शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दोन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दोन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य माणूस भयावह अवस्थेत जगत आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ते स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वजण या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही विविध प्रसार माध्यमातून जनतेला ऐकायला मिळत आहे. शासनाच्या अधिकृत आरोग्य यंत्रणा आपापली जबाबदारी गतवर्षी प्रमाणेच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

शासकीय दवाखान्यातील सर्व यंत्रणा, मनुष्यबळ कार्यरत असले तरी वाढत्या रुग्णसंख्ये पुढे ही यंत्रणा कोलमडून पडू लागली आहे. परिणामी 'तुम्ही होम क्वारंटाईन व्हा!', सरकारी रुग्णालयात कोविडसाठी आवश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व खाटा उपलब्ध नाहीत, अशा कितीतरी तक्रारी प्राप्त होत आहेत.

सरकारी दवाखान्यात 'ना'चा पाढा ऐकण्यापेक्षा खासगी रुग्णालय जवळ करणे काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक पसंत करीत आहेत. सरकारी दवाखान्यात गरीब माणूस उपचारासाठी जातो तर तेथे त्याला औषधी हमखास बाहेरून खरेदी करावी लागते, असा अनेकांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे या औषधांची साठेबाजी व काळाबाजारसुद्धा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.

आरोग्य सुविधांवर अंकुश ठेवत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना थेट अर्थसहाय्य करणे, या यादृष्टीने आता शासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे. लक्षणे दिसू लागलेल्या घरातील व्यक्तीला कोठे घेऊन जावे? हा अनेक शिकलेल्या घरातील कुटुंबीयांकडे प्रश्न उभा राहत आहे. कोविड मान्यता नसलेल्या खासगी रुग्णालयात अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णाला हाकलून दिले जात आहे. मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये टेबल कॅशशिवाय उंबरठ्याच्या आत घेतलेच जात नाही.

शासनाने टेस्ट मोफत केली असली तरी पॉझिटिव्ह आल्यावर पुढे आपल्याने उपचार घेणे होऊ शकत नाही, हे अनेकांच्या मनात आहेत. त्यामुळे भयमुक्त होऊन तपासणीसाठी पुढे येण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या प्रत्येक नागरिकाला २४ तासांच्या आत किमान ५० हजार रुपये दिले पाहिजे. त्याच सोबत 'कोविड'मुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकाला ५ लाख रुपये शासनाने खात्यात जमा केले पाहिजेत, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी केली आहे.