शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोरोना रुग्णांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दोन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. दोन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य माणूस भयावह अवस्थेत जगत आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ते स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वजण या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही विविध प्रसार माध्यमातून जनतेला ऐकायला मिळत आहे. शासनाच्या अधिकृत आरोग्य यंत्रणा आपापली जबाबदारी गतवर्षी प्रमाणेच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

शासकीय दवाखान्यातील सर्व यंत्रणा, मनुष्यबळ कार्यरत असले तरी वाढत्या रुग्णसंख्ये पुढे ही यंत्रणा कोलमडून पडू लागली आहे. परिणामी 'तुम्ही होम क्वारंटाईन व्हा!', सरकारी रुग्णालयात कोविडसाठी आवश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व खाटा उपलब्ध नाहीत, अशा कितीतरी तक्रारी प्राप्त होत आहेत.

सरकारी दवाखान्यात 'ना'चा पाढा ऐकण्यापेक्षा खासगी रुग्णालय जवळ करणे काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक पसंत करीत आहेत. सरकारी दवाखान्यात गरीब माणूस उपचारासाठी जातो तर तेथे त्याला औषधी हमखास बाहेरून खरेदी करावी लागते, असा अनेकांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे या औषधांची साठेबाजी व काळाबाजारसुद्धा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.

आरोग्य सुविधांवर अंकुश ठेवत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना थेट अर्थसहाय्य करणे, या यादृष्टीने आता शासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे. लक्षणे दिसू लागलेल्या घरातील व्यक्तीला कोठे घेऊन जावे? हा अनेक शिकलेल्या घरातील कुटुंबीयांकडे प्रश्न उभा राहत आहे. कोविड मान्यता नसलेल्या खासगी रुग्णालयात अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णाला हाकलून दिले जात आहे. मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये टेबल कॅशशिवाय उंबरठ्याच्या आत घेतलेच जात नाही.

शासनाने टेस्ट मोफत केली असली तरी पॉझिटिव्ह आल्यावर पुढे आपल्याने उपचार घेणे होऊ शकत नाही, हे अनेकांच्या मनात आहेत. त्यामुळे भयमुक्त होऊन तपासणीसाठी पुढे येण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या प्रत्येक नागरिकाला २४ तासांच्या आत किमान ५० हजार रुपये दिले पाहिजे. त्याच सोबत 'कोविड'मुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकाला ५ लाख रुपये शासनाने खात्यात जमा केले पाहिजेत, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी केली आहे.