शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोरोना रुग्णांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दोन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दोन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य माणूस भयावह अवस्थेत जगत आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ते स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वजण या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही विविध प्रसार माध्यमातून जनतेला ऐकायला मिळत आहे. शासनाच्या अधिकृत आरोग्य यंत्रणा आपापली जबाबदारी गतवर्षी प्रमाणेच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

शासकीय दवाखान्यातील सर्व यंत्रणा, मनुष्यबळ कार्यरत असले तरी वाढत्या रुग्णसंख्ये पुढे ही यंत्रणा कोलमडून पडू लागली आहे. परिणामी 'तुम्ही होम क्वारंटाईन व्हा!', सरकारी रुग्णालयात कोविडसाठी आवश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व खाटा उपलब्ध नाहीत, अशा कितीतरी तक्रारी प्राप्त होत आहेत.

सरकारी दवाखान्यात 'ना'चा पाढा ऐकण्यापेक्षा खासगी रुग्णालय जवळ करणे काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक पसंत करीत आहेत. सरकारी दवाखान्यात गरीब माणूस उपचारासाठी जातो तर तेथे त्याला औषधी हमखास बाहेरून खरेदी करावी लागते, असा अनेकांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे या औषधांची साठेबाजी व काळाबाजारसुद्धा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.

आरोग्य सुविधांवर अंकुश ठेवत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना थेट अर्थसहाय्य करणे, या यादृष्टीने आता शासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे. लक्षणे दिसू लागलेल्या घरातील व्यक्तीला कोठे घेऊन जावे? हा अनेक शिकलेल्या घरातील कुटुंबीयांकडे प्रश्न उभा राहत आहे. कोविड मान्यता नसलेल्या खासगी रुग्णालयात अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णाला हाकलून दिले जात आहे. मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये टेबल कॅशशिवाय उंबरठ्याच्या आत घेतलेच जात नाही.

शासनाने टेस्ट मोफत केली असली तरी पॉझिटिव्ह आल्यावर पुढे आपल्याने उपचार घेणे होऊ शकत नाही, हे अनेकांच्या मनात आहेत. त्यामुळे भयमुक्त होऊन तपासणीसाठी पुढे येण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या प्रत्येक नागरिकाला २४ तासांच्या आत किमान ५० हजार रुपये दिले पाहिजे. त्याच सोबत 'कोविड'मुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकाला ५ लाख रुपये शासनाने खात्यात जमा केले पाहिजेत, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी केली आहे.