शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
3
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
4
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
5
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
6
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
7
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
8
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
9
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
10
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
13
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
14
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
15
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
16
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
17
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
18
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
20
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...

कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

जनता दलाचे सोमवारी उपोषण नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच ...

जनता दलाचे सोमवारी उपोषण

नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच मागणीसाठी १० मे रोजी जनता दलाच्यावतीने उपोषणही करण्यात येणार आहे. गरीब कुटुंबांना १० हजार रुपये आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. किरण चिद्रावार, मोहमद पठाण, सूर्यकांत वाणी, लक्ष्मण शिंदे, बालाजी आलेवार, अर्चना पारळकर आदींनी केली आहे.

मोफत वैद्यकीय सेवेची मागणी

नांदेड- कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. हे उपचार परवडणारे नसून आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सर्व कोरोना रुग्णावर मोफत उपचार करण्याची मागणी जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात खड्डे

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे हे खड्डे भरत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी बसस्थानकात नसल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

वडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण

नांदेड- तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती केल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कसबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर

नांदेड - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून लसीकरणदेखील करण्यात येत आहे; परंतु लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने १० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे. शहरातील बाफना ब्रिज रेणुकाई हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या सचिन गॅरेज येथे सकाळी ९ ते ४ पर्यंत हे रक्तदान शिबिर करण्यात आले आहे.

पावसामुळे फळबागांचे नुकसान

नांदेड- जिल्ह्यात सध्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होत आहे. या वादळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, केळी आदी फळबागांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.