच्या शाेधासाठी पाेलिसांकडून वारंवार विशेष माेहीम, काेंबिंग ऑपरेशन राबविले जाते.

फरार आराेपींपासून धाेका अधिक...

गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या या आराेपींची अटक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असते. कारण हे आराेपी घडलेल्या गुन्ह्यातील पंचसाक्षीदारांना धाेका पाेहाेचविण्याची, इतर गंभीर गुन्हे करण्याची शक्यता अधिक असते. गुन्ह्याच्या पद्धतीवरूनही (माेडस ऑपरेंडी) पाेलीस या आराेपींचा शाेध घेण्याचा प्रयत्न करतात. या आराेपींचा शाेध घेण्याचे आव्हान जिल्हाभरातील ठाणेदारांसह स्थानिक गुन्हे शाखेपुढे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला यश....

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी जिल्हा पाेलीस अधीक्षक जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही महिन्यांत विशेष माेहीम राबविली. त्यात न्यायालयातून जामीन घेऊन फरार झालेले नऊ तर गुन्हा घडल्यापासून फरार असलेले १३२ अशा १४१ जणांना अटक केली.

काेट.....

‘विहीत मुदतीत दाेषाराेपपत्र दाखल करावे लागत असल्याने त्या वेळेपर्यंत न सापडलेल्या आराेपींची नाेंद सर्रास पाहिजेतच्या यादीत केली जाते. त्यामुळे हा आकडा वाढलेला दिसताेय. त्यातही अपघातातील वाहनचालकांची संख्या अधिक आहे. बांग्लादेशी कारागिरांचा आकडाही माेठा आहे. या पाहिजे-फरारीत आराेपींच्या शाेधार्थ सतत माेहीम राबविली जाते.’

प्रमाेद शेवाळे

जिल्हा पाेलीस अधीक्षक

नांदेड.