शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

जनता दलाचे सोमवारी उपोषण नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच ...

जनता दलाचे सोमवारी उपोषण

नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच मागणीसाठी १० मे रोजी जनता दलाच्यावतीने उपोषणही करण्यात येणार आहे. गरीब कुटुंबांना १० हजार रुपये आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. किरण चिद्रावार, मोहमद पठाण, सूर्यकांत वाणी, लक्ष्मण शिंदे, बालाजी आलेवार, अर्चना पारळकर आदींनी केली आहे.

मोफत वैद्यकीय सेवेची मागणी

नांदेड- कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. हे उपचार परवडणारे नसून आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सर्व कोरोना रुग्णावर मोफत उपचार करण्याची मागणी जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात खड्डे

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे हे खड्डे भरत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी बसस्थानकात नसल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

वडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण

नांदेड- तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती केल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कसबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर

नांदेड - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून लसीकरणदेखील करण्यात येत आहे; परंतु लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने १० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे. शहरातील बाफना ब्रिज रेणुकाई हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या सचिन गॅरेज येथे सकाळी ९ ते ४ पर्यंत हे रक्तदान शिबिर करण्यात आले आहे.

पावसामुळे फळबागांचे नुकसान

नांदेड- जिल्ह्यात सध्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होत आहे. या वादळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, केळी आदी फळबागांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.