शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाण्याचा अंदाज न आल्याने पितापुत्राचा नाल्याच्या पाण्यात वाहून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 21:36 IST

बिलोली तालुक्यातील आरळी येथील  पिता व पुत्र शेतीच्या कामासाठी जात असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेले

नांदेड - बिलोली तालुक्यातील आरळी येथील  पिता व पुत्र शेतीच्या कामासाठी जात असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेले असून दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.शेतीच्या कामासाठी गेलेल्या पिता-पुञाचा पाण्यात वाहुन गेल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध अंती ६ तासाने दोघांचे ही प्रेत पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.गरीब मुस्लिम कुटुंबतील कर्तेधरते गेल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

आरळी येथील शादुल महेबुब सय्यद वय( 42) मुलगा मेहराज शादुल सय्यद वय (15 ) हे दोघे पितापुत्र हे शेतीच्या कामासाठी गेले होते.शेताच्या बाजूला बेळकोणी मार्गे येणारा डोह असल्याने वडिलांने मुलाला कडेला थांबण्यास सांगितले व बैल बांधण्यासाठी वडील गेले असताना अचानक कडेला उभे टाकलेल्या मुलाचा पाय घसरल्याने  तो पाण्यात पडला आणि  वाहून जाऊ लागला मुलाला वाचवण्यासाठी गेलेले वडील ही वाहू लागले हे दोघेही  नाला सारलीकरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत अडकले. एकीकडे शादुल यांच्या पत्नी सकाळी 9 वाजता गेलेले पती व मुलगा परत न आल्यामुळे गावकऱ्यांना सांगितले तेव्हा गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता  दोघा पितापुत्राचे प्रेत नाला सरळीकरणाच्या काम चालू असलेल्या ठिकाणी अडकल्याचे निर्देशनास आले. गावकऱ्यांनी प्रेत बाहेर काढले. सदरील घटना सोमवारी 9 च्या दरम्यान घडली. मयत मुलगा मेहराज शार्दुल हा शाळकरी मुलगा असून, येथील श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. नुकतेच त्याने मार्च शालांत परीक्षेचे फॉर्म पण भरले होते. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनेचा पंचनामा केला.मताताच्या पार्थिवावर शवविच्छेदन करुन दफनविधी करण्यात येत आहे,या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी