शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

धर्माबादेतील पंप हाऊस दुरुस्तीचे काम वेगाने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:10 IST

येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले.

ठळक मुद्दे‘लोकमत’ इफेक्ट पालिका प्रशासन झाले जागे सात दिवसांपासून सुरु होता दूषित पाणी पुरवठा

धर्माबाद : येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पंप दुरूस्ती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून नांदेड येथील मेकॅनिकला बोलावण्यात आले. नगरपालिका वेगाने कामाला लागली. पंप दुरुस्तीमुळे २५ एप्रिल रोजी म्हणजेच आठव्या दिवशी शहराचा अख्खा पाणीपुरवठाच बंद करून टाकला.इळेगाव गोदावरी पात्रातून व बाभळी बंधारातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होतो. इळेगाव गोदावरी पाञात दोन पंप असून त्यातील एक पंप मोटर आत खोलवर पाणी खेचतो़ तर एक पंप मोटर आत खोलवरच पाणी खेचत नाही. त्यातील एक पंप मोटर सात दिवसापूर्वीच खराब झाला तरी धर्माबाद नगरपालिकेने पंप दुरुस्तीसाठी काहीही हालचाली केल्या नाहीत. परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. यंत्रणा ककामाला लागली. पंप दुरुस्तीसाठी नांदेडहून संबंधित कुशल कामगारांना बोलाविण्यात आले असून, संबंधित कामगारांनी पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.‘लोकमत’च्या वृत्ताअगोदर पालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना शहरात दूषित पाणी पुरवठा होत नसल्याचे माहिती नव्हते काय? नगरसेवकही यासंदर्भात काहीही बोलले नाहीत. हा एकूणच प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर आरोप नागरिकांंनी केला असून, दूषित पाण्यामुळे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पालिकेचे संबंधित जबाबदार राहतील, असेही नागरिकांंनी सांगितले.दुसरीकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात आनंदी आनंद आहे. विभागात अनुभवी आॅपरेटरची कमतरता आहे.पंप खराब झालाच तर काय करावे? काय करु नये? याचे ज्ञान सध्या असलेल्यांना नाही. एकूणच विभागात समन्वयाचा अभाव जाणवतो. दुसरीकडे पाणी पुरवठ्यावर मात्र लाखो रुपये खर्च दाखविला जातो, हा खर्च जातो कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. नगरसेवकही याकडे लक्ष देण्यास तयार होत नसल्याने नागरिक नाराज झाले असून दाद मागावी कोणाकडे ? असा सवाल करीत आहेत.

पंप दुरूस्ती चालू असून बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाली आहे. दुरूस्ती झाल्यानंतर शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे बळेगावचे पाणी सोडण्याची मागणी करणार आहोत-मंगेश देवरे, मुख्याधिकारी, धर्माबाद पालिकापाण्याची टाकी धुतली जात आहे जेथून पाणी घेतले जाते, तेथे प्रवाह नाही. पाणी डबक्यात जमा असल्याने ते खराब आहे. त्यामुळे दूषित पाणी येत असेल. इळेगाव गोदावरी येथील पंप खराब झाला आहे़ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.- अफजल बेगम अब्दूल सत्तार, नगराध्यक्षा, धर्माबादइळेगाव गोदावरीचे पंप हाऊस खराब होऊन सात दिवस झाले आहे. थेट रत्नाळीला होणारा पाणी पुरवठा दूषीत होत होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्याची मागणी केली आहे.-विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई