शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हदगाववासियांची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:57 IST

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २६ मार्च शेवटची तारीख असतानाही काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता कायम आहे.

हदगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २६ मार्च शेवटची तारीख असतानाही काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या परिने गुप्त भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ येतो़ माहूर-किनवट, कळमनुरी-हिंगोली, महागाव-उमरखेड, वसमत विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे़ आतापर्यंत मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाकडे होता़ याच मतदारसंघातून सन २००४-०९ या पाच वर्षामध्ये सूर्यकांता पाटील निवडून ग्रामविकास मंत्री झाल्या होत्या़ परंतु, त्यानंतर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव करून सन २००९ ला खासदारकी मिळविली़ सन २०१४ मध्ये अ‍ॅड़ राजीव सातव यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाकडे घेतला व सुभाष वानखेडे यांचा मोदी लाटेतही पराभव केला़सन १९९९-२००४ यावर्षी अ‍ॅड़ शिवाजीराव माने हे शिवसेनेकडून विजयी झाले होते़ त्यांनी राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता़ सन १९९४ ते १९९९ या वर्षातही सूर्यकांता पाटील खासदार होत्या़ या मतदारसंघाचा विचार करता एक टर्मच प्रत्येक पक्षाला विजय मिळाला आहे़

  • यावर्षी भाजपा व सेना वेगवेगळे निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळेच अ‍ॅड़ शिवाजीराव माने, सूर्यकांता पाटील, सुभाष वानखेडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला व उमेदवारीसाठी प्रयत्न केला़ परंतु, दोन्ही पक्षाची युती झाली व ही जागा शिवसेनेची असल्यामुळे या नेत्यांची गोची झाली़ सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी वर्षापासून फिल्डींग लावली़ अनेकदा त्यांच्या प्रवेशाच्या तारखाही जाहीर झाल्या़ पत्रकार परिषदा घेवून त्यांनी प्रवेश करणार असल्याचे जाहीरही केले़ परंतु स्थानिक शिवसैनिकांनी त्यांना विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश थांबला़ मध्येमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या़ अ‍ॅड़ शिवाजीराव जाधव यांना शिवसेनेत प्रवेश देवून उमेदवारी देणार असल्याची चर्चा आता थांबली़

 

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक