शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दापशेडमध्ये शेततळे हरवल्याची तक्रार !; कारवाईसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:48 IST

लोहा तालुक्यातील दापशेड येथे शेततळे हरवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरील योग्य कारवाईसाठी ग्रामस्थांनी उपोषणासही प्रारंभ केला आहे.

नांदेड : लोहा तालुक्यातील दापशेड येथे शेततळे हरवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरील योग्य कारवाईसाठी ग्रामस्थांनी उपोषणासही प्रारंभ केला आहे.

दापशेड येथे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मातीबांध, नालासरळीकरण, शेततळे, विहीर पुनर्भरण आदी कामे केल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपये हडप करण्यात आल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात कोणतेही काम नसल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. 

विहीर पुनर्भरण कामात लोहा तालुक्यामध्ये जवळपास ६ लाखांचा तर डहाळीच्या कामातही पाच लाखांचा अपहार झाल्याची बाब पुढे आले होती. मात्र या सर्व प्रकरणाची चौकशी अद्याप गूलदस्त्यातच आहे. या प्रकरणात जिल्हाधिका-यांनी कारवाई करावी,अशी मागणी भाजपाच्या दक्षिण विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष राम मोरे, अविनाश शीतळे, शिवराज टोणगे, गंगाराम शीतळे, श्यामराव शीतळे, मरीबा सोनकांबळे आदींनी केली आहे. याच मागणीसाठी गुरुवारपासून राम मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणास प्रारंभ केला आहे. दरम्यान, जिल्हाभरात जलयुक्त शिवारची कामे सुरु असली तरी या कामाच्या दर्जाबाबत मात्र आता साशंकता घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात झालेली कामे राजकीय हस्तक्षेपाविना पार पडली. पुढे मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कामामध्ये अनागोंदी सुरु आहे. परिणामी जलयुक्तच्या तक्रारीमध्येही मोठी वाढ झाली आहे.

‘एमबी’ तयार करुन उचलले बिल...दापशेड येथील जलयुक्तच्या कामामध्ये तीन शेततळे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. भागिरथाबाई गोविंद शीतळे, वसंतराव विठ्ठल शीतळे आणि लक्ष्मीबाई अशोक टोणगे यांच्या नावे शेततळे कागदोपत्री दाखवली खरी  मात्र प्रत्यक्षात लक्ष्मीबाई टोणगे यांच्या शेततळे गट क्र. २९५ मध्ये आजघडीला कोणतेही शेततळे झाले नाही. मग कृषी विभागाने लाखो रुपये खर्चून केलेले शेततळे चोरीला गेले काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे या शेततळ्याची एमबी तयार करुन बिलही काढण्यात आले आहे.