शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अनेक भागात निर्जळीच; धरण उशाला असूनही नांदेडकरांना रोज पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST

नांदेड शहराची तहान भागविणारा विष्णुपुरी प्रकल्प आजघडीला ८७ टक्के भरला आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्राच्या वरील बाजूस पाऊस झाला की ...

नांदेड शहराची तहान भागविणारा विष्णुपुरी प्रकल्प आजघडीला ८७ टक्के भरला आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्राच्या वरील बाजूस पाऊस झाला की प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाणी खाली सोडून दिले जाते; परंतु आजही संपूर्ण शहराला दररोज पाणी सोडण्याचे नियोजन मनपाने केले नाही.

बळीराजा आनंदला

विष्णुपुरीत ८७ टक्के पाणीसाठा असून योग्य नियोजन केले नाही तर शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाणी मिळणार नाही. या प्रकल्पातून शहरासाठी संरक्षित पाणी करून उर्वरित शेतीसाठी देण्यास नियोजन करावे. - शिवाजी मोरे

विष्णुपुरीत ८७ टक्के साठा, शहराला तीन दिवसाआड पाणी

नांदेड शहर व परिसरातील नगराची तहान भागविणारे विष्णुपुरी धरण ८७ टक्के भरले आहे.

त्याचबरोबर सांगवी परिसरातील आसना बंधाराही पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

शहरातील पाणीवाटपाचे नियोजन नसल्याने भर पावसाळ्यातही नांदेडकरांना तीन दिवसाआड पाणी दिले जाते.

शहरवासीय म्हणतात, नळाला पाणी का नाही?

जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही नळाला दररोज आणि मुबलक प्रमाणात पाणी येत नाही. मनपाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना नियमित पाणी देण्याबरोबरच वर्षभर पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन करावे.

- सचिन आगरकर

विष्णुपुरी, आसना प्रकल्प तुडुंब भरलेले असताना केवळ महापालिकेकडे नियोजन नसल्याने नांदेडकरांना ऐनपावसाळ्यातही निर्जळीचा सामना करावा लागत आहे. शहरातील तरोडा भागात अनेक नगरात उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशीच परिस्थिती जुन्या नांदेडातील आहे. पाण्याचे योग्य नियोजन हवे.

- संदीप पावडे, तरोडा