शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

जनता दलाचे सोमवारी उपोषण नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच ...

जनता दलाचे सोमवारी उपोषण

नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच मागणीसाठी १० मे रोजी जनता दलाच्यावतीने उपोषणही करण्यात येणार आहे. गरीब कुटुंबांना १० हजार रुपये आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. किरण चिद्रावार, मोहमद पठाण, सूर्यकांत वाणी, लक्ष्मण शिंदे, बालाजी आलेवार, अर्चना पारळकर आदींनी केली आहे.

मोफत वैद्यकीय सेवेची मागणी

नांदेड- कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. हे उपचार परवडणारे नसून आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सर्व कोरोना रुग्णावर मोफत उपचार करण्याची मागणी जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात खड्डे

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे हे खड्डे भरत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी बसस्थानकात नसल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

वडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण

नांदेड- तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती केल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कसबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर

नांदेड - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून लसीकरणदेखील करण्यात येत आहे; परंतु लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने १० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे. शहरातील बाफना ब्रिज रेणुकाई हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या सचिन गॅरेज येथे सकाळी ९ ते ४ पर्यंत हे रक्तदान शिबिर करण्यात आले आहे.

पावसामुळे फळबागांचे नुकसान

नांदेड- जिल्ह्यात सध्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होत आहे. या वादळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, केळी आदी फळबागांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.