शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

‘जलयुक्त’ची जबाबदारी घेण्यास कृषी विभागाने केले हातवर; हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 5, 2024 19:12 IST

जलसंधारण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे; पण अनेक शेतकरी माहितीसाठी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत.

नांदेड : जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, पूर्वी स्थापन केलेल्या समित्यांमध्ये बदल करून आता नव्याने समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, कृषी संवर्ग संघटनेने ‘जलयुक्त’ची योजना कृषी विभागाकडे घेण्यास विरोध दर्शविल्याने महिना उलटूनही हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे.

लोकसहभाग आणि शासनाच्या निधीचा विनियोग करून जलयुक्त शिवार ही योजना राबविली जाते. या योजनेला पहिल्या टप्प्यात मोठे यश मिळाले होते. शेततळ्यांची निर्मिती, नाला सरळीकरण, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, सिमेंट नाला बांध, गाळमुक्त तळे यासारखी कामे या योजनेत केली जातात. राज्य शासनाच्या विविध पाच विभागांतील कामे एकत्र करून योजना राबविली जाते. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असली तरी कृषी विभाग राबविण्यास तयार नाही. त्यामुळे जलसंधारण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे; पण अनेक शेतकरी माहितीसाठी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत.

ही योजना यशस्वी राबविण्यासाठी या समितीत फेरबदल करून नवीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने यासंदर्भात ५ फेब्रुवारी २०२४ला आदेश निर्गमित केले; पण अद्यापही कृषी विभागाने या योजनेची जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान २ यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी पुन्हा एकदा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सोपवूनही त्यांनी हात वर केले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्र